शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

आमगावचे तहसील कार्यालय दुर्गंधीच्या विळख्यात

By admin | Updated: July 23, 2014 00:05 IST

तहसील कार्यालयात समाजातील प्रत्येक घटकाला कामानिमित्त जावे लागते. त्यात महिला, पुरूष, विद्यार्थी किंवा नोकरीत असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तींना काही ना काही काम पडतेच.

ओ.बी.डोंगरवार - आमगावतहसील कार्यालयात समाजातील प्रत्येक घटकाला कामानिमित्त जावे लागते. त्यात महिला, पुरूष, विद्यार्थी किंवा नोकरीत असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तींना काही ना काही काम पडतेच. पण आजघडीला प्रशासनकर्त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे तहसील कार्यालयात एवढी दुर्गंधी व अस्वच्छता दिसत आहे की सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. मात्र स्वच्छतेसंदर्भात कोणतीच पावले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उचलली जाताना दिसत नाहीत. तहसील कार्यालयतील प्रवेशव्दाराजवळ मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसत आहे. महिला व पुरुषांच्या शौचालयांची व मुतारी गृहांची वाट लागली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे की, कार्यरत कर्मचारी किंवा कामानिमित्त आलेले नागरिक लघुशंकेला जाऊ शकत नाही. उघड्यावरती महिलांना किंवा पुरुषांना आपली उपविधी आटोपावी लागते. तहसीलच्या मागे गुरांकरिता गवत खाण्याचे कुरण उगवले आहे. तेथे जनावरे फिरताना दिसतात. मागील भागात पळसाची व इतर झाडे वापली असून मोठी झालेली दिसत आहेत. तहसीलच्या मागे अधिकाऱ्यांचे दोन निवासस्थान आहेत. एका ठिकाणी नायब तहसीलदाराच्या नावाची पट्टी लागली आहे. मात्र ते तेथे वास्तव्यास नाहीत. दुसऱ्या बाजूला दिशादर्शक यंत्राचे कार्यालय आहे. चार महिन्याअगोदर सोलर सिस्टमव्दारे दिशादर्शक यंत्र या कार्यालयाच्या वर लावण्यात आले. सौरऊर्जा निर्माण करण्याचा हा मुख्य उद्देश आहे. मात्र चार लाख रूपये खर्च करून शासनाकडून चालविणारी योजना पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ज्या खोलीत बॅटऱ्या ठेवण्यात आल्या आहेत तेथे कोणी सबंधित अधिकारी जाताना दिसत नाही. तहसीलदारांचे मुक्काम नगरात भाड्याच्या घरात असल्याने त्यांना मागे काय सुरू आहे किंवा निवासस्थान कसे आहे, याकडे लक्ष देण्याकरिता अधिकाऱ्यांना वेळ नाही. दिशादर्शक यंत्राबद्दल माहिती मागितली असता सबंधित लिपीक फाईल लावून दोन-तीन दिवसात माहिती देतो, असे त्याचे उत्तर आहे. तहसील कार्यालयासमोर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यात पाय टाकून ओल्या पावलांनी कार्यालयात जावे लागते. कार्यालयासमोर पडलेल्या खड्यांत मुरूम टाकण्याची कल्पना अधिकाऱ्यांना सुचली नाही. कार्यालयात महसूलसबंधी महत्वाचे कागदपत्रे खुल्या आलमारीत ठेवले आहेत. काही वऱ्हाड्यातील आलमाऱ्यांना कुलूप न लावता तारांनी बांधल्या आहेत. विद्युतची व्यवस्था फारच गंभीर आहे. ज्या सेतुमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यासमोर विद्युतचा खुला खापरखेडा दिसतो. मात्र अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. एकंदरीत नवीन तहसील कार्यालय तयार होणार आहे, या सबबीखाली प्रशासन पूर्णपणे झोपी गेलेला आहे. नवीन वास्तू तयार होण्याकरिता विलंब होत आहे. त्यामुळे अति महत्वाच्या जनसमस्या त्यात महिला व पुरूषांचे शौचालय स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.तहसील कार्यालयाच्या दरवाजासमोर मोठ्या प्रमाणात घाण साचल्याने दुर्गंधी खूप येत आहे. त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. फक्त स्वातंत्र्य दिनानिमित्य स्वच्छता करुन परिसर स्वच्छ ठेवणे एवढीच अधिकाऱ्यांची जवाबदारी दिसते. इतर वेळेला दुर्गंधी तसेच अस्वच्छता याकडे पूर्णपणे दुुर्लक्ष झाले असून या व्यवस्थेला प्रशासनाने रामभरोसे सोडले आहे. अशाच प्रकार सुरू राहिला तर शासकीय कार्यालयांचे स्वरूप भंगारासारखेच होईल.