शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

तहसील कार्यालय झाले स्वच्छ

By admin | Updated: October 26, 2015 01:52 IST

स्थानिक तहसील कार्यालयाला घाणीचा विळखा, सर्वत्र दुर्गंध व सार्वजनिक आरोग्य धोक्यात, अशा आशयाची बातमी लोकमतमध्ये प्रकाशित करण्यात आली होती.

प्रत्यक्ष पाहणीत सत्य उजागर : आमदारांनी घेतली लोकमतच्या वृत्ताची दखलतिरोडा : स्थानिक तहसील कार्यालयाला घाणीचा विळखा, सर्वत्र दुर्गंध व सार्वजनिक आरोग्य धोक्यात, अशा आशयाची बातमी लोकमतमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची आमदारांनी दखल घेतल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून तहसील कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आले. स्थानिक तहसील कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य असून तहसीलला घाणीचा विळखा, सर्वत्र दुर्गंधी, सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा शासकीय कार्यालयात फज्जा, विविध नागरिकांना जात व उत्पन्नाच्या दाखल्यांकरिता तहसील कार्यालयाचे चकरा माराव्या लागतात, या आशयाची बातमी लोकमतला प्रकाशित झाली. त्यामुळे प्रशासनाला जाग आली. तहसीलदाराने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावले असल्याचे समजते. त्यामुळे तहसील कार्यालय परिसर आता स्वच्छ झाले आहे. तर आ. विजय रहांगडाले यांनी चक्क या लोकमतच्या बातमीचा संदर्भ टाकून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे पत्र जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिले.आ. विजय रहांगडाले यांनी या संदर्भात १५ आॅक्टोबरला लोकमत वर्तमानपत्रातील बातमीचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला शासकीय कार्यालयातच फज्जा उडाल्याचे निदर्शनात येत आहे, असे विषयात नमूद केले आहे.पुढे त्यांनी पत्रात नमूद केले की, तिरोडा तहसील कार्यालय परिसरात दुर्गंध व घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्यक्ष पाहणी केली असता ही सत्य स्थिती आढळून आली. तसेच शासनाने गुटखा बंदी केली असूनसुद्धा शासकीय कर्मचारीच गुटखा खाऊन कार्यालयात घाण करीत असल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा दबाव नसल्याने कित्येक कर्मचारी हे पानटपरीवर आढळून येतात.नागरिकांना विविध कामासाठी जसे उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर, रेशन कार्ड इत्यादीकरिता तहसील कार्यालयाचे वारंवार चकरा माराव्या लागतात. कित्येक प्रकरणे प्रलंबित असून याबाबत नागरिकांनी तक्रारसुद्धा केली आहे. जसे स्वच्छ भारत अभियानाबाबत शासकीय कार्यालयात उदासिनता आढळून येत आहे तसेच शासनाच्या राईट टू सर्विस एक्ट बद्दल होऊ नये. याकरिता सदर प्रकरणावर गांभीर्याने लक्ष देवून संबंधितांवर कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत कार्यालयास कळवावे, असे नमूद आहे.आ. विजय रहांगडाले यांच्या सदर पत्रावर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे तहसीलदार तिरोडा यांच्यावर कोणती कारवाई करतात, याकडे तालुक्यातील सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)