शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

गरज सरो, अन् वैद्य मरो!

By admin | Updated: July 21, 2014 23:54 IST

गोंदियाचे खासदार नाना पटोले यांचे दर्शन सध्या गोंदियावासीयांसाठी दुर्लभ झाले आहे. निवडणुकीआधी अनेक जनसमस्यांवर ‘आंदोलना’ची भाषा करणाऱ्या नानाभाऊंना आता जनसमस्यांची आठवणही येत नाही.

मनोज ताजने - गोंदियागोंदियाचे खासदार नाना पटोले यांचे दर्शन सध्या गोंदियावासीयांसाठी दुर्लभ झाले आहे. निवडणुकीआधी अनेक जनसमस्यांवर ‘आंदोलना’ची भाषा करणाऱ्या नानाभाऊंना आता जनसमस्यांची आठवणही येत नाही. एवढेच काय आता ते स्वत:च्याच जनता दरबाराकडे पाठ फिरवू लागले आहे. सत्ता आली की माणूस बदलतो असे म्हणतात, पण ‘लोकनेता’ म्हणून बिरूद लावणारे नानाभाऊ इतक्या लवकर बदलतील असे कोणालाही वाटले नव्हते.शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव द्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, अशा मागण्या करून त्यासाठी विधानसभेपर्यंत आवाज बुलंद करणाऱ्या नानाभाऊंना शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतले. आपल्यासाठी भांडणारा हा भूमीपूत्र नेता आपले सुखदु:ख समजून घेतो या विश्वासानेच सर्वांनी त्यांना मतांचे दान देत आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठविले. पण या जिल्ह्याचे खासदार आता या जिल्ह्यासाठीच ‘पाहुणे’ झाले आहे. राजकारणी लोक सार्वजनिक क्षेत्रात वावरताना एखाद्या कसलेल्या अभिनेत्याला मागे टाकतील असा अप्रतिम अभिनय करीत असतात. हा अभिनय इतका बेमालुम असतो की तो अभिनय आहे याची जाणीवही लोकांना होत नाही. पण गोंदियावासीयांना हळूहळू आता याची जाणीव व्हायला लागली आहे.खासदारकीच्या दोन महिन्यात नानाभाऊंनी सत्कार आणि पक्षाचे मेळावे वगळता लोकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी किती वेळा गोंदियात पाय ठेवले हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण अलिकडे तर त्यांना गोंदियातील समस्या कोणत्या आहेत याचाही विसर पडलेला आहे. येथील एकाही समस्येवर त्यांनी अजून तरी एक शब्दही उच्चारलेला नाही. इतर समस्यांचे सोडा, पण ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर ‘आपला माणूस’ म्हणून विश्वास टाकला त्या शेतकऱ्यांच्या समस्यांचाही त्यांना विसर पडावा? हे आश्चर्यकारकच आहे. केंद्र सरकारने यावर्षी धानाच्या हमीभावात अवघी ५० रुपये वाढ केली. ही दरवाढ म्हणजे तमाम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. पण नानाभाऊ जाणीवपूर्वक हे सर्व विसरले. शेतकऱ्यांविषयी सहानुभूती आणि तळमळ वाटण्याऐवजी त्यांना सत्ताप्रेम जास्त महत्वाचे वाटले. नानाभाऊंची साधलेली ही चुप्पी म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात नाही तर दुसरे काय आहे?परवा गोंदियात त्यांनी प्रथमच जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून दोन तास वेळ देण्याचे ठरविले होते. भाजपच्या जिल्हा कार्यालयात त्यासाठी अनेक लोक विविध समस्या, तक्रारी मांडण्यासाठी हजर झाले. पण नानाभाऊ ‘येत आहे, येत आहे’ म्हणता म्हणता ५ वाजताऐवजी चक्क रात्री ९ वाजता पोहोचले. पण तोपर्यंत त्यांची वाट पाहून अनेक जण आल्यापावली निराश होऊन परतले. नानाभाऊंना लोकांचा आता एवढा कंटाळा यायला लागला आहे का, की हा प्रकार म्हणजे ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशातला आहे हेच लोकांना कळायला मार्ग नाही. गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवत आस्थेने विचारपूस करणारे नानाभाऊ ते हेच का? असा प्रश्न आता लोकांना पडत आहे. लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी त्यांनी वेळीच सावध व्हावे हीच अपेक्षा.