शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

तालुक्‍यात ‘अंधेरा कायम है’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST

लोहारा : विजेच्या लपंडावाला घेऊन वृत्तपत्रांतून नागरिकांचा रोष बघता वीज वितरण कंपनीला थोडीफार जाग आली होती असे वाटत होते; ...

लोहारा : विजेच्या लपंडावाला घेऊन वृत्तपत्रांतून नागरिकांचा रोष बघता वीज वितरण कंपनीला थोडीफार जाग आली होती असे वाटत होते; मात्र पुन्हा वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकही त्रासले आहेत.

तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे़. शेतकऱ्यांनी आपापल्या साधनांच्या आधारे धान पिकाच्या रोवणीला सुरुवात केली आहे. पीक वाचविण्याच्या धडपडीत असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी मुद्दाम शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे डोळेझाक करीत आहेत. तर अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बिल बाकी असल्याने जोडणी कापण्यात आली आहे. काही ठिकाणी तर ट्रान्स्फाॅर्मर बंद पडले आहेत. कधी-कधी तर ट्रान्स्फाॅर्मरला दोन फेस असतात त्यातील एक फेस नाही त्यामुळे शेतातील पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़. परिसरात वीज पुरवठ्यात नेहमी तांत्रिक बिघाड होत असतो. तरीही महावितरणला जाग येत नाही. देवरी तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार बंद राहत असल्याने रोवणी कशी करणार. महावितरणच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड तर पडतोच, पण शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. ही समस्या निकाली काढण्या करिता वीज विभागाच्या वरिष्ठ व स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे़.

---------------------------

कर्मचारी कमी पण काम जास्त

या परिसरात वीज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांकडे काम अधिक आणि कर्मचारी कमी अशी अवस्था आहे़. यामुळे कृषी पंपांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण होत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. शेतकऱ्यांच्या शेतातील मीटरमध्ये बिघाड झाल्यास लाईनमनला फोन लावल्यास कधी या गावी, तर कधी त्या गावी असतात़. ‘लाईनमन एक अन् गाव अनेक’ अशी स्थिती आहे. त्यातच तक्रारींची संख्या वाढत आहे. यामुळे एकाही तक्रारीचे धड निराकरण होत नाही.