शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

तालुका प्रशासनाने जनतेला सोडले वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर २४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच दरम्यान राज्य सरकारने राज्यात कलम १४४ लावून जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली. त्यानुसार पोलीस विभाग, कायद्याचे पालन व्हावे म्हणून त्वरीत कार्यरत झाला. एकीकडे कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागाला सतत तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देतहसीलदार, बीडीओचे दुर्लक्ष : स्वयंसेवी संस्थाकडूनच गरजूंना मदत

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : संपूर्ण देशासह राज्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना शहरापासून गावाकडे ही पोहचू लागला आहे.अशात आपल्या तालुक्यात संसर्ग होणार नाही. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज स्थानिक प्रशासनावर आहे. मात्र ज्यांच्यावर जवाबदारी आहे. तेच याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर २४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच दरम्यान राज्य सरकारने राज्यात कलम १४४ लावून जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली. त्यानुसार पोलीस विभाग, कायद्याचे पालन व्हावे म्हणून त्वरीत कार्यरत झाला. एकीकडे कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागाला सतत तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याच वेळी जनतेला अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. अशात तालुक्यामध्ये समन्वय साधून समतोल राखण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी व तालुक्याच्या पालक म्हणून तहसीलदाराने सर्व विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधणे व समन्वयातून समस्येवर समाधान काढण्याची गरज आहे. परंतु त्यांचेच याकडे दुर्लक्ष झाले असल्याची ओरड सुरू आहे.धान्य वाटपाची अद्यावत माहिती नाहीसालेकसा तालुक्यात एकूण ८७ गावात स्वस्त धान्य दुकान असून या दुकानाच्या माध्यमातून प्रत्येक गरजू लाभार्थ्याला धान्य वाटप केले जाते. या महिन्यात आतापर्यंत कोणत्या स्वस्त धान्य दुकानदाराने किती लाभार्थ्यांना धान्य वाटप केले किती लोकांनी धान्य खरेदी केले नाही याची अद्यावत माहिती सुध्दा तहसीलदारांकडे नसल्याचे चित्र आहे. ज्यांनी धान्य नेले नाही त्यानी अडचण कायम आहे. हे सुध्दा जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांच्याद्वारे जे सांगीतले जाते त्यात मोठी तफावत आहे.स्वयंसेवी संस्थाचा पुढाकारतालुक्यातील काही स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने मागील दहा दिवसांपासून दररोज गरजू गरीब लोकांना धान्य व जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले जात आहे. गावात थेट लोकांशी भेटून त्यांना मदत दिली जात आहे व त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.