शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

लस असताना आता सिरिंजचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST

कपिल केकत गोंदिया : लसीकरण केंद्रांची संख्या घटल्याने आता नागरिक लसीकरणाकडे कानाडोळा करीत असून, अशातच नागरिक आता लस घेण्यास ...

कपिल केकत

गोंदिया : लसीकरण केंद्रांची संख्या घटल्याने आता नागरिक लसीकरणाकडे कानाडोळा करीत असून, अशातच नागरिक आता लस घेण्यास टाळत आहेत. परिणामी लसीकरणाची आकडेवारी सातत्याने घटत चालली आहे. शिवाय, जिल्ह्यात सुमारे ८०००० लसींचा साठा असतानाच आता सिरिंजचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाही लसीकरणावर परिणाम होत आहे.

जिल्ह्याने लसीकरणात ५० टक्क्यांचा टप्पा पार केला असून, ही चांगली कामगिरी झाली आहे. मात्र, असे असतानाच १४० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने आरोग्य विभागाची अडचण वाढली आहे. कर्मचारी कमी झाल्याने त्याचा परिणाम लसीकरणावर झाला असून, यामुळेच जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. केंद्रे कमी झाल्याने नागरिकांना आता शहरात सुरू असलेल्या मोजक्याच केंद्रांवर धाव घ्यावी लागत आहे. यामुळे गर्दी वाढत असल्याने एवढी धावपळ करण्यापेक्षा नागरिक लस घेण्याकडे कानाडोळा करीत आहेत. हेच कारण आहे की, दररोज ५०००-६००० पर्यंत लसीकरणाचा आकडा सोमवारी ६५० वर आला आहे.

असे असतानाही शासनाकडून जिल्ह्याला लसींचा नियमित पुरवठा होत असून, आता जिल्ह्यात सुमारे ८०००० लसींचा साठा उपलब्ध आहे. मात्र, सिरिंजचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचाही परिणाम लसीकरणावर दिसून येत आहे. सिरिंज नसल्यामुळे सोमवारी कमी लसीकरण करण्यात आल्याची माहिती आहे.

-------------------------------

२५२०० सिरिंज मिळाल्या

जिल्ह्याला शनिवारी ३०९०० कोव्हॅक्सिन व २६००० कोविशिल्डचे डोस मिळाले. त्यानंतर मंगळवारी १२००० कोविशिल्ड व १११५० कोव्हॅक्सिनचे डोस मिळाले आहेत. म्हणजेच सुमारे ८०००० डोसेसचा साठा जिल्ह्याकडे आहे. मात्र, सिरिंजचा तुटवडा असल्याने लसीकरणावर परिणाम होत आहे. अशात मंगळवारी जिल्ह्याला २५२०० सिरिंजचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, तरीही आणखी सिरिंजची गरज पडणार आहे.

-----------------------------

केंद्रांची संख्याही वाढणार

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे अचानकच जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या घटवावी लागली. त्यामुळे लसीकरणाला घेऊन जिल्ह्यातच गोंधळ उडाला आहे. लवकरात लवकर लसीकरण आटोपण्यासाठी शासन जोर देत असतानाच जिल्ह्यात विपरीत स्थिती दिसून येत आहे. मात्र, लसींचा साठा असल्याने आता केंद्रांची संख्याही वाढविली जाणार आहे.