शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचा उंबरठा न ओलांडताच विद्यार्थी पोहचले दुसरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:26 IST

केशोरी : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मार्च २०२० पासून शासनाच्या आदेशानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शैक्षणिक कार्याची सुरुवात दरवर्षी ...

केशोरी : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मार्च २०२० पासून शासनाच्या आदेशानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शैक्षणिक कार्याची सुरुवात दरवर्षी जून महिन्यात होत असते. मात्र कोरोनाच्या दुष्पपरिणामामुळे पहिल्या वर्गातील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना फक्त कागदावरच ठेवण्यात शिक्षकांना समाधान मानावे लागले. पहिल्या वर्गातील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना शाळेचा उंबरठा एकही दिवस न ओलांडता दुसऱ्या वर्गात वर्गोन्नती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याविषयी पालकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थी दुसरीमध्ये जाऊनही त्या विद्यार्थ्यांला प्रथम ज्या शिक्षणाची गरज आहे त्या अ,ब,क,ड अक्षरांच्या ओळखीपासून विद्यार्थी दूर गेला आहे. त्यामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शासनाने शाळा बंद करून त्याऐवजी ऑनलाइन शिक्षण प्रणाली कार्यान्वित केली आहे. मात्र या शिक्षण प्रणालीचा आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागात काहीच उपयोग होत नाही.

कारण या भागात गरीब व शेतमजूर मोठ्या प्रमाणात आहेत. ही मंडळी सतत कामाच्या शोधात भटकंती करीत असतात. त्याची मुले खेळण्यात व्यस्त असतात. कोणत्याही कुटुंबाकडे स्मार्टफोन असेल तर त्यांच्याकडे फोनला कनेक्टिव्हिटी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण प्रणालीपासून विद्यार्थी अलिप्त राहिले आहेत. मागील वर्षीच्या पहिल्या वर्गातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी अजूनही शाळेचे तोंड बघितले नसताना दुसऱ्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा शासनाने निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शैक्षणिक विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.