शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 21:58 IST

अलीकडच्या काळात वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मानवी वस्तीतही त्यांचा हैदोस वाढला आहे. शेतकरी आधुनिक व परंपरागत पद्धतीने शेती करतो. परंतु वानरांचे कळपाने येवून शेत पिकांचे नुकसान करतात.

ठळक मुद्देक्षीरसागर यांची मागणी : २५ सरपंचांच्या स्वाक्षरीचे कृषी व वनमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अलीकडच्या काळात वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मानवी वस्तीतही त्यांचा हैदोस वाढला आहे. शेतकरी आधुनिक व परंपरागत पद्धतीने शेती करतो. परंतु वानरांचे कळपाने येवून शेत पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी नसबंदी हा उत्तम उपाय असल्याचे चिखली निवासी अशोकुमार क्षीरसागर यांनी म्हटले आहे. यासाठी परिसरात जनजागृती करुन २५ सरपंचांच्या स्वाक्षरीचे निवेदन राज्याचे कृषी व वनमंत्री यांना पाठविले आहे.वानरांपासून घरांचे कवेलू भाजीपाला, फळे, जवस, लाखोळी, तूर इत्यादीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ते थांबणे गरजेचे आहे. ही बाब समजून घेत चिखलीचे सरपंच कैलाश पटले, भिवापूरचे सिद्धार्थ रंगारी, इंदोराच्या हेमलता खोब्रागडे, निमगावचे मनोहर फरकुडे, खमारीचे रमेश रहांगडाले, डोंगरगावचे दिलीपकुमार बिसेन, सुकडी-डाकरामच्या चेतना बावनथडे, ठाणेगावचे तिर्थराज बागडे, गराडाच्या ललीता टिलगामे, मलपुरीचे लच्छु बिसेन, बिरसी फाटाच्या पद्मा वैद्य, लाखेगावचे नरेश जुनेवार, विहीरगावच्या अनुसया इळपाते, बोपेसरचे छत्रपती नागपूरे, सरांडीच्या शोभा कांबडी, पांजराचे राजेंद्र चामट, मुंडीकोटाच्या निर्मला भांडारकर, नवेगाव खुर्दच्या मंदा कुंभरे, घोगराचे रुपेश भोंडेकर, घाटकुरोडाच्या निर्मला डोंगरवार, चांदोरीचे जयसिंग उपासे, बिरोलीच्या जयश्री बाभरे, सालेबर्डीचे विनोद लिल्हारे, मांडवीचे दुर्गाप्रसाद दमाहे, मुंडीपारच्या शिला साठवणे, मेंदीपूरच्या मुक्ता रहांगडाले या सर्व सरपंचांनी क्षीरसागर यांच्या योजनेला पाठींबा दर्शवून स्वाक्षरी दिली.ही जनजागरण मोहीम मागील ७ वर्षापासून सुरु केली असून याबाबत आमदार विजय रहांगडाले यांनाही माहिती दिली. मंत्रालयातून या मोहिमेला प्राधान्य देत शासनाकडून याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. अशी नसबंदी अन्य राज्यात करण्यात येत असून बंदराच्या संख्येवर आळा घालण्यात येत आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा याची अंमलबजावणी करुन यामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याची मागणी क्षीरसागर यांनी कृषी व वनमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Monkeyमाकड