शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आंदोलनाची यशस्वी सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:13 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व लाल बावटा शेतमजूर युनियन तालुका कौंसीलच्यावतीने राणी दुर्गावती चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. भाकप तथा शेतमजूर युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात सदर आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : आपल्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व लाल बावटा शेतमजूर युनियन तालुका कौंसीलच्यावतीने राणी दुर्गावती चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. भाकप तथा शेतमजूर युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात सदर आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली.सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी कार्यालय व पंचायत समितीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आले. त्यानंतर संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने उपविभागीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार टी.टी. बिसेन व खंड विकास अधिकारी हिरूडकर यांना निवेदन दिले.निवेदनात जीवघेण्या महागाईचा विरोध, ग्रामीण, गरीब, दलित, आदिवासी, शेतमजूर, शेतकरी, अतिक्रमण करणारे भूमिहिन, बेघर व निराधारांच्या मागण्यांचा समावेश आहे. तसेच मागील महिन्यात जिल्हा विकास निधी अंतर्गत जि.प. व पं.स. द्वारे बांधलेल्या दुकान गाळे वाटपात आर्थिक व्यवहार करून गैरप्रकार करण्यात आला व पक्षपात करून गाळे वाटप करण्यात आलेल्या कारभाराची योग्य व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई सतत वाढत आहे. गॅस, पेट्रोल, डीझेल, एसटीचे भाडे, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतच असून नागरिक त्रस्त झाले आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, निराधारांना एक हजार रूपये पेंशन देवू, भूमिहिन अतिक्रमण धारकांची तीन महिन्यांच्याआता त्रुटी पूर्तता करून सहा महिन्यांत त्यांना पट्टे देवू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ६ मार्च रोजी दिले होते. मात्र यावर अद्याप अंमजबजावणी करण्यात आली नाही.त्यामुळे सदर मागण्यांची महाराष्ट्र शासनाने त्वरित पूर्तता करावी. त्यासह निराधारांना प्रत्येक महिन्यात तीन हजार रूपये मानधन देण्यात यावे व त्यांच्यासाठी कायदा करावा. बेघरांना तीन लाख रूपये घर बांधण्यासाठी द्यावे. सन २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची उचल केली, त्यांना अजूनपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला नाही. त्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. अध्यक्षस्थानी बाबुराव राऊत होते. संचालन शंकर बिंझलेकर यांनी केले. आभार शालीकराम घासले यांनी मानले. धरणे आंदोलनासाठी संजय लांडेकर, घनश्याम फाफनवाडे, राम किशन, हिरामन कोरे, ज्ञानिराम मेंढे, आत्माराम रहिले, प्रेमदास चौरे, रेखा ताराम यांनी सहकार्य केले.