शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

शौचालयांचे उद्दिष्ट डिसेंबरपर्यंत गाठा

By admin | Updated: July 9, 2015 01:30 IST

एक माणूस जग बदलू शकतो. मनापासून कार्य केले तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही.

गोंदिया : एक माणूस जग बदलू शकतो. मनापासून कार्य केले तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही. स्वच्छतेच्या बाबतीत जगातल्या दहा गलिच्छ देशात आपल्या देशाचा समावेश आहे. ही बाब फार लाजिरवाणी आहे. देशाला निर्मल करण्यासाठी ग्रामसेवकांनी वैयक्तिक शौचालय बांधकाम व त्याच्या वापरावर भर देऊन डिसेंबर अखेरपर्यंत नियोजित उद्दिष्ट गाठा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम यांनी केले.स्थानिक जिल्हा परिषद सभागृहात मंगळवार (दि.७) जिल्ह्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आपल्या मार्गदर्शनात ते पुढे म्हणाले, वर्तमानात कार्य केले तर भविष्य चांगले होते. शासन आपल्याला सर्वकाही देते, याची जाणीव ठेवा. आपण ज्या लोकांसाठी कार्य करतो, ते आपले बांधवच आहेत. त्यामुळे जीव ओतून कार्य करा. नियोजित उद्दिष्ट साध्य करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. ग्रामसेवकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी याप्रसंगी दिली. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील आठही पंचायत समिती अंतर्गत ३१ हजार ६२८ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. वार्षिक कृती आराखड्यात समाविष्ट तथा कृती आराखड्यात समाविष्ट नसलेल्या ग्रामपंचायतींमध्येसुद्धा वैयक्तीक शौचालयांचे बांधकाम करता येते. वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपयांचा प्रोत्साहन निधी देण्यात येतो. याप्रसंगी प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय बांधकामाचा आढावा घेण्यात आला. ग्रामसेवकांनी त्यांच्या ग्रामपंचायतीचे उद्दिष्ट, आतापर्यंत पूर्ण झालेले बांधकाम तथा शिल्लक बांधकामाचे नियोजन सादर केले. केवळ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करूनच चालणार नाही, तर त्याचा वापर व्हायला पाहिजे. पूर्ण झालेल्या बांधकामाचे आॅनलाईन करण्याचे निर्देशसुद्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम यांनी याप्रसंगी दिले. दरम्यान ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण, तालुकाध्यक्ष पृथ्वीराज कोल्हटकर यांनी नियोजित कालावधीत शौचालयांचे बांधकाम करण्याची ग्वाही देवून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले. याप्रसंगी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सर्व तज्ज्ञ, सल्लागार उपस्थित होते. (प्रतिनिधी)