शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

तांडा येथील नाथजोगी कुटुंबीयांना मिळणार घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:26 IST

तालुक्यातील ग्राम तांडा येथील नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी राज्य शासनाने ८८ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच या वसाहतीतील २० कुटूंबांना घरकुल मंजूर केले आहे.त्यामुळे अनेक वर्षांनंतर नाथजोगी वसाहतीतील नागरिकांची समस्या मार्गी लागल्याने त्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे भाव झळकले.

ठळक मुद्देवसाहतीच्या विकासासाठी ८८ लाखांचा निधी : अनेक वर्षांनंतर समस्या मार्गी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम तांडा येथील नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी राज्य शासनाने ८८ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच या वसाहतीतील २० कुटूंबांना घरकुल मंजूर केले आहे.त्यामुळे अनेक वर्षांनंतर नाथजोगी वसाहतीतील नागरिकांची समस्या मार्गी लागल्याने त्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे भाव झळकले.ग्राम तांडा येथील नाथजोगी कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास करुन त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. नाथजोगींच्या वसाहतीचा विकास आणि त्यांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी. आ. अग्रवाल यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचीच दखल राज्य सरकारने २८ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत वसाहतीच्या विकासासाठी ८८ लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून २० नाथजोगी कुटुंबांना घरकुल तयार करुन देण्यात येणार आहे. तसेच समाजभवन, पाणी पुरवठा योजना, सिमेंट रोड, विद्युत व्यवस्था आदी कामे करण्यात येणार आहे.शासनाने पहिल्या टप्प्यात २० घरकुल बांधकामांना मंजुरी दिली असून दुसºया टप्प्यात उर्वरित कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. तांडा येथील नाथजोगी वसाहतीत मागील अनेक वर्षांपासून पायाभूत सोयी सुविधांचा अभाव होता. याचीच दखल आ.अग्रवाल यांनी त्यांच्या वसाहतीत पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचीच दखल घेत शासनाने हा निधी मंजूर केला आहे.या वसाहतीतील कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत घरकुल, पाणी पुरवठ्याची सुविधा, वीज, पक्के रस्ते आधी सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. घरकुलाचा लाभ घेण्यासाठी नाथजोगी कुटुंबांना ५ गुंठे जमिनीची व्यवस्था करावी लागणार होती. मात्र ही अडचण दूर करण्यात यावी अशी मागणी अग्रवाल यांनी शासनाकडे केली होती.अखेर ती अट सुध्दा रद्द करण्यात आली. यापुढेही नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी कठिबध्द राहणार असल्याचे आ.अग्रवाल यांनी सांगितले. नाथजोगी वसाहतीसाठी व घरकुलासाठी निधी मंजूर करुन दिल्याबद्दल आ.गोपालदास अग्रवाल यांचे संतोष तांबू, सरपंच रविंद्र पंधरे व निर्मला बहेकार, रोहीणी रहांगडाले, विठोबा लिल्हारे, रामसिंह परिहार, भास्कर रहांगडाले, उत्तम खांडेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल