शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

२० हजार हेक्टरमध्ये उन्हाळी भात लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:25 IST

जिल्ह्यात यंदा खरिप हंगामाने शेतकऱ्यांना भरभरून धानाचे उत्पादन दिले. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जोमात असून यामुळेच जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. धानाच्या कोठारात सर्वाधीक लागवड क्षेत्र अर्जुनी-मोरगावचे ५ हजार १२७ हेक्टर आहे.

ठळक मुद्देअर्जुनी-मोरगावमध्ये सर्वाधिक ५१२७ हेक्टर : खरिपाने जागवली शेतकऱ्यात आशा

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा खरिप हंगामाने शेतकऱ्यांना भरभरून धानाचे उत्पादन दिले. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जोमात असून यामुळेच जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. धानाच्या कोठारात सर्वाधीक लागवड क्षेत्र अर्जुनी-मोरगावचे ५ हजार १२७ हेक्टर आहे.यंदा पावसाने शेतकऱ्यांना वेळीच साथ दिल्याने खरिपाचा हंगाम भरभरून निघाला. कधी नव्हे एवढे धानाचे उत्पादन यंदा झाले असून शेतकरी चांगलाच खुश दिसत आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या खेळीने हतबल होवून बसलेला शेतकरी खरिपाच्या निकालाने आता जोमात असून त्यांच्यात नवी आशा निर्माण झाली आहे.जिल्ह्यात यंदाही सिंचनाची सोय नसतानाही शेतकरी आहे त्या साधनांतून उन्हाळी घेण्याची तयारी दाखवित आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी दिले जात नसतानाही सिंचनाची सोय असलेले शेतकरीच उन्हाळीसाठी धडपडत असल्याचे दिसत आहे. तरिही एवढ्या मोठ्या क्षेत्रात उन्हाळी लागवड करण्यात आल्याने खरिपासोबतच आता उन्हाळीही शेतकºयांना भरभरून पावणार असल्याचे दिसते.विशेष म्हणजे, जिल्हयात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधीक ५ हजार १२७ हेक्टर क्षेत्रात उन्हाळीची भाताची लागवड करण्यात आली आहे. तर गोरेगाव तालुक्यात सर्वात कमी १ हजार ५६४ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी आहे.तिपटीने उन्हाळीच्या क्षेत्रात वाढजिल्ह्यात ७ हजार ७६० एवढे उन्हाळीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. म्हणजेच, किमान एवढ्या क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड अपेक्षीत असते. मात्र यंदा तिपटीने म्हणजेच २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. यावरून धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षींपासून लागलेली अवकळा लोपली असल्याचे म्हणता येईल. यंदा खरिपाने शेतकऱ्यांना ‘छप्पर फाडके’ दिले असतानाच उन्हाळीही भरभरून निघाल्यास धानाचे कोठार पुन्हा एकदा भरभरून निघणार.बोअरवेलचे खोदकाम वाढलेप्रकल्पांतील पाण्याची स्थिती व उन्हाळ््यातील पाण्याची गरज लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने शेतीसाठी पाणी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशात ज्यांच्याकडे स्वत:ची सिंचनाची सोय आहे तेच उन्हाळी घेत आहेत. शिवाय शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून आता शेतकरी बोअरवेल खोदकामाकडे वळला आहे. यामुळे मात्र आता भूगर्भातील पाण्याची पातळीही झपाट्याने खालावणार यात शंका नाही.