शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

नूतन विद्यालयाच्या संचालक मंडळावर कारवाई करा

By admin | Updated: October 5, 2015 02:05 IST

नूतन महाराष्ट्र विद्या विकास मंडळ या संस्थेचे सचिव रविंद्र भालेराव यांनी शाळेमध्ये शिक्षकाची नौकरी लावून देतो म्हणून २७ लोकांकडून १.२० कोटी रूपये गोळा केले. ...

पत्रपरिषद : अन्यथा मालमत्ता गोठवा भंडारा : नूतन महाराष्ट्र विद्या विकास मंडळ या संस्थेचे सचिव रविंद्र भालेराव यांनी शाळेमध्ये शिक्षकाची नौकरी लावून देतो म्हणून २७ लोकांकडून १.२० कोटी रूपये गोळा केले. काहिंना शाळा सुधार निधीसाठी पैसे द्यावे लागतात असे सांगितले. या संपूर्ण प्रकरणात संस्थेचे पदाधिकारी लिप्त असून विद्यालयाच्या संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी पिडितांनी आज दुपारी २.३० वाजता विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत केली.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर संस्थेचे अध्यक्ष मुकुंद वझलवार व संचालकद राधेश्याम लाहोटी यांनी रविंद्र भालेराव यांचा संस्थेशी काही सबंध नाही, असे सांगितले. प्रत्यक्षरीत्या संस्था व शाळेच्या नावावर सचिवाने सन २००९ पासून केलेल्या कार्याची व संबंधित पीडितांनी याची माहिती दोघांना वेळीच दिली होती. आता, सचिवाचा संस्थेशी काहीच सबंध नाही असे म्हणने सपेशल चुकीचे आहे. रवीन्द्र भालेराव हे संस्थेचे सचिव असल्यामुळे त्यांनी सदर रक्कम स्वीकारली. याची कल्पना वझलवार यांना होती. तसेच २०१० मध्ये काही पिडितांच्या पाल्यांबरोबर जानेवारी २०१० मध्ये घेतलेल्या उमेदवारांपैकी केवळ एन.आर. डोकरीमारे,, एस.ए. नागपुरे, ओ.पी. खंडाईत, ए.पी. सुरदुसे यानांच नियुक्ती आदेश देण्यात आले. डोकरीमारे, नागपुरे यांची नेमणूक केवळ अध्यक्षांच्या मर्जीनुसार झाली असल्याचेही पीडितांनी निवेदनात नूाुद केले आहे. तसेच याचीसुद्धा चौकशी संस्थेने केली काय, असा सवालही उपस्थित केला आहे.संचालक मंडळाने दिशाभूल न करता सर्व पीडितांचे पैसे परत करावेत अन्यथा शासनाने संस्थेची, शाळेची मालमत्ता व संस्थेच्या संचालक मंडळाची मालमत्ता ताब्यात घेऊन पैसे परत करावे, तसेच अन्य सदस्यांविरूद्ध गुन्हा दाखल अटक करावी, अशी मागणी केली आहे. पत्रपरिषदेला रा.न. श्रावणकर, पुंडलिक मानकर, रामचंद्र लांडगे, कल्पना गिऱ्हेपुंजे, झितेश वैरागडे, दिलीप कुळकर्णी, सुभाष बडवाईक, यशवंत पंचबुद्धे, एकनाथ हटवार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)