शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खतांचा पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:12 IST

गोंदिया : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके सहज उपलब्ध झाली पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय ...

गोंदिया : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके सहज उपलब्ध झाली पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कृषी विभागाने नियोजन करून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खतांचा पुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.

रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्व तयारीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार सुनील मेंढे, आ.अभिजीत वंजारी, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे व सहसराम कोरोटे, माजी आ.राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे उपस्थिती होते. पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले, कृषी विभागाने समन्वय साधून रासायनिक खते, बी-बियाणे, शेतीशी संबंधित अवजारे, फवारणी यंत्रे व कीटकनाशके आदींची शेतकऱ्यांना उपलब्धता करून, देताना पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांना पीक विमा सहज आणि सुलभ पद्धतीने कसा काढता येईल, या दृष्टीने नियोजन करावे. पारंपरिक पिकांसोबतच जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यास प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले. आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, खते-बियाणे प्रमाणित करण्यासाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सांगितले.

......

शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी द्या

जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन प्रलंबित असतील, त्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने तातडीने वीज कनेक्शन द्यावे. सामान्य शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जवाटप करावे. खरीप हंगाम सन २०२१-२२ करिता जे नियोजन केले आहे, त्याची कृषी विभागाने प्रभावी अंमलबजावणी करावी. खा.सुनील मेंढे म्हणाले, जिल्ह्यातील ५,२८१ वीज कनेक्शन प्रलंबित आहेत, याबाबत कार्यवाही करण्यात यावी. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नावीन्यपूर्ण योजना राबवाव्यात.

..........

२ लाख २० हजार हेक्टरवर खरिपाची लागवड

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी घोरपडे यांनी खरीप हंगाम पूर्व तयारीची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील २ लाख २० हजार २४६ हेक्टर क्षेत्रावर पिके घेण्याचे नियोजन आहे. भातपीक १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

...........

विमा कंपनीवर कारवाई करा

मागील खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घेतला होता. त्यापैकी अनेक शेतकरी पीक विमा कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने चुकीची आकडेवारी वापरून नुकसान भरपाईपासून वंचित ठेवल्याची बाब आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी निदर्शनास आणून दिली.

............