शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

पदव्युत्तर पदवी प्रवेश केंद्रीय ऑनलाइन माध्यमातूनच घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:29 IST

गोंदिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदव्युत्तरचे प्रवेश सुरू झाले असून, गेल्या सन २०१८ पासून सुरळीत व पारदर्शकपणे ...

गोंदिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदव्युत्तरचे प्रवेश सुरू झाले असून, गेल्या सन २०१८ पासून सुरळीत व पारदर्शकपणे सुरू असलेल्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश पद्धतीचा विनाकारण त्याग करून पुन्हा महाविद्यालयस्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविण्याची पद्धती अवलंबिली आहे. कोरोना काळात ऑनलाइन पद्धतीचा वापर न करता उलट ऑफलाइन पद्धतीचा वापर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करायला लावून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विदर्भ स्टुडंट अँड यूथ ऑर्गनायझेशनने केला आहे.

मागील ३ वर्षांपासून एकाच केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी आपल्या राहत्या ठिकाणावरून दुसऱ्या राज्यातील किंवा ग्रामीण गडचिरोली, गोंदिया, भंडारा व वर्धा जिल्ह्यांतील विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करायचे. त्यात त्यांना एकदाच २०० रुपये भरावे लागायचे. गुणवत्ता यादी लागली की, आवडीच्या महाविद्यालयाचे पसंती क्रम ऑनलाइनच टाकून प्रवेश निश्चित करावे लागायचे. यात विद्यापीठ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लेटर देऊन महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी सांगायचे. संपूर्ण विद्यापीठात एकच पद्धती असल्याने महाविद्यालयांची मनमानी न चालता गुणवत्तेनुसार वेळेत प्रवेश व्हायचे. गेल्या वर्षीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत जवळपास २२ हजार विद्यार्थ्यांनी घरूनच ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यात मागास विद्यार्थ्यांना फक्त २०० रुपये, तर इतर विद्यार्थ्यांना ३०० रुपये भरावे लागायचे. या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमुळे काही खाजगी महाविद्यालयांतर्फे होणारा घोडा बाजार बंद झालेला होता. आता काही महाविद्यालयांत प्रवेश फुल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्व सेटअप असताना व कुठलेच ठोस कारण नसताना विद्यापीठाने केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे घेण्यात येणारी प्रवेश पद्धती रद्द का केली? कोरोना काळात ऑनलाइन पद्धतीचा आग्रह असताना विद्यापीठ ऑफलाइन पद्धती वापरून विद्यार्थ्यांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास देत आहे. विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर पदवी प्रवेश केंद्रीय ऑनलाइन माध्यमातूनच घ्या, अशी मागणी विदर्भ स्टुडंट अँड यूथ ऑर्गनायझेशनचे संयोजक अनिकेत मते यांनी केली आहे.

..........

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पायपीट

महाराष्ट्र शासनातर्फे सीईटी घेऊन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश देत असतात त्याच पद्धतीने ही पद्धती वापरल्याने विद्यार्थ्यांचे पैसे वाचायचे व वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायची. प्रत्येक महाविद्यालयात जाऊन भरावे लागणाऱ्या अर्जाचा व गावावरून येण्या-जाण्याचा खर्च वाचायचा व पारदर्शकता असल्याने भ्रष्टाचार व्हायचा नाही; परंतु यावर्षी फक्त विद्यापीठाच्या ४२ विभागांसाठी ही पद्धती असून, इतर महाविद्यालयांसाठी ही ऑनलाइन केंद्रीय पद्धती पूर्णपणे बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक महाविद्यालयात वेगवेगळे फॉर्म भरावे लागत आहेत.