शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तंमुसने लग्न लावलेल्या जोडप्यांना आंतरजातीय विवाहाचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 00:53 IST

गावाला शांततेतून समृद्धीकडे नेण्यासाठी राज्य शासनाने अंमलात आणलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावाचा कायापालट करण्यात यशस्वी राहिली.

तंटामुक्त समितीचा उपक्रम : जिल्ह्यात झाले २०० आंतरजातीय विवाहगोंदिया : गावाला शांततेतून समृद्धीकडे नेण्यासाठी राज्य शासनाने अंमलात आणलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावाचा कायापालट करण्यात यशस्वी राहिली. तंटे सोडविण्याबरोबर गावात जातीय सलोखा राखून सर्वधर्म समभावाच्या संकल्पनेला पुढे नेत आंतरजातीय व प्रेम विवाह घडवून आणले. जिल्ह्यात २०० पेक्षा अधिक आंतरजातीय विवाह झाले. या जोडप्यांना आंतरजातीय विवाह प्रोत्साहन राशीचा लाभ द्यावे, अशी मागणी पद्मपूर येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांनी केली आहे.गावातील सण, उत्सव, मेळावे, महापुरूषाच्या जयंती, पुण्यतिथी या पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडून प्रेमी युगलाचे शुभमंगल घडवून आणले. सोबतच जिल्ह्यातील ५५६ तंटामुक्त गाव समित्यांनी २०० पेक्षा अधिक आंतरजातीय विवाह घडवून आणले. या जोडप्यांना शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन राशीचा लाभ मिळाला नाही, अशी समित्यांची ओरड आहे. मात्र त्या जोडप्यांनी प्रोत्साहन राशीसाठी अर्जच केले नाही. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनी स्वत: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे किंवा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी हा विवाह लावून देण्याबरोबरच त्या जोडप्यांचे कागदपत्र समाजकल्याण कार्यालयात रितसर अर्जासह दाखल करावे, त्या जोडप्यांना निश्चितच आंतरजातीय विवाहाच्या प्रोत्साहन राशीचा लाभ मिळेल. आंतरजातीय विवाह बंधनात अडकलेल्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती मागास प्रवर्गातील असावा. त्यापैकी एक व्यक्ती जिल्ह्यातील रहिवाशी असावा. (तालुका प्रतिनिधी)समित्यांना मार्गदर्शन करावेशासनातर्फे शुभमंगल योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळयात विवाहबध्द झालेल्या जोडप्यांना शासनातर्फे १० हजार रुपये प्रोत्साहन राशी दिली जाते. मात्र महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी लग्न लावलेल्या जोडप्यांना शुभमंगल योजनेचा लाभ मिळत नाही. नोंदणीकृत संस्थेमार्फत विवाह केल्यास शुभमंगल योजनेचा लाभ देण्यात येतो. मात्र तंटामुक्त समित्यांनी लावलेल्या लग्नातील जोडप्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागते. शासनाने सुरू केलेली तंटामुक्त मोहीम प्रत्येक गावात राबवित असल्याने तंटामुक्त मोहीम ही एक शासनाची चळवळ असून या समितीने लावलेल्या लग्नातील जोडप्यांना शुभमंगल योजनेचा लाभ देण्यात यावा, तसेच आंतरजातिय विवाहाचे प्रस्ताव कसे सादर करावे, यासंदर्भात समाज कल्याण विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी पदमपूर येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांनी केली आहे.