शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
3
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
4
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
5
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
6
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
7
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
8
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
9
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
10
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
11
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
12
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
13
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
14
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
15
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
16
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
17
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
18
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
19
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
20
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

अन् नाथजोग्यांची पोरं झाले बोर्डाची परीक्षा पास

By admin | Updated: June 28, 2014 01:07 IST

पिढ्यान्पिढ्या भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या समाजातील लोकांचे शिक्षण घेणे दूरच ते शिक्षणाचे नावही काढत नव्हते.

नरेश रहिले गोंदियापिढ्यान्पिढ्या भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या समाजातील लोकांचे शिक्षण घेणे दूरच ते शिक्षणाचे नावही काढत नव्हते. मात्र त्यांच्यात शिक्षणासंदर्भात असलेला तिमीर दूर सारण्याचा प्रयत्न गोंदियातील एका समाजसेवकाने केला. त्यांनी आपल्या जीवनातील १० वर्ष या नाथजोगींच्या उत्थानासाठी लावले. परिणामी नाथजोगी समाजातील दोन मुलांनी नुकतीच बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली.नाथजोगी समाजाची व्यथा समजणारे गोंदियातील सामाजिक कार्यकर्ता दुलीचंद बुध्दे हे शासकीय सेवेत असले तरी उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी ते सतत कार्य करीत असतात. गोंदिया जिल्ह्याच्या अदासी येथे १९९१ पासून वास्तव्यास असलेल्या या नाथजोग्यांची संख्या ७०० च्या घरात आहे. परंतु भीक मागून उदरनिर्वाह करणे हा त्यांचा व्यवसाय होता. या नाथजोगी समाजातील एक १२ वर्षाचा मुलगा लक्षपती माळवे हा बुध्दे यांच्याघरी भीक मागायला आला. तो दिवस होता १७ आॅगस्ट २००४. बुध्दे यांनी त्या १२ वर्षाच्या मुलाच्या तोंडातून त्यांची परिस्थिती ऐकून ते त्यांच्या तांड्यावर गेले. त्यांच्या परिस्थितीची पाहणी केल्यावर विदारक चित्र त्यांना आढळले. या विदारक स्थिीतून त्यांना बाहेर काढण्याचा चंग बुध्दे यांनी बांधला. व मनुष्याचा सर्वांगिण विकास करणारा माध्य शिक्षण असल्याने त्या नाथजोगींच्या मुलांना शिक्षणाकडे वळविले. त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांसाठी असलेला इंडस प्रकल्प या ठिकाणी तयार केला. त्या ठिकाणी या नाथजोगी समाजाच्या मुलांना शिक्षण देण्यात येऊ लागले. इंडस प्रकल्प बंद झाल्यावर त्यांना प्राथमिक शाळा अदासी येथे दाखल करण्यात आले. अदासी येथील नाथजोग्यांची ७० मुले शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. घरात खायला अन्न नाही तर शिक्षणाचा विचार करणेही दूर या मनस्थितीत असलेल्या नाथजोगींचे वारंवार समूपदेशन करून त्यांना आपल्या मुलाना शाळेत पाठविण्यासाठी बुध्दे यांनी प्रवृत्त केले. याचेच फळ म्हणून नाथजोग्यांची दोन मुले बोर्डाची परीक्षा पास झाले. बैद्यनाभ मन्साराम चव्हाण हा नुकताच १२ वीत ५२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. तर एकनाथ मन्साराम चव्हाण हा नुकताच १० वीत ५० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. शिक्षणासाठी बैद्यनाथला व एकनाथ या दोन्ही भावंडाना शिक्षणासाठी नूतन शिक्षण संस्था गोंदियाचे संचालक राजाभाऊ इंगळे यांनी दत्तक घेतले. ११ वी व १२ वी साठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा केला. अन ते दोघेही भावंडे बोर्डाची परीक्षा पास झाले. परंतु बैद्यनाथला आता पुढचे शिक्षण घेण्यासाठी कुणाचा आधार नसल्याने आपण पुढचे शिक्षण कसे करणार या विवंचनेत तो आहे.त्याचे आईवडील आजही भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत. घरात अठराविश्वे दारिद्र असताना पुढचे शिक्षण कसे घेणार ही चिंता बैद्यनाथच्या मनात आहे. त्याच्या मदतीसाठी पुन्हा दुलीचंद बुध्दे यांनी शहरातील काही लोकांकडे धाव घेतली. परंतु त्यांच्या पुढच्या शिक्षणाची सोय अद्याप झाली नाही. समाजातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या त्यांच्या मदतीला समाजातील धनाढ्यांची साथ मिळाल्यास या समाजाचा उत्थान होऊ शकतो.‘ते’ झाले त्यांचे उध्दारकमाझी नोकरी, माझे घर करणारे माणस स्वत:साठीच जगतात. परंतु दुसऱ्यासाठी जगणारे माणसे समाजात अत्यल्प असतात. याच अत्यल्प व्यक्तीतील एक माणूस म्हणजे दुलीचंद बुध्दे. त्यांनी मागील दहा वर्षापासून नाथजोगींच्या उत्थानासाठी कार्य करून त्यांच्या वस्तीत वीज, पाणी ची सोय करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले. त्यांना त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र मिळवून देण्यास ते यशस्वी राहीले. त्यांच्यासाठी निवास व्यवस्था यशवंतराव चव्हाण निवास योजनेंतर्गत त्यांच्यासाठी निवास मंजूर करण्यात आले. त्यांनू अनेक अधिकारी, पदाधिकारी यांना त्यांच्या वस्तीत नेऊन त्यांच्या समस्यांची माहिती दिली. परंतु भेट देणाऱ्या लोकप्रतिनधींनी फोटो काढल्या तर काहींनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यात वरिष्ट अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. ‘राजाने छळले, नवऱ्याने मारले आणि पावसाने झोडपले तर दाद मागयची कुणाकडे? हे बुध्दे यांचे नाथजोगी संदर्भातील वाक्य लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या समोर उपस्थित करीत असल्याने हे वाक्य भल्या-भल्यांना बुचकळ्यात पाडते. त्यावरच अनेक लोक त्यांच्या शब्दाला मान देऊन या नाथजोगींच्या तांड्यावर जातात. नाथजोगी समाजाचे उध्दारक बुध्देच असल्याचे नाथजोगी सांगतात. ‘गीरते को उठाना धर्म मेरा’ हे समजून बुध्दे कार्य करीत आहेत.