शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

विद्यार्थ्यांना धड जेवणही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 21:54 IST

वसतिगृहात राहून चांगले शिक्षण घेता यावे, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी घरापासून दूर राहात आहेत.

ठळक मुद्देकंत्राटदाराचे मनमानी धोरण : अधिकाºयांचे अभय, तक्रारींची दखल नाही, विद्यार्थी दहशतीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वसतिगृहात राहून चांगले शिक्षण घेता यावे, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी घरापासून दूर राहात आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना वसतिगृहात दोन वेळचे धड जेवणही मिळत नसल्याने अर्धपोटी झोपावे लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.गोंदियापासून २ कि.मी.अंतरावर असलेल्या मुर्री येथील अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा व वसतिगृह आहे. या वसतिगृहात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील १५० वर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दोन वेळेचे जेवण, नाश्ता, दूध दिले जाते. यासाठी सामाजिक न्याय विभागाने एका कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण मिळावे यासाठी शासनाकडून कंत्राटदाराला पैसे देखील मोजले जातात. मात्र मागील दोन तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. काही विद्यार्थ्यांनी याची तक्रार केल्यानंतर जेवणाच्या दर्जात सुधारणा करण्याऐवजी उलट विद्यार्थ्यांना दमदाटी करुन गप्प बसण्यास सांगत असल्याचे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. सकाळचा नास्ता देखील निकृष्ट दर्जाचा असतो. विद्यार्थ्यांना दोन वेळेचे पोटभर जेवण देण्याची तरतूद आहे. मात्र विद्यार्थ्यांना मोजकेच जेवण दिले जात असल्याची माहिती आहे. एखाद्या विद्यार्थ्यांने पोळी किंवा वरणाची मागणी केल्यास त्याला ते देता दमदाटी करुन परत पाठविले जाते. त्यामुळे कित्येकदा आम्हाला उपाशीपोटी झोपावे लागत असल्याचे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणाची तक्रार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अनेकदा गृहपाल आणि समाजकल्याण विभागाकडे केली. पण त्याची दखल घेतली नाही.विद्यार्थ्यांनाच दमदाटीवसतिगृहातील विद्यार्थ्यांना दोन वेळेच जेवण देण्यासाठी कंत्राटदाराने स्वंयपाकी कर्मचाºयांची नेमणूक केली आहे. मात्र या कर्मचाºयांकडून विद्यार्थ्यांना नेहमीच दमदाटी केली जाते. जेवण आणि नास्ता देखील देण्यास टाळटाळ केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे.आतापर्यंत अनेकदा तक्रारवसतिगृहातील विद्यार्थ्यांना कंत्राटदाराकडून दिल्या जाणाºया जेवणाचा दर्जा योग्य नाही. कर्मचाºयांकडून दमदाटी केली जात असल्याची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी किमान सहा ते सात वेळा गृहपाल आणि समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे केली. मात्र त्यांच्या तक्रारीची अद्यापही दखल घेण्यात आली नाहीसमाज कल्याण विभागाचे दुर्लक्षवसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणासंबंधी असलेल्या तक्रारी गृहपालाने लेखीपत्र देऊन समाज कल्याण विभागाच्या अधिकाºयांना वांरवार कळविल्या. मात्र अधिकाºयांनी याची अद्यापही दखल घेतलेली. त्यामुळे या विभागाचे अधिकारी कंत्राटदाराला अभय देत असल्याचा आरोप आहे.