शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

२८ हजार क्विंटल लाकडे होळीत होणार स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:32 IST

मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली.

ठळक मुद्देजिल्ह्यात २२६१ ठिकाणी होळी : पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा

ऑनलाईन लोकमतगोंदिया : मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. एकीकडे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी धडपड सुरू असताना दुसरीकडे मात्र होळीनिमित्त २८ हजार ८०५ क्विंटल लाकडे जाळली जाणार आहेत.गोंदिया जिल्ह्याच्या १६ पोलीस ठाण्यांतर्गत १ हजार २४० सार्वजनिक तर १०२१ खासगी होळी जाळल्या जाणार आहेत. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक होळी १२० तर खासगी १३५, रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ५०, खासगी ८२, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४८ तर खासगी १०५, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ७० खासगी १०५, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६५, खासगी २०, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ३० तर खासगी १५, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ८० तर खासगी ७५, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १६५ तर खासगी ६६, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ७०, खासगी ९०, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १७०, खासगी २०, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ३०, खासगी ४५, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १२५, खासगी ३०, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक २२, खासगी २९, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४३ तर खासगी ३४, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ५७ तर खासगी १२०, अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ९५ तर खासगी ५० जाळण्यात येणार आहे. प्रत्येक होळीसाठी कमित कमी चार ते पाच क्विंटल लाकडे जाळले जातील. जिल्ह्यात जाळल्या जाणाऱ्या १२४० सार्वजनिक व १०२१ खासगी होळीसाठी २७ हजार ८०५ क्विंटल लाकडे जाळले जाणार असल्याचे बोलल्या जाते.एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी वनविभागाबरोबर प्रत्येक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. मात्र त्याच गावातील नागरिक जंगलातील, शेतातील लाकडे तोडून कोट्यवधीची वनसंपदा होळीसाठी नष्ट केली जाते. आज घडीला एक क्विंटल लाकडाची किमत ८०० रुपये सांगितले जाते. या २८ हजार क्विंटल लाकडाची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे नागरिक जंगलातील लाकडे कापून होळीत जाळून आनंदोत्सव करतात. पर्यावरणाची हाणी करणाऱ्या या प्रकराला टाळण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.तंटामुक्त समित्या लक्ष ठेवणारहोळीला धार्मिक भावना दुखावल्या जातील असे पोस्टर्स, देखावे, चित्र, नाटके किंवा प्रक्षोभक घोषणा देणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांबरोबर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांना देखील करण्यात आले आहे. होळीचा सण शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी मोहल्ला कमिटी, ग्राम सुरक्षा दल व तंटामुक्त गाव समिती, पोलीस मित्र यांच्या बैठका घेतल्या आहेत.ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त करणारहोळीच्या सणाला समाज कंटक, समाज विघातक, मुलतत्ववादी व गुंड प्रवृत्तीचे इसम मद्यप्राशन करून अश्लिल वक्तव्य करणाºयांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. धार्मिक स्थळावर गुलाल उधळणे, मुलींची छेडखानी करणे, होळी प्रथम कुणी पेटवावे, एकमेकांच्या अंगावर गुलाल रंग, फुग्यांमध्ये पाणी भरुन मारणे, चिखल अंगावर टाकणे, ढोल-ताशे वाजवून नाचत गाजत फगवा काढणे, जुन्या वैनमस्यातून वाद निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणाºयावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी तंटामुक्तीची मदत घेणार आहेत.‘‘सण आनंदात साजरा करण्यासाठी ‘इको फ्रेन्डली होळी’ अशा उपक्रम प्रत्येक गावात राबविला जाणे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, वनांचे संरक्षण करून मानवाच्या उत्थानासाठी नैसर्गिक रंग खेळावा. लाकडे जाळणे टाळावे.-एल.एस. भुते,क्षेत्र सहाय्यक, आमगाव.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८