शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

५५ रुपये प्रती किलो तुरदाळीचा ८० रुपये दराने पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 21:45 IST

शासनाने तुरदाळीचा ५५ रुपये प्रती किलो दराने स्वस्त धान्य दुकानदार व सेवा सहकारी सोसायट्यांना पुरवठा केला. मात्र शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनी या तुरदाळीचा शाळांना ८० रुपये प्रती किलो दराने पुरवठा केल्याची बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देशासनाचे अजब धोरण : शालेय पोषण आहारात वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने तुरदाळीचा ५५ रुपये प्रती किलो दराने स्वस्त धान्य दुकानदार व सेवा सहकारी सोसायट्यांना पुरवठा केला. मात्र शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनी या तुरदाळीचा शाळांना ८० रुपये प्रती किलो दराने पुरवठा केल्याची बाब उघडकीस आली आहे.राज्यात मागील वर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्राच्या माध्यमातून शासनाने हमीभावानुसार लाखो क्विंटल तुरीची खरेदी केली. तूर खरेदीवरुन बरेच राजकारण झाले.तर अद्यापही काही जिल्ह्यात तूर खरेदीचा तिढा सुटला नसून शेतकरी विक्री केलेल्या तुरीच्या चुकºयांच्या प्रतीक्षेत आहेत. शासकीय गोदामात मोठ्या प्रमाणात तुरीचा साठा झाल्याने शासनाने या तुरीची भरडाई करुन दाळ तयार केली. तसेच ही तुरदाळ स्वस्त धान्य दुकान आणि सेवा सहकारी सोसायट्यांना ५५ रुपये प्रती किलो दराने उपलब्ध करुन दिली. यासाठी शासनाने निविदा प्रक्रिया देखील राबविली. तुरदाळीची मागणी नोंदविण्याचे आवाहन केले. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनवर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. गोंदिया येथील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आत्तापर्यंत जवळपास २३०० क्विंटल तुरदाळ विक्री केल्याची माहिती आहे. यात गैर नाही. मात्र शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणाºया कंत्राटदारांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून तुरदाळीची ५५ रुपये प्रती किलो दराने खरेदी करुन तीच तुरदाळ जिल्ह्यातील शाळांना ८० प्रती किलो दराने विक्री केल्याची माहिती आहे. यावर काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी आक्षेप घेतला असता कंत्राटदारांनी तुरदाळीच्या पॅकिंग आणि वाहतुकीचा खर्च लागल्याने किंमत वाढल्याचे सांगितले. त्यामुळे पुरवठा करणाऱ्या कंत्रादाराने तुरदाळीवर प्रती किलो मागे २५ रुपये अतिरिक्त घेतल्याची ओरड आहे. पॅकिंग आणि वाहतुकीचा खर्च जोडला तरी कंत्राटदारानी अतिरिक्त पैसे घेतल्याची ओरड आहे. शासनाने विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याची योजना आहे. गोंदिया जिल्ह्यात १०६९ शाळा आहे. या शाळांना शासनाने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून शालेय पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. कंत्राटदाराने जिल्ह्यातील काही शाळांना ८० रुपये प्रती किलो दराने तुरदाळीचा पुरवठा केल्याची माहिती आहे. याला काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुध्दा दुजोरा दिला.चुकीच्या धोरणाचा फटकाशासनाने कंत्राटदारामार्फत शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्याऐवजी थेट शाळांना पुरवठा केला तर मोठ्या प्रमाणात बचत होवू शकते. तसेच पोषण आहार साहित्याच्या दर्जावर नेहमीच उपस्थित केल्या जाणारा प्रश्न सुध्दा मार्गी लागू शकतो. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने कंत्राटदार मनमर्जीने दर आकारुन पोषण आहार साहित्याचा पुरवठा करीत असल्याचे चित्र आहे.शिक्षण विभाग अनभिज्ञशालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारकडून पुरवठा केले जाणारे साहित्य दर्जेदार आहे किंवा नाही याची चाचपणी शिक्षण विभागाकडून केली जात नाही. पोषण आहाराचा दर्जा तपासण्यासाठी कुठलीच यंत्रणा नसल्याची माहिती आहे. एकंदरीत शिक्षण विभाग यासर्व प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे याच विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.