शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांना महिलांचा घेराव

By admin | Updated: April 4, 2016 05:05 IST

महालगाव प्रकरणात न्याय द्या या मागणीसाठी महालगाव येथील महिला-पुरुषांनी शनिवारी (दि.२) दुपारी २.३०

अर्जुनी-मोरगाव : महालगाव प्रकरणात न्याय द्या या मागणीसाठी महालगाव येथील महिला-पुरुषांनी शनिवारी (दि.२) दुपारी २.३० वाजता तहसीलदारांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर रविवारी (दि.३) पहाटे ३.३० च्या सुमारास नियोजन बध्द पध्दतीने पोलिसांनी तहसीलदारांची संतप्त जमावाच्या गराड्यातून सुटका केली. यात धक्काबुक्की झाल्याचे समजते. महालगाव येथे समाजमंदीर आहे. या समाज मंदीराला लागून बांधकाम करण्यात आले. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुध्द यांच्या मूर्त्या मांडण्यात आल्या. या मूर्त्या सन्मानपूर्वक सुरक्षित ठिकाणी हलविण्यात याव्या या मागणीसाठी बुधवारपासून (दि.३०) १० गावकरी स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. यावर तालुका प्रशासनातर्फे ठोस निर्णय घेण्यात आला नाही. जे निर्णय घेतले ते उपोषणकर्त्यांना मान्य नाही.आम्हाला न्याय द्या या मागणीला घेऊन शनिवारी (दि.२) महालगाव येथील सुमारे ५० महिलांनी दुपारी २.३० वाजता तहसीलदार डी.सी.बोंबर्डे यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तहसीलदारांना कक्षाबाहेर जाऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. पोलिसांना पाचारण करण्यात आले. सायंकाळ होत असताना कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. महिलांसोबत लहान मुले उपाशी असल्याने आंदोलनकर्त्यांनी स्वगावावरून स्वयंपाक करून भोजन मागविले. रात्री १२ वाजतादरम्यान तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भोजन केले. तत्पूर्वी तहसीलदारांनी एक पत्र काढून आंदोनलकर्त्यांना दिले. मात्र त्यांचे समाधान झाले नाही. रात्र जागून काढू मात्र तहसीलदारांनाही घरी जाऊ देणार नाही अशी भूमिका स्वीकारली. बंदोबस्तासाठी ठाणेदार सुनिल पाटील यांच्या नेतृत्वात रात्री १२ वाजता कुमक दाखल झाली. आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व भाजप पदाधिकारी नामदेव कापगते व डॉ. नाजुक कुंभरे यांना बोलविण्यात आले. ते रात्री २ वाजतादरम्यान पोहोचले. त्यांनी जमावाची समजूत घातली मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आंदोलनकर्ते ऐकत नाही. तहसीलदारांना कक्षाबाहेर काढायचे या उद्देशाने पहाटे ३.३५ वाजता पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सुरूवात केली. जमावाचे नेतृत्व करणारे विलास मारगाये यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही वार्ता आंदोलनकर्त्यांमध्ये पोहोचताच आंदोलनकर्ते त्या दिशेने वळले. नियोजनानुसार तहसीलदारांना घेऊन जाण्यासाठी आधीच वाहन तयार ठेवण्यात आले होते. आंदोलनकर्ते मारगायेंच्या दिशेने वळले, नेमकी ही संधी साधून पोलिस तहसीलदारांना त्या वाहनाकडे धावत-धावत घेऊन गेले. वाहनात बसून पहाटे ३.४५ चे सुमारास तहसीलदार सुरक्षीत स्थळी निघून गेले. तहसीलदार निघून गेल्याचे समजताच जमावाने मारगाये यांना परत आणून द्या, अशी मागणी पोलिसांकडे केली. अगदी काही क्षणातच त्यांना परत आणण्यात आले. तत्पूर्वी रात्री १ वाजता तहसीलदारांसाठी भोजनाचा डब्बा आणण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी हा डब्बा सुध्दा हिसकावून घेतला. रविवारी गोंदियाचे उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास इलमकर येथे दाखल झाले. खंडविकास अधिकारी नारायण जमईवार, तहसीलदार डी.सी.बोंम्बर्डे, ठाणेदार नामदेव बंडगर, सपोनी. राजेश गज्जल यांनी महालगाव येथील दोन्ही बाजूच्या लोकांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. रात्री घडलेला प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांचा येथे चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)दिशाभूल केल्याचा आरोप४मुर्ती हलविण्यासाठी उपोषण केले जात आहे. यात उपोषणकर्ते प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाऊराव खोब्रागडे, भिमराव रामटेके व गावातील एका गटाने केला आहे. १९९६-९७ पासून गट क्रमांक १७९ मधील ०.१० हे.आर. जागा बौद्ध समाजाच्या नावे सातबारा व अतिक्रमण पंजीवर नोंद आहे. याच जागेवर दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत दलितांसाठी समाजमंदीर बांधकाम झाले. या समाजमंदिराला लागून विहार बांधण्यात आले व तेथे मुर्त्या बसविण्यात आल्या. त्यामुळे परवानगीची आवश्यकता नाही. यामागे जातीयवादी शक्तींचा हात आहे. उपोषणकर्ते चूकीची मागणी करीत असताना प्रशासन सुडबुद्धीने वागत आहे. चुकीची कारवाी झाल्यास प्रशासनाविरूद्ध आंदोलन करू असे निवेदनातून स्पष्ट केले आहे.