शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

वेळेच्या योग्य नियोजनातूनच यशाचे शिखर गाठणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:32 IST

गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतिभासंपन्न व परिश्रमी असतात, पण मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येत नाही, ...

गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतिभासंपन्न व परिश्रमी असतात, पण मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येत नाही, म्हणून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन कसे करावे, याबद्दलही माहिती मिळणार. वेळेच्या योग्य नियोजनातूनच यशाचे शिखर गाठणे शक्य होते, असे प्रतिपादन धोटे बंधू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंजन नायडू यांनी केले.

उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने रविवारी (दि.७) वेबिनारद्वारे आयोजित ‘स्पर्धा परीक्षेत वेळेचे व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन व्याख्यानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून पुणे येथील दूरसंचार विभागाचे उपमहासंचालक सुनील तलवारे आणि कार्यक्रमाचे संयोजक व उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा.धर्मवीर चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी तलवारे यांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मेंदूची कार्यक्षमता अजोड असते, पण आपण याचा वापर सकारात्मक कार्यांसाठी करणे व भावनांवर नियंत्रण करून आपले कार्य करणे गरजेचे आहे. वेळ व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांना विविध भ्रम असतात जसे की, मी माझ्या वेळेचे नियोजन कसेही करू शकतो, वेळेचे व्यवस्थापन व शिस्तीमुळे आयुष्य जगण्याची मजा राहत नाही, व्यक्ती सदैव दबावात राहतो, तसेच कोणतेही काम करायला पुरेसा वेळ राहत नाही, पण हे सगळे भ्रम आहेत. उलट वेळेच्या व्यवस्थापनेमुळे सगळी कामे नीटनेटकी व वेळेत पूर्ण होतात, असे सांगितले, तसेच वेळ व्यवस्थापनात येणारे अडथळे, वेळ व्यवस्थापनाची कौशल्ये, परीक्षेपूर्वी आणि दरम्यान वेळ व्यवस्थापन यावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. चव्हाण यांनी मांडले. या मार्गदर्शन व्याख्यानात ४०० विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी प्रा.संजय तिमांडे, डाॅ.दिलीप चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केेले.