शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

काळेमिरीच्या उत्पादनाचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:28 IST

गोंदिया : मिरे किंवा काली मिर्च उत्पादनासाठी गोंदिया जिल्ह्याचे हवामान योग्य आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध वनस्पती तज्ज्ञ डॉ. श्रीराम ...

गोंदिया : मिरे किंवा काली मिर्च उत्पादनासाठी गोंदिया जिल्ह्याचे हवामान योग्य आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध वनस्पती तज्ज्ञ डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी दिली आहे. मिरी किंवा काळी मिर्चचे उत्पादन भारतात मुख्यतः केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात कोकण, आसाम व पश्चिम बंगालमध्ये घेतले जाते. काळीमिरीच्या झाडांच्या योग्य वाढीसाठी दमट व उष्ण हवामानाची गरज असते. आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथील बागेत डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी आंब्याच्या बागेत काळीमिरी लावण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.

काळीमिरीकरिता १८ ते ३८ डिग्री सेंटिग्रेडपर्यंत तापमान अधिक लागते. भरपूर पाऊस व तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात धानाचे रब्बी पीकसुद्धा घेतात. यामुळे या जिल्ह्यात दमट हवामान साधारणतः एप्रिल महिन्यापर्यंत असते. डॉ. भुस्कुटे यांची २५ वर्षे जुनी आंब्याची बाग आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार या गावात आहे. आंबा हा वृक्ष सदाहरित असून उन्हाळ्यातदेखील ही झाडे थंडावा देतात. दोन वर्षांपूर्वी डॉ. भुस्कुटे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातून मिरीची कलमे आणली. आंब्याच्या झाडांच्या बुंध्यापाशी लावली. उन्हाळ्यात पाणी व्यवस्था करून या झाडांची योग्य काळजी घेतली. काळेमिऱ्याचे उत्पादन आपल्या भागात होऊ शकते का, या विचाराने प्रयोगाला सुरुवात केली. आंब्याच्या झाडाचा आधार घेत मुळाद्वारे वाढली. ती मिरे वरच्या फांद्यांपर्यंत पोहोचली. या वर्षी या मिरी लागली आहेत. दोन वर्षांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.

................

कोट

आपल्या भागात ज्या शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागा आहेत त्यांनी काळेमिरे लागवडीचा प्रयोग केला पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांना उत्पादन मिळेल. काळेमिऱ्याचा भाव ४०० रुपये प्रति किलो आहे. याचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच परसदारात आंब्याची झाडे असल्यास घरीदेखील मिरीचा वेल लावता येईल.

डॉ. श्रीराम भुस्कुटे, माजी प्राचार्य तथा वनस्पतीशास्त्रज्ञ