शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अड्याळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: December 12, 2015 04:23 IST

मागीतल्याशिवाय मिळत नाही. त्यासाठी संघर्ष सुद्धा करावा लागतो आणि त्यासाठी यावेळी अड्याळ परिसरातील

अड्याळ : मागीतल्याशिवाय मिळत नाही. त्यासाठी संघर्ष सुद्धा करावा लागतो आणि त्यासाठी यावेळी अड्याळ परिसरातील जनतेनी एकमत दाखविले. अड्याळ तालुका निर्मितीसाठी आज अड्याळ बंदचे आवाहन तालुका निर्मिती कृती संघर्ष समितीच्या वतीने केले होते. या आवाहनाला अड्याळवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाडून शांतीमोर्चा आयोजित केला होता. यावेळी गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते हजर होते. मागील २५ वर्षांपासून अड्याळला तालुक्याचा दर्जा द्यावा, ही मागणी शासन दरबारी रेटून धरण्यात येत आहे. मात्र शासनाकडून अड्याळवासीयांना केवळ आश्वासन दिली जात आहे. त्यामुळे अड्याळला तालुका घोषित करावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले अड्याळ हे राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. विलास श्रुंगारपवार यांच्या रुपाने राज्याला मंत्री पद मिळाले होते. राज्यमार्गावरील महत्वाचे गाव असलेले अड्याळ येथे शैक्षणिक महाविद्यालयांसह शासकीय कार्यालय, पोलीस स्टेशन व अन्य सोयी सुविधा येथे आहेत.तीन डिसेंबरला उत्तर बुनियादी शाळेत शेकडो ग्रामस्थांनी अड्याळ तालुका निर्मितीच्या मागणीला घेवून सभा घेतली. यात तालुका निर्मिती संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या बैठकीला गावातील सर्व राजकीय पक्षातील नेतेमंडळीनी राजकीय वैर बाजूला सारुन तालुका निर्मितीसाठी एकवटले. नवीन तालुक्याच्या निर्मितीबाबत शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. त्यामध्ये वित्त महसूल नियोजन विभागाचे आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. समितीला ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश आहे. परंतु जिल्ह्यातील अड्याळ तालुक्याचा अहवाल सादर होतो का, याबाबत ग्रामवासीयांना उत्सुकता लागली आहे. तालुका निर्मितीच्या मागणीसाठी आज सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्रीत आले. त्यानंतर तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष देवराव तलमले यांच्या अध्यक्षतेखाली गावातील शेकडो तरुण व नागरिकांनी गावातील मंडईपेठ, बाजारचौक, गुजरी चौक, शिवाजी चौक येथून शांती मोर्चा काढला. यानंतर हे मोर्चेकरी नायब तहसीलदार कार्यालयावर धडकले. यानंतर एका शिष्टमंडळाने नायब तहसीलदार सीमा वाहने यांची भेट घेऊन मागण्याविषयी चर्चा केली.त्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान मोर्चेकऱ्यांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रभारी उपविभागीय पोलीस अधीक्षक मधुकर गीते व ठाणेदार नेवारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)