शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: July 29, 2016 01:52 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेले भवन पाडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निवेदन ...

आंबेडकरीबांधवांची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन अर्जुनी-मोरगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेले भवन पाडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निवेदन सोमवारी (दि.२५) उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांना देण्यात आले. डॉ.आंबेडकरांनी मोठ्या कष्ट व मेहनतीने इमारत उभारली. यातून दलीत बहुजन समाजाचे नष्टचर्य संपविण्यासाठी वैचारिक क्रांतीची सुरूवात करण्यात आली, बुध्दभूषण प्रेसची स्थापना करून बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राची सुरूवात झाली. ही साधीसुधी इमारत नसून आंबेडकरी चळवळीचे केंद्र होते. यात कित्येक लोकांच्या भावना जुळल्या होत्या. त्यांचा विचार न करता रत्नाकर गायकवाड सारख्या आंबेडकर विरोधी माणसाने भाडोत्री गुंडाना घेऊन आंबेडकरी चळवळीचे केंद्रच उद्वस्त केले. देशाच्या घटनाकाराच्या कार्याचा गौरव करणे, सोडून केलेली ही कृती अपमानास्पद आहे. लांच्छनास्पद कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. उप विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना दिलवर रामटेके, दामू ड्रमाने, नंदकुमार खोब्रागडे, बादल राऊत, मनिषा शहारे, माधुरी जांभूळकर, रशिका साखरे, रक्षा शहारे, ज्ञानू प्रधान, गिरीश रंगारी, प्रियाशिल ताठोड, भाऊराव भोगाने, अक्षय वालदे व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)