शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार हेक्टरमध्ये उन्हाळी भात लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:25 IST

जिल्ह्यात यंदा खरिप हंगामाने शेतकऱ्यांना भरभरून धानाचे उत्पादन दिले. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जोमात असून यामुळेच जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. धानाच्या कोठारात सर्वाधीक लागवड क्षेत्र अर्जुनी-मोरगावचे ५ हजार १२७ हेक्टर आहे.

ठळक मुद्देअर्जुनी-मोरगावमध्ये सर्वाधिक ५१२७ हेक्टर : खरिपाने जागवली शेतकऱ्यात आशा

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा खरिप हंगामाने शेतकऱ्यांना भरभरून धानाचे उत्पादन दिले. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जोमात असून यामुळेच जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. धानाच्या कोठारात सर्वाधीक लागवड क्षेत्र अर्जुनी-मोरगावचे ५ हजार १२७ हेक्टर आहे.यंदा पावसाने शेतकऱ्यांना वेळीच साथ दिल्याने खरिपाचा हंगाम भरभरून निघाला. कधी नव्हे एवढे धानाचे उत्पादन यंदा झाले असून शेतकरी चांगलाच खुश दिसत आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या खेळीने हतबल होवून बसलेला शेतकरी खरिपाच्या निकालाने आता जोमात असून त्यांच्यात नवी आशा निर्माण झाली आहे.जिल्ह्यात यंदाही सिंचनाची सोय नसतानाही शेतकरी आहे त्या साधनांतून उन्हाळी घेण्याची तयारी दाखवित आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी दिले जात नसतानाही सिंचनाची सोय असलेले शेतकरीच उन्हाळीसाठी धडपडत असल्याचे दिसत आहे. तरिही एवढ्या मोठ्या क्षेत्रात उन्हाळी लागवड करण्यात आल्याने खरिपासोबतच आता उन्हाळीही शेतकºयांना भरभरून पावणार असल्याचे दिसते.विशेष म्हणजे, जिल्हयात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधीक ५ हजार १२७ हेक्टर क्षेत्रात उन्हाळीची भाताची लागवड करण्यात आली आहे. तर गोरेगाव तालुक्यात सर्वात कमी १ हजार ५६४ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी आहे.तिपटीने उन्हाळीच्या क्षेत्रात वाढजिल्ह्यात ७ हजार ७६० एवढे उन्हाळीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. म्हणजेच, किमान एवढ्या क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड अपेक्षीत असते. मात्र यंदा तिपटीने म्हणजेच २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. यावरून धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षींपासून लागलेली अवकळा लोपली असल्याचे म्हणता येईल. यंदा खरिपाने शेतकऱ्यांना ‘छप्पर फाडके’ दिले असतानाच उन्हाळीही भरभरून निघाल्यास धानाचे कोठार पुन्हा एकदा भरभरून निघणार.बोअरवेलचे खोदकाम वाढलेप्रकल्पांतील पाण्याची स्थिती व उन्हाळ््यातील पाण्याची गरज लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने शेतीसाठी पाणी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशात ज्यांच्याकडे स्वत:ची सिंचनाची सोय आहे तेच उन्हाळी घेत आहेत. शिवाय शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून आता शेतकरी बोअरवेल खोदकामाकडे वळला आहे. यामुळे मात्र आता भूगर्भातील पाण्याची पातळीही झपाट्याने खालावणार यात शंका नाही.