शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सुकळीचा विशाल बनला उपजिल्हाधिकारी

By admin | Updated: April 11, 2015 01:45 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या निकालात तालुक्यातील सुकळी-खैरी येथील

गावकऱ्यांची छाती फुगली : जिद्द आणि परिश्रमाने कमावले यशसंतोष बुकावन ल्ल अर्जुनी-मोरगावमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या निकालात तालुक्यातील सुकळी-खैरी येथील विशालकुमार शालीकराम मेश्राम याने बाजी मारून उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विदर्भातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत यश संपादन केले. त्यात गोंदिया जिल्ह्यातून विशालकुमार एकमेव आहे. परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तो २ मे पासून यशदा पुणे येथे प्रशिक्षण घेणार आहे. ग्रामीण भागातील एका सर्वसाधारण कुटुंबातून हे यश संपादन करणाऱ्या विशालकुमारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अवघे ६८४ लोकसंख्या असलेले सुकळी हे गाव अर्जुनी मोरगावपासून ३ किमीवर आहे. या गावात उच्च पदस्थांची खाण आहे. विशालकुमारचे प्राथमिक शिक्षण सिरोंचा व जि.प. प्राथमिक शाळा सकुळी-खैरी येथे झाले आहे. पाचवा वर्ग पंचशिल विद्यालय बाराभाटी तर ६ ते १२ पर्यंतचे शिक्षण सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथून पूर्ण केले. त्यानंतर श्री गुरुगोविंदसिंग इन्स्टीट्यूट आॅफ इंजिनिअरिंग कॉलेज नांदेड येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विषयात अभियांत्रिकी पदवी घेतली.या पदवीनंतर त्याला चेन्नई येथील कंपनीत नोकरीची संधी होती, मात्र त्यात लोकसेवा नव्हती, त्यामुळे त्याचे मन रमले नाही. व्यवसायाने इंजिनियर असलेल्या मोठा भाऊ संतोषने हिंमत दिली आणि विशालने एमपीएससीचा मार्ग धरला. पुणे येथे जाऊन शिकवणी वर्गात शिक्षण घेतले. पहिल्या परीक्षेत अपयश आले. भावाने धीर दिला. त्यानंतर पुन्हा जिद्दीने अभ्यास केला. दुसऱ्या प्रयत्नात २०१३ मध्ये विक्रीकर अधिकारी व खंडविकास अधिकारी परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या वरुड पंचायत समितीमध्ये परीविक्षाधिन खंडविकास अधिकारी पदावर कार्यरत असतानाच उपजिल्हाधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेतही तो उत्तीर्ण झाला. विशालचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात वाहनचालक होते. ते ५ वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. आई चौथा वर्ग शिकली असून गृहिणी आहे. एक भाऊ इंजिनिअर, दुसरा पोलीस उपनिरीक्षक आहे, तर बहिण अपेक्षा हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली मात्र तिची निवड झाली नाही. तिचे प्रयत्न त्या दिशेने सुरूच आहेत. यापुढे माझे आयएएस बनण्याचे स्वप्न असल्याचे विशाल मेश्राम यांनी सांगितले. अपयशातूनच यश गाठता येतजीवनात अपयश येतच असते. अपयशातून यशप्राप्ती होते. मात्र त्यासाठी जिद्द, चिकाटी, परिश्रम व संयमाची गरज असते. अपयशाने खचून न जाता वाटचाल सुरु ठेवल्यास तुम्हाला पुढे कुणीही थांबवू शकत नाही. कुणाची तरी प्रेरणा व आत्मविश्वास या बाबी महत्वपूर्ण आहेत. झालेल्या चुका दुरुस्त करुन मार्गक्रमण करावे, असे विशालकुमार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला. ४ ग्रामीण भागात न्युनगंड असतो. परिक्षेविषयी अनामिक भीती असते. विद्यार्थ्यांत अमाप गुणवत्ता आहे. मात्र मार्गदर्शन व दिशानिर्देशांचा अभाव आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय, उद्दिष्ट ठेवले पाहिजे. यामध्ये प्राप्तीसाठी निरंतर व सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास निश्चितच यशप्राप्ती होते, असे विशालकुमार मेश्राम यांनी सांगितले.