शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: July 4, 2016 01:31 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसची वास्तू जमीनदोस्त ...

आंबेडकर भवनासाठी जनाक्रोश : एसडीओ व तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनुेबोंडगावदेवी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसची वास्तू जमीनदोस्त करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन तालुका भारिप बहुजन महासंघाच्या वतीने अर्जुनी-मोरगावचे उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांना देण्यात आले.दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्यासाठी आंबेडकर भवनाची निर्मिती केली होती. त्या भवनाशी आंबेडकरी अनुयायांचे भावनिक नाते जुडले आहे. आंबेडकरी समाजासाठी ते भवन एक आदर्श होते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या वास्तू रात्रीच्या वेळी जमीनदोस्त करण्यात आले. सदर कृत्याचे तालुका भारिप बहुजन महासंघ तसेच आंबेडकरी जनतेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. आंबेडकर भवन तसेच बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस उध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. त्या कृत्याच्या निषेधार्थ तालुका बंद ठेवण्याचा इशारासुद्धा कार्यकर्त्यांनी दिला आहे. निवेदन देताना तालुका भारिप बहुजन महासंघाचे ताराचंद सुखदेवे, गौतम रामटेके, प्रकाश टेंभुर्णे, प्रफुल्ल तुरकर, शांतिप्रकाश भैसारे, दीपक चवरे, अशोक खोब्रागडे, विजय सांगोडे, मयूर खोब्रागडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.आमगाव २५ जून रोजी मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन असामाजिक तत्वांनी उध्वस्त केले. त्यांना अटक करून त्वरित कारवाई करण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व सर्व आंबेडकरी जनतेने मुख्यमंत्री यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देवून केली आहे. निवेदनानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९४४ मध्ये मुंबईत चित्रा टॉकिजजवळ दादर येथे आंबेडकर भवनाची निर्मिती केली होती. या इमारतीत समता सैनिक दल, भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा यासारख्या सामाजिक संस्थांचे कार्यालये आहेत. या संस्था समाजात चांगले कार्य करीत असल्यामुळे समाज व राजकारणात प्रभाव वाढत आहे. हा वाढता प्रभाव काही असामाजिक तत्वधाऱ्यांना सहन झाला नाही. आपण वैचारिक लढाई जिंकू शकणार नाही त्यामुळे त्यांना असुरक्षितपणा वाटू लागला. वाढता प्रभाव सहन न झाल्यामुळेच २५ जून रोजी पहाटे २.३० ते ३ वाजताच्या दरम्यान रत्नाकर गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक भवन पाडण्याचे असामाजिक कार्य केले. त्यामुळे देशभरात असंतोषाची भावना निर्माण झाली असून संपूर्ण जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. सदर भवन पाडण्यासाठी ज्यांनी सहभाग घेतला, त्या सर्व आरोपींना अटक करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना एस.टी. भालेकर, संदीप मेश्राम, चंद्रभान कोटांगले, कविता नागदेवे, मनिषा मेश्राम, सिद्धार्थ डोंगरे, ओमप्रकाश घरडे, प्रफुल्ल मेश्राम, प्रकाश ब्राह्मणकर, सुरेश बोरकर, महेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते.