शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वेळेच्या योग्य नियोजनातूनच यशाचे शिखर गाठणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:32 IST

गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतिभासंपन्न व परिश्रमी असतात, पण मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येत नाही, ...

गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतिभासंपन्न व परिश्रमी असतात, पण मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येत नाही, म्हणून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन कसे करावे, याबद्दलही माहिती मिळणार. वेळेच्या योग्य नियोजनातूनच यशाचे शिखर गाठणे शक्य होते, असे प्रतिपादन धोटे बंधू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंजन नायडू यांनी केले.

उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने रविवारी (दि.७) वेबिनारद्वारे आयोजित ‘स्पर्धा परीक्षेत वेळेचे व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन व्याख्यानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून पुणे येथील दूरसंचार विभागाचे उपमहासंचालक सुनील तलवारे आणि कार्यक्रमाचे संयोजक व उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा.धर्मवीर चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी तलवारे यांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मेंदूची कार्यक्षमता अजोड असते, पण आपण याचा वापर सकारात्मक कार्यांसाठी करणे व भावनांवर नियंत्रण करून आपले कार्य करणे गरजेचे आहे. वेळ व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांना विविध भ्रम असतात जसे की, मी माझ्या वेळेचे नियोजन कसेही करू शकतो, वेळेचे व्यवस्थापन व शिस्तीमुळे आयुष्य जगण्याची मजा राहत नाही, व्यक्ती सदैव दबावात राहतो, तसेच कोणतेही काम करायला पुरेसा वेळ राहत नाही, पण हे सगळे भ्रम आहेत. उलट वेळेच्या व्यवस्थापनेमुळे सगळी कामे नीटनेटकी व वेळेत पूर्ण होतात, असे सांगितले, तसेच वेळ व्यवस्थापनात येणारे अडथळे, वेळ व्यवस्थापनाची कौशल्ये, परीक्षेपूर्वी आणि दरम्यान वेळ व्यवस्थापन यावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. चव्हाण यांनी मांडले. या मार्गदर्शन व्याख्यानात ४०० विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी प्रा.संजय तिमांडे, डाॅ.दिलीप चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केेले.