शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:54 IST

येगाव-जानवा येथील विवाहितेने सोमवारी (दि.२०) पहाटे गळफास घेवून आत्महत्या केली. सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास घेवून गळा दाबल्याचा मृताच्या वडीलांनी आरोप केला व जोवर संशयीतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोवर उत्तरीय तपासणी झालेला मृतदेह उचलू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. काही काळपर्यंत तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देमुलीला मारल्याचा वडिलांचा आरोप : तब्बल ४ तासानंतर मृतदेह रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : येगाव-जानवा येथील विवाहितेने सोमवारी (दि.२०) पहाटे गळफास घेवून आत्महत्या केली. सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास घेवून गळा दाबल्याचा मृताच्या वडीलांनी आरोप केला व जोवर संशयीतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोवर उत्तरीय तपासणी झालेला मृतदेह उचलू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. काही काळपर्यंत तणाव निर्माण झाला होता. मात्र तब्बल ४ तासानंतर अंत्यसंस्कारासाठी येगाव येथे मृतदेह रवाना झाला व या प्रकरणावर पडदा पडला. मृत विवाहितेचे नाव स्वाती सुखदेव वाढई असे आहे.पळसगाव-सोनका येथील स्वाती सुखदेव वाढई हिचा प्रमोद सोनीराम भेंडारकर यांच्याशी सन २०११ मध्ये विवाह झाला. विवाहनंतर ती सासू, सासरे व पतीसोबत येगाव येथे राहायची. सोमवारी (दि.२०) पहाटे सुमारे ४.३० वाजतादरम्यान घराच्या फाट्याला नॉयलॉन दोरी लावून तिने गळफास घेतला. पहाटेच्या सुमारास प्रमोदला स्वाती पलंगावर दिसली नाही. यावर त्याने आई-वडिलांना जागे केले व स्वातीचा घरातच शोध घेतला. त्यावेळी ती घराच्या धाब्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत लोंबकळत दिसली. पतीच्या तोंडी रिपोर्टवरुन पोलिसांनी कलम जाफौ १७४ चा गुन्हा नोंदविला.स्वातीला दोन्ही मुली झाल्याने जावई प्रमोद हा तिला नेहमी मारहाण करायचा. एक महिन्यापूर्वी प्रमोद (पती), अशोक (भासरा), शारदा (ंसासू), सोनीराम (सासरा) व वंदना भेंडारकर (जाऊ) यांनी मुलगा होत नाही म्हणून मारहाण केल्याचे स्वातीने तिच्या वडिलांना फोन करुन सांगितले होते. नंतर तिला पळसगाव येथे घेऊन आलो व गोंदियाच्या डॉक्टरकडून उपचार करुन घेतला.१७ मे रोजी पतीचा फोन येत आहे म्हणून ती सासरी येगावला गेली. १८ मे रोजी पती त्रास देवून मारहाण करीत असल्याचा फोन आल्याने तिला घेण्यासाठी मुलाला येगावला पाठविले. मात्र मुलगी त्यांच्यासोबत आली नाही. नातनीला घेवून ते परतले. रविवारी मी गावी येत आहे असा स्वातीने आईला फोन केला होता.स्वातीचे सासरे सोनीराम यांनी स्वातीला रविवारी अरुणनगर रेल्वे स्थानकावर सोडून दिले. रेल्वेला उशीर होता व सासऱ्याला ती वारंवार फोन करीत होती. मात्र ते प्रतिसाद देत नव्हते. रात्री ९ वाजतानंतर ते अरुणनगर रेल्वे स्थानकावर घ्यायला आले व येगावला गेले.सोमवारी मुलींना घ्यायला पळसगावला येते असा तिने फोन केला. तेव्हा येगाव येथील आत्माराम भेंडारकर यांना फोन करुन स्वातीचे घरी जा व तिचे सासरकडील मंडळींना समजावून सांगा असे सांगितले. मात्र सोमवारी (दि.२०) सकाळी स्वातीचा मृत्यू झाल्याची बातमी आली. तिला सासरच्या मंडळींनी गळा दाबून मारले व गळफास घेवून आत्महत्या केल्याचे भासविले, अशी तक्रार स्वातीच्या वडिलांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात दिली.सोमवारी (दि.२०) सकाळी स्वातीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. उत्तरीय तपासणी पार पडली मात्र सासरच्या मंडळींना जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही अशी आक्रमक भूमिका स्वातीच्या वडिलांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणाव होता.४ तासानंतर तणाव निवळला व मृतदेह येगाव येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. ही आत्महत्या की हत्या याचा उलगडा उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच होणार आहे. मात्र स्वातीचे पती व सासऱ्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक देवीदास शेवाडे तपास करीत आहेत.मृतदेहाजवळ मिळाली चिठ्ठीमृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत मामाजी अशू आरू यांचेकडे लक्ष द्या. तिचे वडील त्यांचेकडे लक्ष देऊ शकत नाही. माझ्या पोरीला बडे पप्पा, बडी मम्मी यांच्याकडे किंवा पळसगाव येथे शिकवा. तिचे वडील शिकवू शकत नाही, असा लिखीत संदेश आहे. ही चिठ्ठी मृत स्वातीने स्व हस्ताक्षरात लिहीली का ? याची शहानिशा होणे गरजेचे आहे.