शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

बाहेरून आलेल्यांवर उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

मुंबई येथून जिल्ह्यात आलेल्या मजुरामुळे अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, गोरेगाव, सालेकसा व आमगाव तालुक्यांत आतापर्यंत ४० च्या घरात रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुुर्भाव लक्षात घेत त्यावर प्रतिबंध लावणे आवश्यक आहे. त्यासाठी पहिल्यांदा कंटोनमेंट आणि बफर झोनमध्ये असलेल्या गावांमधील आवागमन थांबविणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे सरपंचांना पत्र । ग्राम समित्यांवर सोपविली जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : जिल्ह्यात ४० च्या घरात कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यात मुंबई व पुणे या सारख्या रेडझोन मधून मोठ्या प्रमाणात मजूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात गावात आलेल्या व्यक्तीवर ग्रामपंचायत स्तरावर विशेष लक्ष ठेवून उपायोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने सरपंचाना पत्र देऊन केल्या आहेत.मुंबई येथून जिल्ह्यात आलेल्या मजुरामुळे अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, गोरेगाव, सालेकसा व आमगाव तालुक्यांत आतापर्यंत ४० च्या घरात रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुुर्भाव लक्षात घेत त्यावर प्रतिबंध लावणे आवश्यक आहे. त्यासाठी पहिल्यांदा कंटोनमेंट आणि बफर झोनमध्ये असलेल्या गावांमधील आवागमन थांबविणे आवश्यक आहे. गावात फिरताना नाका तोंडावर मास्क, रूमाल, गमछा, दुपट्टा लावणार नाही अशा नागरिकांकडुन दंड वसूल करण्यात यावे. तसेच गावात कुणी थुंकताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सूचविण्यात आले आहे. एखाद्या नागरिकाने नियमाचे वारंवार उल्लंघन केल्यास त्याच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता १७६० च्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. संस्थात्मक किंवा घरात क्वारंटाईन असणाऱ्यांनी नियम न पाळल्यास त्याच्याविरूद्ध एकावेळी पाच हजार रूपये इतकी दंडनीय कारवाई करण्यात यावी. एखाद्या व्यक्तीने वारंवार नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८ साथरोग अधिनियम १८९७ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रातून बेकायदेशीररित्या बाहेर पडल्यास अशा व्यक्तीकडून पाच हजार रूपये दंड वसूल करण्यात यावा असेही नमूद करण्यात आले असून या अधिकाराचा वापर ग्रामपंचायतस्तरीय समितीला करता येणार आहे.या व्यतिरिक्त याबाबींविषयी दंड वसूल करण्याचे आणि गुन्हा दाखल करण्याचे अधिकार महसूल, पोलीस, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. सदरची कारवाई प्रत्येक गावात होते किंवा नाही हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे. ग्राम समित्यांनी त्यांना सोपविण्यात आलेल्या जवाबदाºयांविषयी हलगर्जीपणा अथवा दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर नाईलाजास्त व कठोर कारवाई करावी लागेल असेही पत्रात नमुद केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या