शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

तालुका प्रशासनाने जनतेला सोडले वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर २४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच दरम्यान राज्य सरकारने राज्यात कलम १४४ लावून जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली. त्यानुसार पोलीस विभाग, कायद्याचे पालन व्हावे म्हणून त्वरीत कार्यरत झाला. एकीकडे कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागाला सतत तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देतहसीलदार, बीडीओचे दुर्लक्ष : स्वयंसेवी संस्थाकडूनच गरजूंना मदत

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : संपूर्ण देशासह राज्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना शहरापासून गावाकडे ही पोहचू लागला आहे.अशात आपल्या तालुक्यात संसर्ग होणार नाही. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज स्थानिक प्रशासनावर आहे. मात्र ज्यांच्यावर जवाबदारी आहे. तेच याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर २४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच दरम्यान राज्य सरकारने राज्यात कलम १४४ लावून जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली. त्यानुसार पोलीस विभाग, कायद्याचे पालन व्हावे म्हणून त्वरीत कार्यरत झाला. एकीकडे कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागाला सतत तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याच वेळी जनतेला अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. अशात तालुक्यामध्ये समन्वय साधून समतोल राखण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी व तालुक्याच्या पालक म्हणून तहसीलदाराने सर्व विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधणे व समन्वयातून समस्येवर समाधान काढण्याची गरज आहे. परंतु त्यांचेच याकडे दुर्लक्ष झाले असल्याची ओरड सुरू आहे.धान्य वाटपाची अद्यावत माहिती नाहीसालेकसा तालुक्यात एकूण ८७ गावात स्वस्त धान्य दुकान असून या दुकानाच्या माध्यमातून प्रत्येक गरजू लाभार्थ्याला धान्य वाटप केले जाते. या महिन्यात आतापर्यंत कोणत्या स्वस्त धान्य दुकानदाराने किती लाभार्थ्यांना धान्य वाटप केले किती लोकांनी धान्य खरेदी केले नाही याची अद्यावत माहिती सुध्दा तहसीलदारांकडे नसल्याचे चित्र आहे. ज्यांनी धान्य नेले नाही त्यानी अडचण कायम आहे. हे सुध्दा जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांच्याद्वारे जे सांगीतले जाते त्यात मोठी तफावत आहे.स्वयंसेवी संस्थाचा पुढाकारतालुक्यातील काही स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने मागील दहा दिवसांपासून दररोज गरजू गरीब लोकांना धान्य व जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले जात आहे. गावात थेट लोकांशी भेटून त्यांना मदत दिली जात आहे व त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.