शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

सुकळीचा विशाल बनला उपजिल्हाधिकारी

By admin | Updated: April 11, 2015 01:45 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या निकालात तालुक्यातील सुकळी-खैरी येथील

गावकऱ्यांची छाती फुगली : जिद्द आणि परिश्रमाने कमावले यशसंतोष बुकावन ल्ल अर्जुनी-मोरगावमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या निकालात तालुक्यातील सुकळी-खैरी येथील विशालकुमार शालीकराम मेश्राम याने बाजी मारून उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विदर्भातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत यश संपादन केले. त्यात गोंदिया जिल्ह्यातून विशालकुमार एकमेव आहे. परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तो २ मे पासून यशदा पुणे येथे प्रशिक्षण घेणार आहे. ग्रामीण भागातील एका सर्वसाधारण कुटुंबातून हे यश संपादन करणाऱ्या विशालकुमारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अवघे ६८४ लोकसंख्या असलेले सुकळी हे गाव अर्जुनी मोरगावपासून ३ किमीवर आहे. या गावात उच्च पदस्थांची खाण आहे. विशालकुमारचे प्राथमिक शिक्षण सिरोंचा व जि.प. प्राथमिक शाळा सकुळी-खैरी येथे झाले आहे. पाचवा वर्ग पंचशिल विद्यालय बाराभाटी तर ६ ते १२ पर्यंतचे शिक्षण सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथून पूर्ण केले. त्यानंतर श्री गुरुगोविंदसिंग इन्स्टीट्यूट आॅफ इंजिनिअरिंग कॉलेज नांदेड येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विषयात अभियांत्रिकी पदवी घेतली.या पदवीनंतर त्याला चेन्नई येथील कंपनीत नोकरीची संधी होती, मात्र त्यात लोकसेवा नव्हती, त्यामुळे त्याचे मन रमले नाही. व्यवसायाने इंजिनियर असलेल्या मोठा भाऊ संतोषने हिंमत दिली आणि विशालने एमपीएससीचा मार्ग धरला. पुणे येथे जाऊन शिकवणी वर्गात शिक्षण घेतले. पहिल्या परीक्षेत अपयश आले. भावाने धीर दिला. त्यानंतर पुन्हा जिद्दीने अभ्यास केला. दुसऱ्या प्रयत्नात २०१३ मध्ये विक्रीकर अधिकारी व खंडविकास अधिकारी परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या वरुड पंचायत समितीमध्ये परीविक्षाधिन खंडविकास अधिकारी पदावर कार्यरत असतानाच उपजिल्हाधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेतही तो उत्तीर्ण झाला. विशालचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात वाहनचालक होते. ते ५ वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. आई चौथा वर्ग शिकली असून गृहिणी आहे. एक भाऊ इंजिनिअर, दुसरा पोलीस उपनिरीक्षक आहे, तर बहिण अपेक्षा हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली मात्र तिची निवड झाली नाही. तिचे प्रयत्न त्या दिशेने सुरूच आहेत. यापुढे माझे आयएएस बनण्याचे स्वप्न असल्याचे विशाल मेश्राम यांनी सांगितले. अपयशातूनच यश गाठता येतजीवनात अपयश येतच असते. अपयशातून यशप्राप्ती होते. मात्र त्यासाठी जिद्द, चिकाटी, परिश्रम व संयमाची गरज असते. अपयशाने खचून न जाता वाटचाल सुरु ठेवल्यास तुम्हाला पुढे कुणीही थांबवू शकत नाही. कुणाची तरी प्रेरणा व आत्मविश्वास या बाबी महत्वपूर्ण आहेत. झालेल्या चुका दुरुस्त करुन मार्गक्रमण करावे, असे विशालकुमार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला. ४ ग्रामीण भागात न्युनगंड असतो. परिक्षेविषयी अनामिक भीती असते. विद्यार्थ्यांत अमाप गुणवत्ता आहे. मात्र मार्गदर्शन व दिशानिर्देशांचा अभाव आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय, उद्दिष्ट ठेवले पाहिजे. यामध्ये प्राप्तीसाठी निरंतर व सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास निश्चितच यशप्राप्ती होते, असे विशालकुमार मेश्राम यांनी सांगितले.