शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: July 4, 2016 01:31 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसची वास्तू जमीनदोस्त ...

आंबेडकर भवनासाठी जनाक्रोश : एसडीओ व तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनुेबोंडगावदेवी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसची वास्तू जमीनदोस्त करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन तालुका भारिप बहुजन महासंघाच्या वतीने अर्जुनी-मोरगावचे उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांना देण्यात आले.दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्यासाठी आंबेडकर भवनाची निर्मिती केली होती. त्या भवनाशी आंबेडकरी अनुयायांचे भावनिक नाते जुडले आहे. आंबेडकरी समाजासाठी ते भवन एक आदर्श होते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या वास्तू रात्रीच्या वेळी जमीनदोस्त करण्यात आले. सदर कृत्याचे तालुका भारिप बहुजन महासंघ तसेच आंबेडकरी जनतेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. आंबेडकर भवन तसेच बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस उध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. त्या कृत्याच्या निषेधार्थ तालुका बंद ठेवण्याचा इशारासुद्धा कार्यकर्त्यांनी दिला आहे. निवेदन देताना तालुका भारिप बहुजन महासंघाचे ताराचंद सुखदेवे, गौतम रामटेके, प्रकाश टेंभुर्णे, प्रफुल्ल तुरकर, शांतिप्रकाश भैसारे, दीपक चवरे, अशोक खोब्रागडे, विजय सांगोडे, मयूर खोब्रागडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.आमगाव २५ जून रोजी मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन असामाजिक तत्वांनी उध्वस्त केले. त्यांना अटक करून त्वरित कारवाई करण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व सर्व आंबेडकरी जनतेने मुख्यमंत्री यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देवून केली आहे. निवेदनानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९४४ मध्ये मुंबईत चित्रा टॉकिजजवळ दादर येथे आंबेडकर भवनाची निर्मिती केली होती. या इमारतीत समता सैनिक दल, भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा यासारख्या सामाजिक संस्थांचे कार्यालये आहेत. या संस्था समाजात चांगले कार्य करीत असल्यामुळे समाज व राजकारणात प्रभाव वाढत आहे. हा वाढता प्रभाव काही असामाजिक तत्वधाऱ्यांना सहन झाला नाही. आपण वैचारिक लढाई जिंकू शकणार नाही त्यामुळे त्यांना असुरक्षितपणा वाटू लागला. वाढता प्रभाव सहन न झाल्यामुळेच २५ जून रोजी पहाटे २.३० ते ३ वाजताच्या दरम्यान रत्नाकर गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक भवन पाडण्याचे असामाजिक कार्य केले. त्यामुळे देशभरात असंतोषाची भावना निर्माण झाली असून संपूर्ण जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. सदर भवन पाडण्यासाठी ज्यांनी सहभाग घेतला, त्या सर्व आरोपींना अटक करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना एस.टी. भालेकर, संदीप मेश्राम, चंद्रभान कोटांगले, कविता नागदेवे, मनिषा मेश्राम, सिद्धार्थ डोंगरे, ओमप्रकाश घरडे, प्रफुल्ल मेश्राम, प्रकाश ब्राह्मणकर, सुरेश बोरकर, महेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते.