शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

'ओडीएफ प्लस ' साठी ८६२ गावांचे लक्ष्य ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:35 IST

नरेश रहिले गोंदिया : जिल्हा हागणदारी मुक्त झाला. आता जिल्हा 'ओडीएफ प्लस ' करण्यावर शासनाचा भर आहे. स्वातंत्र्य ...

नरेश रहिले

गोंदिया : जिल्हा हागणदारी मुक्त झाला. आता जिल्हा 'ओडीएफ प्लस ' करण्यावर शासनाचा भर आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील ५ ग्रामपंचायतींना 'ओडीएफ प्लस ' घोषित करण्यात आले आहे. यात तिरोडा तालुक्यातील पांजरा व नवेझरी, गोरेगाव तालुक्यातील बबई व कटंगी बु. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध यांचा समावेश आहे. मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील ८६२ गावे 'ओडीएफ प्लस' होणार आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक शौचालयांचा लाभार्थ्यांना लाभ देऊन जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात आला. शासनाने सार्वजनिक स्वच्छता तथा सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर भर दिला आहे. त्यासाठी गावातील बाजार क्षेत्र, सार्वजनिक ठिकाणात तरंगत्या लोकसंख्येसाठी सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था, शासकीय कार्यालयात शौचालयांची व्यवस्था, कचऱ्याचे वर्गीकरण, सांडपाणी व घनकचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन, गावात उपयुक्त घंटागाडीची व्यवस्था, शाळा व अंगणवाडी अंतर्गत शौचालय तथा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेल्या ग्रामपंचायतींना 'ओडीएफ प्लस ' घोषित करण्याचे निकष ठरविण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील पांजरा, नवेझरी, बबई, कटंगी बु., सिरेगाव बांध आदी गावांत सर्व निकष पूर्ण करण्यात आले आहेत. या गावांची तपासणी करून गावे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत. गावांची तपासणी केल्यानंतर शासनाच्या संकेतस्थळावर तशी नोंद करण्यात आली आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील ८६२ गावे हागणदारीमुक्त करण्याचे जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले आहे.

....................

सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करा

येत्या मार्चपर्यंत संपूर्ण गोंदिया जिल्हा 'ओडीएफ प्लस ' घोषित केला जाणार आहे. गावात शाश्वत स्वच्छता राहावी म्हणून नागरिकांनी सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळावी, शौचालयाचा नियमित वापर करावा, उघड्यावर कुणीही शौचास जाऊ नये, इतरांनाही उघड्यावर शौचास बसण्यापासून परावृत्त करावे, सरपंच-ग्रामसेवकांनी सुध्दा गावातील सार्वजनिक स्वच्छतेवर भर द्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी केले.