शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

अड्याळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: December 12, 2015 04:23 IST

मागीतल्याशिवाय मिळत नाही. त्यासाठी संघर्ष सुद्धा करावा लागतो आणि त्यासाठी यावेळी अड्याळ परिसरातील

अड्याळ : मागीतल्याशिवाय मिळत नाही. त्यासाठी संघर्ष सुद्धा करावा लागतो आणि त्यासाठी यावेळी अड्याळ परिसरातील जनतेनी एकमत दाखविले. अड्याळ तालुका निर्मितीसाठी आज अड्याळ बंदचे आवाहन तालुका निर्मिती कृती संघर्ष समितीच्या वतीने केले होते. या आवाहनाला अड्याळवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाडून शांतीमोर्चा आयोजित केला होता. यावेळी गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते हजर होते. मागील २५ वर्षांपासून अड्याळला तालुक्याचा दर्जा द्यावा, ही मागणी शासन दरबारी रेटून धरण्यात येत आहे. मात्र शासनाकडून अड्याळवासीयांना केवळ आश्वासन दिली जात आहे. त्यामुळे अड्याळला तालुका घोषित करावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले अड्याळ हे राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. विलास श्रुंगारपवार यांच्या रुपाने राज्याला मंत्री पद मिळाले होते. राज्यमार्गावरील महत्वाचे गाव असलेले अड्याळ येथे शैक्षणिक महाविद्यालयांसह शासकीय कार्यालय, पोलीस स्टेशन व अन्य सोयी सुविधा येथे आहेत.तीन डिसेंबरला उत्तर बुनियादी शाळेत शेकडो ग्रामस्थांनी अड्याळ तालुका निर्मितीच्या मागणीला घेवून सभा घेतली. यात तालुका निर्मिती संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या बैठकीला गावातील सर्व राजकीय पक्षातील नेतेमंडळीनी राजकीय वैर बाजूला सारुन तालुका निर्मितीसाठी एकवटले. नवीन तालुक्याच्या निर्मितीबाबत शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. त्यामध्ये वित्त महसूल नियोजन विभागाचे आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. समितीला ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश आहे. परंतु जिल्ह्यातील अड्याळ तालुक्याचा अहवाल सादर होतो का, याबाबत ग्रामवासीयांना उत्सुकता लागली आहे. तालुका निर्मितीच्या मागणीसाठी आज सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्रीत आले. त्यानंतर तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष देवराव तलमले यांच्या अध्यक्षतेखाली गावातील शेकडो तरुण व नागरिकांनी गावातील मंडईपेठ, बाजारचौक, गुजरी चौक, शिवाजी चौक येथून शांती मोर्चा काढला. यानंतर हे मोर्चेकरी नायब तहसीलदार कार्यालयावर धडकले. यानंतर एका शिष्टमंडळाने नायब तहसीलदार सीमा वाहने यांची भेट घेऊन मागण्याविषयी चर्चा केली.त्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान मोर्चेकऱ्यांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रभारी उपविभागीय पोलीस अधीक्षक मधुकर गीते व ठाणेदार नेवारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)