शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

लस असताना आता सिरिंजचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

जिल्ह्याने लसीकरणात ५० टक्क्यांचा टप्पा पार केला असून, ही चांगली कामगिरी झाली आहे. मात्र, असे असतानाच १४० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने आरोग्य विभागाची अडचण वाढली आहे. कर्मचारी कमी झाल्याने त्याचा परिणाम लसीकरणावर झाला असून, यामुळेच जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे.

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लसीकरण केंद्रांची संख्या घटल्याने आता नागरिक लसीकरणाकडे कानाडोळा करीत असून, अशातच नागरिक आता लस घेण्यास टाळत आहेत. परिणामी लसीकरणाची आकडेवारी सातत्याने घटत चालली आहे. शिवाय, जिल्ह्यात सुमारे ८० हजार लसींचा साठा असतानाच आता सिरिंजचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाही लसीकरणावर परिणाम होत आहे. जिल्ह्याने लसीकरणात ५० टक्क्यांचा टप्पा पार केला असून, ही चांगली कामगिरी झाली आहे. मात्र, असे असतानाच १४० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने आरोग्य विभागाची अडचण वाढली आहे. कर्मचारी कमी झाल्याने त्याचा परिणाम लसीकरणावर झाला असून, यामुळेच जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. केंद्रे कमी झाल्याने नागरिकांना आता शहरात सुरू असलेल्या मोजक्याच केंद्रांवर धाव घ्यावी लागत आहे. यामुळे गर्दी वाढत असल्याने एवढी धावपळ करण्यापेक्षा नागरिक लस घेण्याकडे कानाडोळा करीत आहेत. हेच कारण आहे की, दररोज ५०००-६००० पर्यंत लसीकरणाचा आकडा सोमवारी ६५० वर आला आहे. असे असतानाही शासनाकडून जिल्ह्याला लसींचा नियमित पुरवठा होत असून, आता जिल्ह्यात सुमारे ८०००० लसींचा साठा उपलब्ध आहे. मात्र, सिरिंजचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचाही परिणाम लसीकरणावर दिसून येत आहे. सिरिंज नसल्यामुळे सोमवारी कमी लसीकरण करण्यात आल्याची माहिती आहे. 

२५२०० सिरिंज मिळाल्या - जिल्ह्याला शनिवारी ३०९०० कोव्हॅक्सिन व २६००० कोविशिल्डचे डोस मिळाले. त्यानंतर मंगळवारी १२००० कोविशिल्ड व १११५० कोव्हॅक्सिनचे डोस मिळाले आहेत. म्हणजेच सुमारे ८०००० डोसेसचा साठा जिल्ह्याकडे आहे. मात्र, सिरिंजचा तुटवडा असल्याने लसीकरणावर परिणाम होत आहे. अशात मंगळवारी जिल्ह्याला २५२०० सिरिंजचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, तरीही आणखी सिरिंजची गरज पडणार आहे. केंद्रांची संख्याही वाढणार -कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे अचानकच जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या घटवावी लागली. त्यामुळे लसीकरणाला घेऊन जिल्ह्यातच गोंधळ उडाला आहे. लवकरात लवकर लसीकरण आटोपण्यासाठी शासन जोर देत असतानाच जिल्ह्यात विपरीत स्थिती दिसून येत आहे. मात्र, लसींचा साठा असल्याने आता केंद्रांची संख्याही वाढविली जाणार आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या