शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
7
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
8
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
9
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
10
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
11
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
12
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
13
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
14
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
15
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
16
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
17
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
18
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
19
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
20
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?

'ओडीएफ प्लस ' साठी ८६२ गावांचे लक्ष्य ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:35 IST

नरेश रहिले गोंदिया : जिल्हा हागणदारी मुक्त झाला. आता जिल्हा 'ओडीएफ प्लस ' करण्यावर शासनाचा भर आहे. स्वातंत्र्य ...

नरेश रहिले

गोंदिया : जिल्हा हागणदारी मुक्त झाला. आता जिल्हा 'ओडीएफ प्लस ' करण्यावर शासनाचा भर आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील ५ ग्रामपंचायतींना 'ओडीएफ प्लस ' घोषित करण्यात आले आहे. यात तिरोडा तालुक्यातील पांजरा व नवेझरी, गोरेगाव तालुक्यातील बबई व कटंगी बु. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध यांचा समावेश आहे. मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील ८६२ गावे 'ओडीएफ प्लस' होणार आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक शौचालयांचा लाभार्थ्यांना लाभ देऊन जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात आला. शासनाने सार्वजनिक स्वच्छता तथा सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर भर दिला आहे. त्यासाठी गावातील बाजार क्षेत्र, सार्वजनिक ठिकाणात तरंगत्या लोकसंख्येसाठी सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था, शासकीय कार्यालयात शौचालयांची व्यवस्था, कचऱ्याचे वर्गीकरण, सांडपाणी व घनकचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन, गावात उपयुक्त घंटागाडीची व्यवस्था, शाळा व अंगणवाडी अंतर्गत शौचालय तथा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेल्या ग्रामपंचायतींना 'ओडीएफ प्लस ' घोषित करण्याचे निकष ठरविण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील पांजरा, नवेझरी, बबई, कटंगी बु., सिरेगाव बांध आदी गावांत सर्व निकष पूर्ण करण्यात आले आहेत. या गावांची तपासणी करून गावे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत. गावांची तपासणी केल्यानंतर शासनाच्या संकेतस्थळावर तशी नोंद करण्यात आली आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील ८६२ गावे हागणदारीमुक्त करण्याचे जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले आहे.

....................

सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करा

येत्या मार्चपर्यंत संपूर्ण गोंदिया जिल्हा 'ओडीएफ प्लस ' घोषित केला जाणार आहे. गावात शाश्वत स्वच्छता राहावी म्हणून नागरिकांनी सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळावी, शौचालयाचा नियमित वापर करावा, उघड्यावर कुणीही शौचास जाऊ नये, इतरांनाही उघड्यावर शौचास बसण्यापासून परावृत्त करावे, सरपंच-ग्रामसेवकांनी सुध्दा गावातील सार्वजनिक स्वच्छतेवर भर द्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी केले.