शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 21:58 IST

अलीकडच्या काळात वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मानवी वस्तीतही त्यांचा हैदोस वाढला आहे. शेतकरी आधुनिक व परंपरागत पद्धतीने शेती करतो. परंतु वानरांचे कळपाने येवून शेत पिकांचे नुकसान करतात.

ठळक मुद्देक्षीरसागर यांची मागणी : २५ सरपंचांच्या स्वाक्षरीचे कृषी व वनमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अलीकडच्या काळात वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मानवी वस्तीतही त्यांचा हैदोस वाढला आहे. शेतकरी आधुनिक व परंपरागत पद्धतीने शेती करतो. परंतु वानरांचे कळपाने येवून शेत पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी नसबंदी हा उत्तम उपाय असल्याचे चिखली निवासी अशोकुमार क्षीरसागर यांनी म्हटले आहे. यासाठी परिसरात जनजागृती करुन २५ सरपंचांच्या स्वाक्षरीचे निवेदन राज्याचे कृषी व वनमंत्री यांना पाठविले आहे.वानरांपासून घरांचे कवेलू भाजीपाला, फळे, जवस, लाखोळी, तूर इत्यादीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ते थांबणे गरजेचे आहे. ही बाब समजून घेत चिखलीचे सरपंच कैलाश पटले, भिवापूरचे सिद्धार्थ रंगारी, इंदोराच्या हेमलता खोब्रागडे, निमगावचे मनोहर फरकुडे, खमारीचे रमेश रहांगडाले, डोंगरगावचे दिलीपकुमार बिसेन, सुकडी-डाकरामच्या चेतना बावनथडे, ठाणेगावचे तिर्थराज बागडे, गराडाच्या ललीता टिलगामे, मलपुरीचे लच्छु बिसेन, बिरसी फाटाच्या पद्मा वैद्य, लाखेगावचे नरेश जुनेवार, विहीरगावच्या अनुसया इळपाते, बोपेसरचे छत्रपती नागपूरे, सरांडीच्या शोभा कांबडी, पांजराचे राजेंद्र चामट, मुंडीकोटाच्या निर्मला भांडारकर, नवेगाव खुर्दच्या मंदा कुंभरे, घोगराचे रुपेश भोंडेकर, घाटकुरोडाच्या निर्मला डोंगरवार, चांदोरीचे जयसिंग उपासे, बिरोलीच्या जयश्री बाभरे, सालेबर्डीचे विनोद लिल्हारे, मांडवीचे दुर्गाप्रसाद दमाहे, मुंडीपारच्या शिला साठवणे, मेंदीपूरच्या मुक्ता रहांगडाले या सर्व सरपंचांनी क्षीरसागर यांच्या योजनेला पाठींबा दर्शवून स्वाक्षरी दिली.ही जनजागरण मोहीम मागील ७ वर्षापासून सुरु केली असून याबाबत आमदार विजय रहांगडाले यांनाही माहिती दिली. मंत्रालयातून या मोहिमेला प्राधान्य देत शासनाकडून याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. अशी नसबंदी अन्य राज्यात करण्यात येत असून बंदराच्या संख्येवर आळा घालण्यात येत आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा याची अंमलबजावणी करुन यामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याची मागणी क्षीरसागर यांनी कृषी व वनमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Monkeyमाकड