शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 21:58 IST

अलीकडच्या काळात वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मानवी वस्तीतही त्यांचा हैदोस वाढला आहे. शेतकरी आधुनिक व परंपरागत पद्धतीने शेती करतो. परंतु वानरांचे कळपाने येवून शेत पिकांचे नुकसान करतात.

ठळक मुद्देक्षीरसागर यांची मागणी : २५ सरपंचांच्या स्वाक्षरीचे कृषी व वनमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अलीकडच्या काळात वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मानवी वस्तीतही त्यांचा हैदोस वाढला आहे. शेतकरी आधुनिक व परंपरागत पद्धतीने शेती करतो. परंतु वानरांचे कळपाने येवून शेत पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी नसबंदी हा उत्तम उपाय असल्याचे चिखली निवासी अशोकुमार क्षीरसागर यांनी म्हटले आहे. यासाठी परिसरात जनजागृती करुन २५ सरपंचांच्या स्वाक्षरीचे निवेदन राज्याचे कृषी व वनमंत्री यांना पाठविले आहे.वानरांपासून घरांचे कवेलू भाजीपाला, फळे, जवस, लाखोळी, तूर इत्यादीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ते थांबणे गरजेचे आहे. ही बाब समजून घेत चिखलीचे सरपंच कैलाश पटले, भिवापूरचे सिद्धार्थ रंगारी, इंदोराच्या हेमलता खोब्रागडे, निमगावचे मनोहर फरकुडे, खमारीचे रमेश रहांगडाले, डोंगरगावचे दिलीपकुमार बिसेन, सुकडी-डाकरामच्या चेतना बावनथडे, ठाणेगावचे तिर्थराज बागडे, गराडाच्या ललीता टिलगामे, मलपुरीचे लच्छु बिसेन, बिरसी फाटाच्या पद्मा वैद्य, लाखेगावचे नरेश जुनेवार, विहीरगावच्या अनुसया इळपाते, बोपेसरचे छत्रपती नागपूरे, सरांडीच्या शोभा कांबडी, पांजराचे राजेंद्र चामट, मुंडीकोटाच्या निर्मला भांडारकर, नवेगाव खुर्दच्या मंदा कुंभरे, घोगराचे रुपेश भोंडेकर, घाटकुरोडाच्या निर्मला डोंगरवार, चांदोरीचे जयसिंग उपासे, बिरोलीच्या जयश्री बाभरे, सालेबर्डीचे विनोद लिल्हारे, मांडवीचे दुर्गाप्रसाद दमाहे, मुंडीपारच्या शिला साठवणे, मेंदीपूरच्या मुक्ता रहांगडाले या सर्व सरपंचांनी क्षीरसागर यांच्या योजनेला पाठींबा दर्शवून स्वाक्षरी दिली.ही जनजागरण मोहीम मागील ७ वर्षापासून सुरु केली असून याबाबत आमदार विजय रहांगडाले यांनाही माहिती दिली. मंत्रालयातून या मोहिमेला प्राधान्य देत शासनाकडून याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. अशी नसबंदी अन्य राज्यात करण्यात येत असून बंदराच्या संख्येवर आळा घालण्यात येत आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा याची अंमलबजावणी करुन यामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याची मागणी क्षीरसागर यांनी कृषी व वनमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Monkeyमाकड