शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खतांचा पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:12 IST

गोंदिया : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके सहज उपलब्ध झाली पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय ...

गोंदिया : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके सहज उपलब्ध झाली पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कृषी विभागाने नियोजन करून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खतांचा पुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.

रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्व तयारीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार सुनील मेंढे, आ.अभिजीत वंजारी, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे व सहसराम कोरोटे, माजी आ.राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे उपस्थिती होते. पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले, कृषी विभागाने समन्वय साधून रासायनिक खते, बी-बियाणे, शेतीशी संबंधित अवजारे, फवारणी यंत्रे व कीटकनाशके आदींची शेतकऱ्यांना उपलब्धता करून, देताना पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांना पीक विमा सहज आणि सुलभ पद्धतीने कसा काढता येईल, या दृष्टीने नियोजन करावे. पारंपरिक पिकांसोबतच जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यास प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले. आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, खते-बियाणे प्रमाणित करण्यासाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सांगितले.

......

शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी द्या

जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन प्रलंबित असतील, त्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने तातडीने वीज कनेक्शन द्यावे. सामान्य शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जवाटप करावे. खरीप हंगाम सन २०२१-२२ करिता जे नियोजन केले आहे, त्याची कृषी विभागाने प्रभावी अंमलबजावणी करावी. खा.सुनील मेंढे म्हणाले, जिल्ह्यातील ५,२८१ वीज कनेक्शन प्रलंबित आहेत, याबाबत कार्यवाही करण्यात यावी. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नावीन्यपूर्ण योजना राबवाव्यात.

..........

२ लाख २० हजार हेक्टरवर खरिपाची लागवड

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी घोरपडे यांनी खरीप हंगाम पूर्व तयारीची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील २ लाख २० हजार २४६ हेक्टर क्षेत्रावर पिके घेण्याचे नियोजन आहे. भातपीक १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

...........

विमा कंपनीवर कारवाई करा

मागील खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घेतला होता. त्यापैकी अनेक शेतकरी पीक विमा कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने चुकीची आकडेवारी वापरून नुकसान भरपाईपासून वंचित ठेवल्याची बाब आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी निदर्शनास आणून दिली.

............