शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तंमुसने लग्न लावलेल्या जोडप्यांना आंतरजातीय विवाहाचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 00:53 IST

गावाला शांततेतून समृद्धीकडे नेण्यासाठी राज्य शासनाने अंमलात आणलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावाचा कायापालट करण्यात यशस्वी राहिली.

तंटामुक्त समितीचा उपक्रम : जिल्ह्यात झाले २०० आंतरजातीय विवाहगोंदिया : गावाला शांततेतून समृद्धीकडे नेण्यासाठी राज्य शासनाने अंमलात आणलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावाचा कायापालट करण्यात यशस्वी राहिली. तंटे सोडविण्याबरोबर गावात जातीय सलोखा राखून सर्वधर्म समभावाच्या संकल्पनेला पुढे नेत आंतरजातीय व प्रेम विवाह घडवून आणले. जिल्ह्यात २०० पेक्षा अधिक आंतरजातीय विवाह झाले. या जोडप्यांना आंतरजातीय विवाह प्रोत्साहन राशीचा लाभ द्यावे, अशी मागणी पद्मपूर येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांनी केली आहे.गावातील सण, उत्सव, मेळावे, महापुरूषाच्या जयंती, पुण्यतिथी या पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडून प्रेमी युगलाचे शुभमंगल घडवून आणले. सोबतच जिल्ह्यातील ५५६ तंटामुक्त गाव समित्यांनी २०० पेक्षा अधिक आंतरजातीय विवाह घडवून आणले. या जोडप्यांना शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन राशीचा लाभ मिळाला नाही, अशी समित्यांची ओरड आहे. मात्र त्या जोडप्यांनी प्रोत्साहन राशीसाठी अर्जच केले नाही. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनी स्वत: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे किंवा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी हा विवाह लावून देण्याबरोबरच त्या जोडप्यांचे कागदपत्र समाजकल्याण कार्यालयात रितसर अर्जासह दाखल करावे, त्या जोडप्यांना निश्चितच आंतरजातीय विवाहाच्या प्रोत्साहन राशीचा लाभ मिळेल. आंतरजातीय विवाह बंधनात अडकलेल्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती मागास प्रवर्गातील असावा. त्यापैकी एक व्यक्ती जिल्ह्यातील रहिवाशी असावा. (तालुका प्रतिनिधी)समित्यांना मार्गदर्शन करावेशासनातर्फे शुभमंगल योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळयात विवाहबध्द झालेल्या जोडप्यांना शासनातर्फे १० हजार रुपये प्रोत्साहन राशी दिली जाते. मात्र महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी लग्न लावलेल्या जोडप्यांना शुभमंगल योजनेचा लाभ मिळत नाही. नोंदणीकृत संस्थेमार्फत विवाह केल्यास शुभमंगल योजनेचा लाभ देण्यात येतो. मात्र तंटामुक्त समित्यांनी लावलेल्या लग्नातील जोडप्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागते. शासनाने सुरू केलेली तंटामुक्त मोहीम प्रत्येक गावात राबवित असल्याने तंटामुक्त मोहीम ही एक शासनाची चळवळ असून या समितीने लावलेल्या लग्नातील जोडप्यांना शुभमंगल योजनेचा लाभ देण्यात यावा, तसेच आंतरजातिय विवाहाचे प्रस्ताव कसे सादर करावे, यासंदर्भात समाज कल्याण विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी पदमपूर येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांनी केली आहे.