शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

ग्रा.पं.चा टॅक्स लागलेली घरे भुईसपाट

By admin | Updated: January 28, 2017 00:29 IST

शहराला लागून असलेल्या धोबीसराड गावातील गट क्र. १८८ मध्ये मागील सहा वर्षांपासून वास्तव्य करीत

वनविभागाची दबंगगिरी : १० गरीब परिवार बेघर, पक्की घरे अतिक्रमणातच देवरी : शहराला लागून असलेल्या धोबीसराड गावातील गट क्र. १८८ मध्ये मागील सहा वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या गरीबांची घरे शुक्रवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडली. त्यामुळे लोकांमध्ये वनविभागाच्या अन्यायपूर्ण व भेदभावपूर्ण कारवाईबद्दल संतापाचे वातावरण तयार झाले. वनविभाग देवरी कार्यालयात नव्याने रुजू झालेले वनपरीक्षेत्राधिकारी भगवान मारबते यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागातील कर्मचाऱ्यांनी गट नं.१८८ मध्ये लोकांनी अतिक्रमण केले असल्याचे सांगून शुक्रवारी कारवाई करीत १० घरे तोडली. यामुळे या १० परिवारातील ५० लोकांना उघड्यावर संसार थाटण्याची वेळ आली आहे. ज्यांची घरे तोडण्यात आली त्यांनी या कारवाईला अन्यायकारक सांगितले व पक्या घरांवर वनविभाग कारवाई करणार का? असा संतप्त सवाल केला आहे. विशेष म्हणजे या गट क्र.१८८ मध्ये एकूण ८.२० हेक्टर जमीन येते. बऱ्याच वर्षापासून ही वनजमीन रिकामी पडून होती. या जमिनीवर काही लोकांनी कच्ची-पक्की घरे बनविली. काहींनी या जमिनीवर शेतीसुद्धा काढली. परंतु इतक्या वर्षापासून वनविभाग गप्प होता. आता एकाएकी कारवाई करुन वनविभागाने गरीबांची घरे तोडली व शेकडो पक्क्या घरांवर कारवाई करण्याचे टाळले.त्यामुळे वनविभाबद्दल रोष व्यक्त होत आहे. वनविभागाद्वारे झालेल्या अतिक्रमण हटावच्या कारवाईत रामरतन नागवंशी, बाळू आंबेडारे, सुनिता नेवारे, शारदा वालदे, दुर्गा नेताम, पंढरी गेडाम, लखन राऊत, संतोष वाघ, सावित्री दंदे यांची घरे पोलीस संरक्षणात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तोडली. विशेष म्हणजे यामध्ये विधवा महिला सुनिता अजित नेवारे हिच्या घरावर ग्रामपंचायतने टॅक्स लावलेला आहे. तरी सुद्धा तिचे घर तोडण्यात आले. तिला दोन लहान मुले आहेत. ती उघड्यावर आली आहेत. कारवाई निर्दयीपणे करण्यात आली. या भेदभावपूर्ण कारवाईबाबत वनपरीक्षेत्राधिकारी भगवान मारबते यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, गट नं. १८८ ही वनजमिन असून जी पक्के घर आहेत त्यांना नोटीस देण्यात आली आहे. नियमाप्रमाणे त्यांचेवर सुद्धा कारवाही होणार. (तालुका प्रतिनिधी)