शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: July 4, 2016 01:31 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसची वास्तू जमीनदोस्त ...

आंबेडकर भवनासाठी जनाक्रोश : एसडीओ व तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनुेबोंडगावदेवी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसची वास्तू जमीनदोस्त करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन तालुका भारिप बहुजन महासंघाच्या वतीने अर्जुनी-मोरगावचे उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांना देण्यात आले.दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्यासाठी आंबेडकर भवनाची निर्मिती केली होती. त्या भवनाशी आंबेडकरी अनुयायांचे भावनिक नाते जुडले आहे. आंबेडकरी समाजासाठी ते भवन एक आदर्श होते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या वास्तू रात्रीच्या वेळी जमीनदोस्त करण्यात आले. सदर कृत्याचे तालुका भारिप बहुजन महासंघ तसेच आंबेडकरी जनतेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. आंबेडकर भवन तसेच बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस उध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. त्या कृत्याच्या निषेधार्थ तालुका बंद ठेवण्याचा इशारासुद्धा कार्यकर्त्यांनी दिला आहे. निवेदन देताना तालुका भारिप बहुजन महासंघाचे ताराचंद सुखदेवे, गौतम रामटेके, प्रकाश टेंभुर्णे, प्रफुल्ल तुरकर, शांतिप्रकाश भैसारे, दीपक चवरे, अशोक खोब्रागडे, विजय सांगोडे, मयूर खोब्रागडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.आमगाव २५ जून रोजी मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन असामाजिक तत्वांनी उध्वस्त केले. त्यांना अटक करून त्वरित कारवाई करण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व सर्व आंबेडकरी जनतेने मुख्यमंत्री यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देवून केली आहे. निवेदनानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९४४ मध्ये मुंबईत चित्रा टॉकिजजवळ दादर येथे आंबेडकर भवनाची निर्मिती केली होती. या इमारतीत समता सैनिक दल, भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा यासारख्या सामाजिक संस्थांचे कार्यालये आहेत. या संस्था समाजात चांगले कार्य करीत असल्यामुळे समाज व राजकारणात प्रभाव वाढत आहे. हा वाढता प्रभाव काही असामाजिक तत्वधाऱ्यांना सहन झाला नाही. आपण वैचारिक लढाई जिंकू शकणार नाही त्यामुळे त्यांना असुरक्षितपणा वाटू लागला. वाढता प्रभाव सहन न झाल्यामुळेच २५ जून रोजी पहाटे २.३० ते ३ वाजताच्या दरम्यान रत्नाकर गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक भवन पाडण्याचे असामाजिक कार्य केले. त्यामुळे देशभरात असंतोषाची भावना निर्माण झाली असून संपूर्ण जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. सदर भवन पाडण्यासाठी ज्यांनी सहभाग घेतला, त्या सर्व आरोपींना अटक करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना एस.टी. भालेकर, संदीप मेश्राम, चंद्रभान कोटांगले, कविता नागदेवे, मनिषा मेश्राम, सिद्धार्थ डोंगरे, ओमप्रकाश घरडे, प्रफुल्ल मेश्राम, प्रकाश ब्राह्मणकर, सुरेश बोरकर, महेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते.