शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

गरज सरो, अन् वैद्य मरो!

By admin | Updated: July 21, 2014 23:54 IST

गोंदियाचे खासदार नाना पटोले यांचे दर्शन सध्या गोंदियावासीयांसाठी दुर्लभ झाले आहे. निवडणुकीआधी अनेक जनसमस्यांवर ‘आंदोलना’ची भाषा करणाऱ्या नानाभाऊंना आता जनसमस्यांची आठवणही येत नाही.

मनोज ताजने - गोंदियागोंदियाचे खासदार नाना पटोले यांचे दर्शन सध्या गोंदियावासीयांसाठी दुर्लभ झाले आहे. निवडणुकीआधी अनेक जनसमस्यांवर ‘आंदोलना’ची भाषा करणाऱ्या नानाभाऊंना आता जनसमस्यांची आठवणही येत नाही. एवढेच काय आता ते स्वत:च्याच जनता दरबाराकडे पाठ फिरवू लागले आहे. सत्ता आली की माणूस बदलतो असे म्हणतात, पण ‘लोकनेता’ म्हणून बिरूद लावणारे नानाभाऊ इतक्या लवकर बदलतील असे कोणालाही वाटले नव्हते.शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव द्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, अशा मागण्या करून त्यासाठी विधानसभेपर्यंत आवाज बुलंद करणाऱ्या नानाभाऊंना शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतले. आपल्यासाठी भांडणारा हा भूमीपूत्र नेता आपले सुखदु:ख समजून घेतो या विश्वासानेच सर्वांनी त्यांना मतांचे दान देत आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठविले. पण या जिल्ह्याचे खासदार आता या जिल्ह्यासाठीच ‘पाहुणे’ झाले आहे. राजकारणी लोक सार्वजनिक क्षेत्रात वावरताना एखाद्या कसलेल्या अभिनेत्याला मागे टाकतील असा अप्रतिम अभिनय करीत असतात. हा अभिनय इतका बेमालुम असतो की तो अभिनय आहे याची जाणीवही लोकांना होत नाही. पण गोंदियावासीयांना हळूहळू आता याची जाणीव व्हायला लागली आहे.खासदारकीच्या दोन महिन्यात नानाभाऊंनी सत्कार आणि पक्षाचे मेळावे वगळता लोकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी किती वेळा गोंदियात पाय ठेवले हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण अलिकडे तर त्यांना गोंदियातील समस्या कोणत्या आहेत याचाही विसर पडलेला आहे. येथील एकाही समस्येवर त्यांनी अजून तरी एक शब्दही उच्चारलेला नाही. इतर समस्यांचे सोडा, पण ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर ‘आपला माणूस’ म्हणून विश्वास टाकला त्या शेतकऱ्यांच्या समस्यांचाही त्यांना विसर पडावा? हे आश्चर्यकारकच आहे. केंद्र सरकारने यावर्षी धानाच्या हमीभावात अवघी ५० रुपये वाढ केली. ही दरवाढ म्हणजे तमाम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. पण नानाभाऊ जाणीवपूर्वक हे सर्व विसरले. शेतकऱ्यांविषयी सहानुभूती आणि तळमळ वाटण्याऐवजी त्यांना सत्ताप्रेम जास्त महत्वाचे वाटले. नानाभाऊंची साधलेली ही चुप्पी म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात नाही तर दुसरे काय आहे?परवा गोंदियात त्यांनी प्रथमच जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून दोन तास वेळ देण्याचे ठरविले होते. भाजपच्या जिल्हा कार्यालयात त्यासाठी अनेक लोक विविध समस्या, तक्रारी मांडण्यासाठी हजर झाले. पण नानाभाऊ ‘येत आहे, येत आहे’ म्हणता म्हणता ५ वाजताऐवजी चक्क रात्री ९ वाजता पोहोचले. पण तोपर्यंत त्यांची वाट पाहून अनेक जण आल्यापावली निराश होऊन परतले. नानाभाऊंना लोकांचा आता एवढा कंटाळा यायला लागला आहे का, की हा प्रकार म्हणजे ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशातला आहे हेच लोकांना कळायला मार्ग नाही. गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवत आस्थेने विचारपूस करणारे नानाभाऊ ते हेच का? असा प्रश्न आता लोकांना पडत आहे. लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी त्यांनी वेळीच सावध व्हावे हीच अपेक्षा.