शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

२८ हजार क्विंटल लाकडे होळीत होणार स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:32 IST

मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली.

ठळक मुद्देजिल्ह्यात २२६१ ठिकाणी होळी : पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा

ऑनलाईन लोकमतगोंदिया : मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. एकीकडे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी धडपड सुरू असताना दुसरीकडे मात्र होळीनिमित्त २८ हजार ८०५ क्विंटल लाकडे जाळली जाणार आहेत.गोंदिया जिल्ह्याच्या १६ पोलीस ठाण्यांतर्गत १ हजार २४० सार्वजनिक तर १०२१ खासगी होळी जाळल्या जाणार आहेत. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक होळी १२० तर खासगी १३५, रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ५०, खासगी ८२, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४८ तर खासगी १०५, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ७० खासगी १०५, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६५, खासगी २०, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ३० तर खासगी १५, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ८० तर खासगी ७५, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १६५ तर खासगी ६६, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ७०, खासगी ९०, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १७०, खासगी २०, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ३०, खासगी ४५, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १२५, खासगी ३०, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक २२, खासगी २९, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४३ तर खासगी ३४, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ५७ तर खासगी १२०, अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ९५ तर खासगी ५० जाळण्यात येणार आहे. प्रत्येक होळीसाठी कमित कमी चार ते पाच क्विंटल लाकडे जाळले जातील. जिल्ह्यात जाळल्या जाणाऱ्या १२४० सार्वजनिक व १०२१ खासगी होळीसाठी २७ हजार ८०५ क्विंटल लाकडे जाळले जाणार असल्याचे बोलल्या जाते.एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी वनविभागाबरोबर प्रत्येक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. मात्र त्याच गावातील नागरिक जंगलातील, शेतातील लाकडे तोडून कोट्यवधीची वनसंपदा होळीसाठी नष्ट केली जाते. आज घडीला एक क्विंटल लाकडाची किमत ८०० रुपये सांगितले जाते. या २८ हजार क्विंटल लाकडाची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे नागरिक जंगलातील लाकडे कापून होळीत जाळून आनंदोत्सव करतात. पर्यावरणाची हाणी करणाऱ्या या प्रकराला टाळण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.तंटामुक्त समित्या लक्ष ठेवणारहोळीला धार्मिक भावना दुखावल्या जातील असे पोस्टर्स, देखावे, चित्र, नाटके किंवा प्रक्षोभक घोषणा देणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांबरोबर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांना देखील करण्यात आले आहे. होळीचा सण शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी मोहल्ला कमिटी, ग्राम सुरक्षा दल व तंटामुक्त गाव समिती, पोलीस मित्र यांच्या बैठका घेतल्या आहेत.ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त करणारहोळीच्या सणाला समाज कंटक, समाज विघातक, मुलतत्ववादी व गुंड प्रवृत्तीचे इसम मद्यप्राशन करून अश्लिल वक्तव्य करणाºयांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. धार्मिक स्थळावर गुलाल उधळणे, मुलींची छेडखानी करणे, होळी प्रथम कुणी पेटवावे, एकमेकांच्या अंगावर गुलाल रंग, फुग्यांमध्ये पाणी भरुन मारणे, चिखल अंगावर टाकणे, ढोल-ताशे वाजवून नाचत गाजत फगवा काढणे, जुन्या वैनमस्यातून वाद निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणाºयावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी तंटामुक्तीची मदत घेणार आहेत.‘‘सण आनंदात साजरा करण्यासाठी ‘इको फ्रेन्डली होळी’ अशा उपक्रम प्रत्येक गावात राबविला जाणे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, वनांचे संरक्षण करून मानवाच्या उत्थानासाठी नैसर्गिक रंग खेळावा. लाकडे जाळणे टाळावे.-एल.एस. भुते,क्षेत्र सहाय्यक, आमगाव.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८