शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

ग्रामसेविका व खंडविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: April 18, 2015 00:43 IST

घरकुलाचा लाभ मिळाला नसतानाही संबंधित लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचे दर्शविण्यात आले. ..

बटाणा येथील नागरिकांची मागणी : शासनाला पुरविली खोटी माहिती गोंदिया : घरकुलाचा लाभ मिळाला नसतानाही संबंधित लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचे दर्शविण्यात आले. तशी शासनास खोटी माहिती पुरविणाऱ्या बटाणा ग्रामपंचायतचे सचिव व त्यांना पाठिशी घालणाऱ्या पंचायत समितीच्या खंड विकास अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोंदिया तालुकांतर्गत येणाऱ्या बटाणा येथील ग्रामस्थांनी व बौद्ध समाजबांधवांनी प्रशासनाकडे केली आहे.बटाणा येथील बीपीएलधारक किशोर रामटेके व अरविंद रामटेके यांना आतापर्यंत शासनाच्या कोणत्याही घरकूल योजनेचा लाभ मिळाला नाही. तरीपण सदर लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याची खोटी माहिती येथील ग्रामसेवकाने प्रशासनास सादर केली. याबाबत माहिती अधिकारात मागणी केल्यानंतर त्यात सदर लाभार्थ्यांना यापूर्वी कोणताही घरकुलाचा लाभ मिळाला नाही, हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सदर लाभार्थ्यांना आजपर्यंत कोणतेही घरकुलाचे लाभ मिळालेले नाही, तरीपण येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली येवून येथील ग्रामसेवकाने प्रशासनास सदर लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याची खोटी माहिती सादर केली आहे. आता सदर लाभार्थ्यांना यापूर्वी लाभ मिळाले म्हणून पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी वालकर यांनीसुद्धा या प्रकरणाची चौकशी न करता तालुक्यात नवबौद्ध बीपीएल धारकांची प्रतीक्षायादी संपली आहे, अशी खोटी माहिती प्रशासनास सादर केली आहे. मात्र एकट्या गोंदिया तालुक्यात अन्याय झालेले जवळपास ५०० च्यावर नवबौद्ध बीपीएलधारक घरकुलाच्या लाभापासून वंचित ठरले आहेत.सध्या राज्याचे समाजकल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राजकुमार बडोले कार्यभार सांभाळत आहेत. नुकताच संपूर्ण जिल्ह्याभर सामाजिक सप्ताह राबविण्यात आला. मात्र याच सप्ताहात गरीब बीपीएल धारकांवर प्रशासनाकडून अन्याय करण्यात आला आहे. राज्याचे समाजकल्याण मंत्री हे मागासवर्गीय समाजातील असतानासुद्धा जिल्ह्यातील मागासवर्गीयांवर अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासनाचे भय उरले नाही, अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. सदर प्रकरणाची तक्रार राज्यपाल, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यापूर्वी अनेकवेळा करण्यात आली आहे. परंतु अद्यापही अन्यायग्रस्त नवबौद्ध नागरिकांना न्याय मिळाला नाही. सदर प्रकरणाची त्वरित चौकशी करून अन्यायग्रस्तांना लाभ मिळवून देण्यात यावा व दोषींवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बटाणा येथील किशोर रामटेके, अरविंद रामटेके, सर्व ग्रामस्थ व बौद्ध समाजातील सर्व नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा उपोषण करण्याचा इशारासुद्धा त्यांनी प्रशासनास दिला आहे. (प्रतिनिधी)