शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

विद्यार्थ्यांनो, यशाचे शिखर गाठा

By admin | Updated: September 10, 2016 00:20 IST

विद्यार्थ्यांनी जीवनात वेळेला महत्त्व द्यावे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आज मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत.

उषा मेंढे : प्रगतीसाठी सुविधांचा लाभ घ्या, अनेक मान्यवरांनी केले मार्गदर्शनगोंदिया : विद्यार्थ्यांनी जीवनात वेळेला महत्त्व द्यावे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आज मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. पूर्वी आजसारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा फायदा घेवून यशाची शिखरे गाठावी, असे आवाहन जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. आमगाव तालुक्यातील पद्मपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दत्परविरहित दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, नामदेवराव सूर्यवंशी, सुशीलाबाई सूर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसीलदार साहेबराव राठोड, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, सरपंच सीता पाथोडे, उपसरपंच किरणापुरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय ब्राम्हणकर, उपाध्यक्ष गणेश तलमले, शिक्षण विस्तार अधिकारी घोषे, केंद्रप्रमुख रामटेके, रूमटू रिड या मुंबई येथील सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी राज शेखर, सर्व शिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन, पोलीस निरिक्षक सांडभोर, पत्रकार ओ.बी. डोंगरवार, नरेश रिहले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.मेंढे पुढे म्हणाल्या, विविध स्पर्धेच्या बाबतीत ग्रामीण भागातील मुले शहरी भागातील मुलांपेक्षा कमी नाहीत. त्यांना योग्य मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध झाल्या तर ते शहरी भागातील मुलांपेक्षाही पुढे जातील. माणसाच्या जीवनात प्रतिस्पर्धी असेल तर यश नक्की मिळते, असेही मेंढे यावेळी म्हणाल्या. डॉ. सूर्यवंशी म्हणाले, आयुष्यात ५० ते ६० वर्षे मजेत राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी खूप शिकावे. विविध स्पर्धेत सहभागी व्हावे. चुकणे आणि शिकणे हे शाळेतच होते. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी शिक्षणाचा उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. दर महिन्यातून एकदा जिह्यातील वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी विविध शाळांना भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधून आम्ही कसे घडलो, याबाबतची माहिती प्रेरणा दिनातून देत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना यापासून प्रेरणा मिळत आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये अनेक शैक्षणकि उपक्र म राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी भरपूर खेळावे. तसेच भरपूर अभ्याससुध्दा करावा. आईवडिलांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी केलेल्या कष्टामुळे आपण या पदापर्यंत पोहोचल्याचे सांगितले. मुलांच्या आयुष्यात यशस्वी होण्यात त्यांच्या गुरूजनांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या मार्गदर्शनातूनच पुढे जायचे असते असेही त्यांनी सांगितले.राष्ट्रगीताने कार्यक्रम सुरू झाले. विद्यार्थी प्रतिनिधींनी परिपाठ सादर केला. सर्व धनापेक्षा विद्याधन हे सर्वश्रेष्ठ धन असल्याचा सूविचार विद्यार्थ्यांनी सांगितला. दिन विशेषाचा उल्लेख करताना जागतिक साक्षरता दिन व दप्तरविरिहत दिन असल्याचे सांगितले. भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा; भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, माणुसकी ही बोधकथा, आठच्या पाढ्याचे सामूहिक वाचन, सामान्य ज्ञानाच्या प्रश्नावरून ‘सारे जहाँ से अच्छा हिंदूस्ता हमारा’ या गीताचे कवी इकबाल, संगणकाचे संशोधक, भारताची उडान परी, आद्यक्रांतिकारक यावर सामान्य ज्ञानाचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या गटाने उपस्थित विद्यार्थ्यांना विचारले. जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी दिली. तहसील कार्यालय आमगावच्या वतीने इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व बिस्कीट देवून करण्यात आले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस.एम. उपलपवार, देशमुख, शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले. कार्यक्र माला शाळा व्यवस्थापन समि, ग्रामपंचायत, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ यांचे पदाधिकारी, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक एस.एम. उपलपवार यांनी मानले.(प्रतिनिधी)मुलींना खूप शिकवावेधनाची पेटी असलेल्या मुलींना पालकांनी खूप शिकवावे. आई ही पहिली शिक्षिका असते. बेटी बचाओ-बेटी पढाओ हा संकल्प प्रत्येक पालकांनी केला पाहिजे. वेळेचे महत्व समजून पालकांनी मुलांचा अभ्यास नियमित करावा. शिक्षण हे महत्वाचे धन असून ते कधीच वाया जात नाही. शिक्षण हे महत्वाचे दान आहे. शिक्षकाची नोकरी ही प्रेरणादायी आहे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आई सुशीला सूर्यवंशी यांनी केले.