शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

विद्यार्थ्यांना धड जेवणही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 21:54 IST

वसतिगृहात राहून चांगले शिक्षण घेता यावे, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी घरापासून दूर राहात आहेत.

ठळक मुद्देकंत्राटदाराचे मनमानी धोरण : अधिकाºयांचे अभय, तक्रारींची दखल नाही, विद्यार्थी दहशतीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वसतिगृहात राहून चांगले शिक्षण घेता यावे, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी घरापासून दूर राहात आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना वसतिगृहात दोन वेळचे धड जेवणही मिळत नसल्याने अर्धपोटी झोपावे लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.गोंदियापासून २ कि.मी.अंतरावर असलेल्या मुर्री येथील अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा व वसतिगृह आहे. या वसतिगृहात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील १५० वर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दोन वेळेचे जेवण, नाश्ता, दूध दिले जाते. यासाठी सामाजिक न्याय विभागाने एका कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण मिळावे यासाठी शासनाकडून कंत्राटदाराला पैसे देखील मोजले जातात. मात्र मागील दोन तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. काही विद्यार्थ्यांनी याची तक्रार केल्यानंतर जेवणाच्या दर्जात सुधारणा करण्याऐवजी उलट विद्यार्थ्यांना दमदाटी करुन गप्प बसण्यास सांगत असल्याचे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. सकाळचा नास्ता देखील निकृष्ट दर्जाचा असतो. विद्यार्थ्यांना दोन वेळेचे पोटभर जेवण देण्याची तरतूद आहे. मात्र विद्यार्थ्यांना मोजकेच जेवण दिले जात असल्याची माहिती आहे. एखाद्या विद्यार्थ्यांने पोळी किंवा वरणाची मागणी केल्यास त्याला ते देता दमदाटी करुन परत पाठविले जाते. त्यामुळे कित्येकदा आम्हाला उपाशीपोटी झोपावे लागत असल्याचे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणाची तक्रार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अनेकदा गृहपाल आणि समाजकल्याण विभागाकडे केली. पण त्याची दखल घेतली नाही.विद्यार्थ्यांनाच दमदाटीवसतिगृहातील विद्यार्थ्यांना दोन वेळेच जेवण देण्यासाठी कंत्राटदाराने स्वंयपाकी कर्मचाºयांची नेमणूक केली आहे. मात्र या कर्मचाºयांकडून विद्यार्थ्यांना नेहमीच दमदाटी केली जाते. जेवण आणि नास्ता देखील देण्यास टाळटाळ केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे.आतापर्यंत अनेकदा तक्रारवसतिगृहातील विद्यार्थ्यांना कंत्राटदाराकडून दिल्या जाणाºया जेवणाचा दर्जा योग्य नाही. कर्मचाºयांकडून दमदाटी केली जात असल्याची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी किमान सहा ते सात वेळा गृहपाल आणि समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे केली. मात्र त्यांच्या तक्रारीची अद्यापही दखल घेण्यात आली नाहीसमाज कल्याण विभागाचे दुर्लक्षवसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणासंबंधी असलेल्या तक्रारी गृहपालाने लेखीपत्र देऊन समाज कल्याण विभागाच्या अधिकाºयांना वांरवार कळविल्या. मात्र अधिकाºयांनी याची अद्यापही दखल घेतलेली. त्यामुळे या विभागाचे अधिकारी कंत्राटदाराला अभय देत असल्याचा आरोप आहे.