शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

४५ हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 21:57 IST

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज झाली असून यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. आता पावसाळा जवळच असल्याने शासनाकडून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेची कसरत : १ जुलैपासून वृक्ष लागवड कार्यक्रम

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज झाली असून यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. आता पावसाळा जवळच असल्याने शासनाकडून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यांतर्गत गोंदिया नगर परिषदेला यंदा ४५ हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. १ जुलैपासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरू होणार असून यासाठी नगर परिषदेला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.घटत चाललेल्या वृक्षांच्या संख्येमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून बदलते वातावरण हे त्याचे सूचक आहेत. अशात पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड हाच त्यावर एकमात्र उपाय आहे. वृक्ष लागवडीचे गांभीर्य लक्षात घेत शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहिम राबविली जात आहे.यंदा शासनाने १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यांतर्गत नगर विकास विभागाकडून ‘अ’ वर्ग नगर परिषदांना १० हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार गोंदिया नगर परिषदेला १० हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला एकूण ४५ हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट दिले आहे.िदलेल्या टार्गेटच्या पूर्ततेसाठी आता नगर परिषदेकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हे अंदाजपत्रक तांत्रीक मंजुरीसाठी सामाजीक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. त्यांची मंजुरी मिळताच वृक्ष लागवडीचे हे काम खाजगी एजन्सीला देण्याची नगर परिषदेची तयारी असल्याची माहिती आहे. तसे झाल्यास, संबंधीत एजन्सीला वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत संबंधीत संपूर्ण कामे करावी लागणार आहे. शिवाय पुढील तीन वर्ष वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही दिली जाणार आहे.येत्या १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यादृष्टीने नगर परिषद तयारीला लागली आहे.फळ प्रजातीय वृक्षांची लागवड करानगर परिषदेला देण्यात आलेल्या टार्गेटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ३५ हजार वृक्ष लागवडीची भर घालून टार्गेट वाढवून दिले आहे. शिवाय या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नगर परिषदेला कडूनिंब, काटेसावर, बेळ, जांभूळ, बेहळा, मोहा, चिंच, आंबा, पिंपळ, हिरडा, चारोळी, बोर, टेंभरून, हिरनी, रीठा, हिवस, पाखड, कटूंबर, शेवगा, अंजन आदि फळ व छायादार वृक्षांच्या लागवडीचे निर्देश देण्यात आले आहे. नगर परिषदेने यंदाचे टार्गेट उत्तमरित्या सर केल्यास येणाऱ्या काळात गोंदिया शहरात नक्कीच हिरवळ दिसणार यात शंका नाही.वृक्ष लागवड कार्यक्रमाला आचारसंहितेचा खोडानगर विकास विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार नगर परिषदेला वृक्षारोपणासाठी ३१ मे पर्यंत खड्डे तयार करायचे होते. मात्र लोकसभा पोटनिवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे नगर परिषदेला वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी निविदा प्रक्रिया करता आली नाही. त्यामुळे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे काम करण्यासाठी एजन्सीची निवड अद्यापही झालेली नाही. आता आचार संहिता संपताच निविदा प्रक्रिया केली जाणार व त्यानंतर या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.