शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

तालुका प्रशासनाने जनतेला सोडले वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर २४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच दरम्यान राज्य सरकारने राज्यात कलम १४४ लावून जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली. त्यानुसार पोलीस विभाग, कायद्याचे पालन व्हावे म्हणून त्वरीत कार्यरत झाला. एकीकडे कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागाला सतत तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देतहसीलदार, बीडीओचे दुर्लक्ष : स्वयंसेवी संस्थाकडूनच गरजूंना मदत

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : संपूर्ण देशासह राज्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना शहरापासून गावाकडे ही पोहचू लागला आहे.अशात आपल्या तालुक्यात संसर्ग होणार नाही. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज स्थानिक प्रशासनावर आहे. मात्र ज्यांच्यावर जवाबदारी आहे. तेच याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर २४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच दरम्यान राज्य सरकारने राज्यात कलम १४४ लावून जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली. त्यानुसार पोलीस विभाग, कायद्याचे पालन व्हावे म्हणून त्वरीत कार्यरत झाला. एकीकडे कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागाला सतत तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याच वेळी जनतेला अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. अशात तालुक्यामध्ये समन्वय साधून समतोल राखण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी व तालुक्याच्या पालक म्हणून तहसीलदाराने सर्व विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधणे व समन्वयातून समस्येवर समाधान काढण्याची गरज आहे. परंतु त्यांचेच याकडे दुर्लक्ष झाले असल्याची ओरड सुरू आहे.धान्य वाटपाची अद्यावत माहिती नाहीसालेकसा तालुक्यात एकूण ८७ गावात स्वस्त धान्य दुकान असून या दुकानाच्या माध्यमातून प्रत्येक गरजू लाभार्थ्याला धान्य वाटप केले जाते. या महिन्यात आतापर्यंत कोणत्या स्वस्त धान्य दुकानदाराने किती लाभार्थ्यांना धान्य वाटप केले किती लोकांनी धान्य खरेदी केले नाही याची अद्यावत माहिती सुध्दा तहसीलदारांकडे नसल्याचे चित्र आहे. ज्यांनी धान्य नेले नाही त्यानी अडचण कायम आहे. हे सुध्दा जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांच्याद्वारे जे सांगीतले जाते त्यात मोठी तफावत आहे.स्वयंसेवी संस्थाचा पुढाकारतालुक्यातील काही स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने मागील दहा दिवसांपासून दररोज गरजू गरीब लोकांना धान्य व जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले जात आहे. गावात थेट लोकांशी भेटून त्यांना मदत दिली जात आहे व त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.