शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

विद्यार्थ्यांनो, आवडीचे क्षेत्र निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

अर्जुनी-मोरगाव : विद्यार्थी जीवन हा एक सुंदर प्रवास आहे. या प्रवासात अनेक खाचखळगे येतात. त्या अडचणींवर मात करून आपली ...

अर्जुनी-मोरगाव : विद्यार्थी जीवन हा एक सुंदर प्रवास आहे. या प्रवासात अनेक खाचखळगे येतात. त्या अडचणींवर मात करून आपली प्रगती करीत राहिले पाहिजे. दहावीची परीक्षा हा त्या प्रवासातील टर्निंग पॉइंट आहे. आई-वडील व शिक्षक या त्रिसूत्रीमुळे तुमचा जीवन प्रवास सोपा बनला आहे. अशात विद्यार्थ्यांनो तुम्हाला ज्या क्षेत्रात रुची आहे ते क्षेत्र निवडा, असे प्रतिपादन श्रीमती किशोर बाई शिक्षण संस्थेचे सचिव अनिल मंत्री यांनी केले.

जीएमबी विद्यालयात दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा नानोटी, शाळेचे पर्यवेक्षक मुकेश शेंडे, सरस्वती विद्यालयाच्या पर्यवेक्षिका छाया घाटे, प्रा. यादव बुरडे, संजय बंगळे, राजेंद्र काकडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते देवी सरस्वतीच्या छायाचित्राचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

जीएमबी विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, यामध्ये १५ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण संपादन केले आहेत. प्रावीण्य श्रेणीत ३६ तर प्रथम श्रेणीत ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ९० टक्के गुण संपादन करणाऱ्यांमध्ये सेजल बारापात्रे (९६.८०), मुस्कान माखिजा (९६.२०), उन्नती लांजेवार (९५.४०), पूर्वा बुरडे (९५), हितेश्वरी शहारे (९४.२०), भूषण पाऊलझगडे (९४.२०), सृष्टी जनबंधू (९४), कावेरी कापगते (९२.६०), श्रेयस बोरकर (९२.२०), काजल उपरीकर (९१.८०), दीपक शहारे (९१.४०), विवेक बोरकर (९०.८०), दीपिका भेंडारकर (९०.४०), सानिया कुरेशी (९०.२०), आयुष निखारे (९१.४०) यांचा समावेश आहे. शाळेचा निकाल वास्तव असून अशा पद्धतीने लावलेल्या निकालामुळे पालक व विद्यार्थी समाधानी असून समाधान हाच माणसाच्या अंगी असलेला फार मोठा गुण आहे, असे प्रतिपादन प्राचार्य नानोटी यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव मंत्री व प्राचार्य नानोटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन करून आभार विष्णू चाचेरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.