शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

विद्यार्थ्यांना धड जेवणही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 21:54 IST

वसतिगृहात राहून चांगले शिक्षण घेता यावे, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी घरापासून दूर राहात आहेत.

ठळक मुद्देकंत्राटदाराचे मनमानी धोरण : अधिकाºयांचे अभय, तक्रारींची दखल नाही, विद्यार्थी दहशतीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वसतिगृहात राहून चांगले शिक्षण घेता यावे, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी घरापासून दूर राहात आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना वसतिगृहात दोन वेळचे धड जेवणही मिळत नसल्याने अर्धपोटी झोपावे लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.गोंदियापासून २ कि.मी.अंतरावर असलेल्या मुर्री येथील अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा व वसतिगृह आहे. या वसतिगृहात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील १५० वर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दोन वेळेचे जेवण, नाश्ता, दूध दिले जाते. यासाठी सामाजिक न्याय विभागाने एका कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण मिळावे यासाठी शासनाकडून कंत्राटदाराला पैसे देखील मोजले जातात. मात्र मागील दोन तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. काही विद्यार्थ्यांनी याची तक्रार केल्यानंतर जेवणाच्या दर्जात सुधारणा करण्याऐवजी उलट विद्यार्थ्यांना दमदाटी करुन गप्प बसण्यास सांगत असल्याचे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. सकाळचा नास्ता देखील निकृष्ट दर्जाचा असतो. विद्यार्थ्यांना दोन वेळेचे पोटभर जेवण देण्याची तरतूद आहे. मात्र विद्यार्थ्यांना मोजकेच जेवण दिले जात असल्याची माहिती आहे. एखाद्या विद्यार्थ्यांने पोळी किंवा वरणाची मागणी केल्यास त्याला ते देता दमदाटी करुन परत पाठविले जाते. त्यामुळे कित्येकदा आम्हाला उपाशीपोटी झोपावे लागत असल्याचे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणाची तक्रार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अनेकदा गृहपाल आणि समाजकल्याण विभागाकडे केली. पण त्याची दखल घेतली नाही.विद्यार्थ्यांनाच दमदाटीवसतिगृहातील विद्यार्थ्यांना दोन वेळेच जेवण देण्यासाठी कंत्राटदाराने स्वंयपाकी कर्मचाºयांची नेमणूक केली आहे. मात्र या कर्मचाºयांकडून विद्यार्थ्यांना नेहमीच दमदाटी केली जाते. जेवण आणि नास्ता देखील देण्यास टाळटाळ केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे.आतापर्यंत अनेकदा तक्रारवसतिगृहातील विद्यार्थ्यांना कंत्राटदाराकडून दिल्या जाणाºया जेवणाचा दर्जा योग्य नाही. कर्मचाºयांकडून दमदाटी केली जात असल्याची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी किमान सहा ते सात वेळा गृहपाल आणि समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे केली. मात्र त्यांच्या तक्रारीची अद्यापही दखल घेण्यात आली नाहीसमाज कल्याण विभागाचे दुर्लक्षवसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणासंबंधी असलेल्या तक्रारी गृहपालाने लेखीपत्र देऊन समाज कल्याण विभागाच्या अधिकाºयांना वांरवार कळविल्या. मात्र अधिकाºयांनी याची अद्यापही दखल घेतलेली. त्यामुळे या विभागाचे अधिकारी कंत्राटदाराला अभय देत असल्याचा आरोप आहे.