शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सौंदड ग्रामीण रुग्णालय झाले पोरके

By admin | Updated: December 6, 2014 01:50 IST

कोणत्याही शासकीय रुग्णालयाशी सर्वसामान्य ग्रामीण नागरिक व गरीब रूग्ण यांचा रोजचाच येतो.

सुखदेव कोरे सौंदड (रेल्वे)कोणत्याही शासकीय रुग्णालयाशी सर्वसामान्य ग्रामीण नागरिक व गरीब रूग्ण यांचा रोजचाच येतो. या बाबीला हेरून शासनाने प्रत्येक तालुक्यात तसेच जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ग्रामीण रुग्णालयांची स्थापना केली. मात्र सध्या सौंदड येथील ग्रामीण रूग्णालय डॉक्टरांविना पोरके झाल्याचे दिसून येत आहे.सौंदड (रेल्वे) येथे तत्कालिन आ. सेवक वाघाये यांच्या प्रयत्नाने आॅगस्ट २००९ ला शासनाने ग्रामीण रुग्णालयास मंजुरी दिली. परंतु सदर रुग्णालयाची वास्तव सुरूवात १५ आॅगस्ट २०१३ रोजी झाली. स्थानिक आ. राजकुमार बडोले यांच्या हस्ते सदर ग्रामीण रुग्णालयाचे थाटात उद्घाटन झाले. त्या दिवसापासून सदर ग्रामीण रुग्णालय नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले. डॉक्टरांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे तसेच कार्यालयीन वेळेत रुग्णालयात उपस्थित न राहणे, वेळेवर उपचार न करणे, रात्रपाळीत एकही डॉक्टर रुग्णालयात नसणे, असे अनेक प्रकार या रुग्णालयात होत आहेत. त्यामुळे रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक जि.प. सदस्य, पं.स. उपसभापती यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण गरीब जनता होरपळली जात असून मोठ्या प्रमाणात त्यांना आर्थिक फटका बसत आहे. सदर ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या तत्काळ सोडविण्यात न आल्यास सौंदड ग्रामवासी सर्वदलीय मोर्च्याचे आयोजन करून आमरण उपोषण करतील, असा इशारा देण्यात आला आहे. मागील आठ दिवसांपासून सौंदड ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर हजर नसून रुग्णांना आल्यापावली परत जावे लागत आहे. २८ नोव्हेंबरला सदर प्रतिनिधी, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सदाशिव विठ्ठले व सौंदड येथील विविध युवक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली असता तेथे संपूर्ण बेबंदशाही दिसून आली. रुग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचे दिसून आले. रुग्णालयात फक्त औषधी निर्माता व तंत्रज्ञ, चार परिचारिका, वाहन चालक, एक परिचर, डी.ई.ओ., एक शिपाई, सफाई कामगार यांच्याशिवाय इतर सर्व नियुक्त कर्मचारी अनुपस्थित होते. त्यावेळी २४ रुग्ण डॉक्टरांची वाट बघत ताटकळत बसले होते. या २४ रुग्णांपैकी निखील यावलकर, सुखराम टांगले, ग्रा.पं. सदस्य नंदकिशोर डोंगरवार यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे दिसून आले. इतर २१ रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत बेंचवर असल्याचे निदर्शनास आले. तसेच रुग्णालयाच्या ओपीडीसाठी एनआरएचएम चमूतील कंत्राटी डॉक्टर उपस्थित होते. एवढे मोठे ग्रामीण रुग्णालय एका कंत्राटी डॉक्टरच्या भरवश्यावर कसे काय चालविले जात आहे, हे कळायला मार्ग नाही. ग्रामीण जनतेचा आता पक्का समज झाला आहे की, ग्रामीण रुग्णालयापेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्र लाख मोलाचा होता. जोपर्यंत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होते, तेव्हा रुग्णांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागत नसे. त्यांचा वेळेवर उपचार होत असे, डॉक्टर व सर्व कर्मचारीसुद्धा उपस्थित राहत होते. मात्र आता गैरसोय होवून रूग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत ग्रा.पं. चे सदस्य कैलास जांभूळकर यांनी स्थानिक आ. राजकुमार बडोले यांना भ्रमणध्वनीवरून रुग्णालयाच्या कारभाराविषयी अवगत केले, तेव्हा त्यांनी मी काय करू शकतो, तुम्ही आपल्या स्तरावर हे प्रकरण हाताळा, अशा शब्दात उत्तर दिले. स्थानिक जि.प. सदस्य व पं.स. सदस्य यांनीसुद्धा या समस्येकडे पाठ फिरवली आहे. यामुळे जनतेत लोकप्रतिनिधींविरूध्द असंतोष पसरलेला असून जनता खवळलेली आहे. सदर रुग्णालयाच्या गैरसोयीकडे तातडीने लक्ष घालून डॉक्टरांची व इतर मूलभूत सोयींची व्यवस्था न केल्यास या रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील जनता व सर्वदलीय मोर्चा काढून आमरण उपोषण करण्यात येईल, असे स्थानिक जनतेने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.