शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

सुकळीचा विशाल बनला उपजिल्हाधिकारी

By admin | Updated: April 11, 2015 01:45 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या निकालात तालुक्यातील सुकळी-खैरी येथील

गावकऱ्यांची छाती फुगली : जिद्द आणि परिश्रमाने कमावले यशसंतोष बुकावन ल्ल अर्जुनी-मोरगावमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या निकालात तालुक्यातील सुकळी-खैरी येथील विशालकुमार शालीकराम मेश्राम याने बाजी मारून उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विदर्भातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत यश संपादन केले. त्यात गोंदिया जिल्ह्यातून विशालकुमार एकमेव आहे. परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तो २ मे पासून यशदा पुणे येथे प्रशिक्षण घेणार आहे. ग्रामीण भागातील एका सर्वसाधारण कुटुंबातून हे यश संपादन करणाऱ्या विशालकुमारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अवघे ६८४ लोकसंख्या असलेले सुकळी हे गाव अर्जुनी मोरगावपासून ३ किमीवर आहे. या गावात उच्च पदस्थांची खाण आहे. विशालकुमारचे प्राथमिक शिक्षण सिरोंचा व जि.प. प्राथमिक शाळा सकुळी-खैरी येथे झाले आहे. पाचवा वर्ग पंचशिल विद्यालय बाराभाटी तर ६ ते १२ पर्यंतचे शिक्षण सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथून पूर्ण केले. त्यानंतर श्री गुरुगोविंदसिंग इन्स्टीट्यूट आॅफ इंजिनिअरिंग कॉलेज नांदेड येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विषयात अभियांत्रिकी पदवी घेतली.या पदवीनंतर त्याला चेन्नई येथील कंपनीत नोकरीची संधी होती, मात्र त्यात लोकसेवा नव्हती, त्यामुळे त्याचे मन रमले नाही. व्यवसायाने इंजिनियर असलेल्या मोठा भाऊ संतोषने हिंमत दिली आणि विशालने एमपीएससीचा मार्ग धरला. पुणे येथे जाऊन शिकवणी वर्गात शिक्षण घेतले. पहिल्या परीक्षेत अपयश आले. भावाने धीर दिला. त्यानंतर पुन्हा जिद्दीने अभ्यास केला. दुसऱ्या प्रयत्नात २०१३ मध्ये विक्रीकर अधिकारी व खंडविकास अधिकारी परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या वरुड पंचायत समितीमध्ये परीविक्षाधिन खंडविकास अधिकारी पदावर कार्यरत असतानाच उपजिल्हाधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेतही तो उत्तीर्ण झाला. विशालचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात वाहनचालक होते. ते ५ वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. आई चौथा वर्ग शिकली असून गृहिणी आहे. एक भाऊ इंजिनिअर, दुसरा पोलीस उपनिरीक्षक आहे, तर बहिण अपेक्षा हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली मात्र तिची निवड झाली नाही. तिचे प्रयत्न त्या दिशेने सुरूच आहेत. यापुढे माझे आयएएस बनण्याचे स्वप्न असल्याचे विशाल मेश्राम यांनी सांगितले. अपयशातूनच यश गाठता येतजीवनात अपयश येतच असते. अपयशातून यशप्राप्ती होते. मात्र त्यासाठी जिद्द, चिकाटी, परिश्रम व संयमाची गरज असते. अपयशाने खचून न जाता वाटचाल सुरु ठेवल्यास तुम्हाला पुढे कुणीही थांबवू शकत नाही. कुणाची तरी प्रेरणा व आत्मविश्वास या बाबी महत्वपूर्ण आहेत. झालेल्या चुका दुरुस्त करुन मार्गक्रमण करावे, असे विशालकुमार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला. ४ ग्रामीण भागात न्युनगंड असतो. परिक्षेविषयी अनामिक भीती असते. विद्यार्थ्यांत अमाप गुणवत्ता आहे. मात्र मार्गदर्शन व दिशानिर्देशांचा अभाव आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय, उद्दिष्ट ठेवले पाहिजे. यामध्ये प्राप्तीसाठी निरंतर व सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास निश्चितच यशप्राप्ती होते, असे विशालकुमार मेश्राम यांनी सांगितले.