शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

शाळेचा उंबरठा न ओलांडताच विद्यार्थी पोहचले दुसरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:26 IST

केशोरी : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मार्च २०२० पासून शासनाच्या आदेशानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शैक्षणिक कार्याची सुरुवात दरवर्षी ...

केशोरी : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मार्च २०२० पासून शासनाच्या आदेशानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शैक्षणिक कार्याची सुरुवात दरवर्षी जून महिन्यात होत असते. मात्र कोरोनाच्या दुष्पपरिणामामुळे पहिल्या वर्गातील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना फक्त कागदावरच ठेवण्यात शिक्षकांना समाधान मानावे लागले. पहिल्या वर्गातील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना शाळेचा उंबरठा एकही दिवस न ओलांडता दुसऱ्या वर्गात वर्गोन्नती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याविषयी पालकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थी दुसरीमध्ये जाऊनही त्या विद्यार्थ्यांला प्रथम ज्या शिक्षणाची गरज आहे त्या अ,ब,क,ड अक्षरांच्या ओळखीपासून विद्यार्थी दूर गेला आहे. त्यामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शासनाने शाळा बंद करून त्याऐवजी ऑनलाइन शिक्षण प्रणाली कार्यान्वित केली आहे. मात्र या शिक्षण प्रणालीचा आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागात काहीच उपयोग होत नाही.

कारण या भागात गरीब व शेतमजूर मोठ्या प्रमाणात आहेत. ही मंडळी सतत कामाच्या शोधात भटकंती करीत असतात. त्याची मुले खेळण्यात व्यस्त असतात. कोणत्याही कुटुंबाकडे स्मार्टफोन असेल तर त्यांच्याकडे फोनला कनेक्टिव्हिटी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण प्रणालीपासून विद्यार्थी अलिप्त राहिले आहेत. मागील वर्षीच्या पहिल्या वर्गातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी अजूनही शाळेचे तोंड बघितले नसताना दुसऱ्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा शासनाने निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शैक्षणिक विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.