शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

अड्याळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: December 12, 2015 04:23 IST

मागीतल्याशिवाय मिळत नाही. त्यासाठी संघर्ष सुद्धा करावा लागतो आणि त्यासाठी यावेळी अड्याळ परिसरातील

अड्याळ : मागीतल्याशिवाय मिळत नाही. त्यासाठी संघर्ष सुद्धा करावा लागतो आणि त्यासाठी यावेळी अड्याळ परिसरातील जनतेनी एकमत दाखविले. अड्याळ तालुका निर्मितीसाठी आज अड्याळ बंदचे आवाहन तालुका निर्मिती कृती संघर्ष समितीच्या वतीने केले होते. या आवाहनाला अड्याळवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाडून शांतीमोर्चा आयोजित केला होता. यावेळी गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते हजर होते. मागील २५ वर्षांपासून अड्याळला तालुक्याचा दर्जा द्यावा, ही मागणी शासन दरबारी रेटून धरण्यात येत आहे. मात्र शासनाकडून अड्याळवासीयांना केवळ आश्वासन दिली जात आहे. त्यामुळे अड्याळला तालुका घोषित करावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले अड्याळ हे राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. विलास श्रुंगारपवार यांच्या रुपाने राज्याला मंत्री पद मिळाले होते. राज्यमार्गावरील महत्वाचे गाव असलेले अड्याळ येथे शैक्षणिक महाविद्यालयांसह शासकीय कार्यालय, पोलीस स्टेशन व अन्य सोयी सुविधा येथे आहेत.तीन डिसेंबरला उत्तर बुनियादी शाळेत शेकडो ग्रामस्थांनी अड्याळ तालुका निर्मितीच्या मागणीला घेवून सभा घेतली. यात तालुका निर्मिती संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या बैठकीला गावातील सर्व राजकीय पक्षातील नेतेमंडळीनी राजकीय वैर बाजूला सारुन तालुका निर्मितीसाठी एकवटले. नवीन तालुक्याच्या निर्मितीबाबत शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. त्यामध्ये वित्त महसूल नियोजन विभागाचे आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. समितीला ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश आहे. परंतु जिल्ह्यातील अड्याळ तालुक्याचा अहवाल सादर होतो का, याबाबत ग्रामवासीयांना उत्सुकता लागली आहे. तालुका निर्मितीच्या मागणीसाठी आज सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्रीत आले. त्यानंतर तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष देवराव तलमले यांच्या अध्यक्षतेखाली गावातील शेकडो तरुण व नागरिकांनी गावातील मंडईपेठ, बाजारचौक, गुजरी चौक, शिवाजी चौक येथून शांती मोर्चा काढला. यानंतर हे मोर्चेकरी नायब तहसीलदार कार्यालयावर धडकले. यानंतर एका शिष्टमंडळाने नायब तहसीलदार सीमा वाहने यांची भेट घेऊन मागण्याविषयी चर्चा केली.त्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान मोर्चेकऱ्यांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रभारी उपविभागीय पोलीस अधीक्षक मधुकर गीते व ठाणेदार नेवारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)