शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

विद्यार्थ्यांनो, गुणवंतासह नामवंत बना! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:32 IST

अर्जुनी-मोरगाव : विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या वास्तवातील क्षमतेवर आधारित वर्ग १२ वीचा निकाल लागला आहे. यात फार मोठा सत्यांश आहे. ...

अर्जुनी-मोरगाव : विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या वास्तवातील क्षमतेवर आधारित वर्ग १२ वीचा निकाल लागला आहे. यात फार मोठा सत्यांश आहे. या यशात विद्यार्थ्यांची खरी मेहनत आहे. शिस्त, संस्कार व शिक्षण हीच त्रिसूत्री विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात बाळगली पाहिजे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही बुद्धिमत्तेच्या आधारावर गुणवंत बना, परंतु त्यासोबतच आपल्यातील कौशल्याच्या आधारावर आवडीच्या क्षेत्राची निवड करून त्या क्षेत्रात नामवंत बनावे, असे प्रतिपादन प्राचार्य अनिल मंत्री यांनी केले.

सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय व जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित इयत्ता बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा नानोटी, पर्यवेक्षिका छाया घाटे, मुकेश शेंडे, मुख्याध्यापक हरिदास गहाणे, प्रा. वाय.ए. बुरडे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वतीच्या छायाचित्राचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. टी.एस. बिसेन यांनी बारावीचा निकाल बोर्डाच्या निकषानुसार लावला असून यामध्ये प्राचार्यांची दूरदृष्टी, निरंतर मूल्यमापन पद्धती, सराव परीक्षांचे आयोजन, ऑनलाइन-ऑफलाइन वर्ग यांचा समावेश असल्याचे सांगितले. नानोटी यांनी, विद्यार्थी जीवनात वर्ग १२ वीनंतर जीवनाची दिशा निश्चित होते. या वर्षी परीक्षा झाली असती तर आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना नक्कीच जिल्ह्यात प्रथम स्थान प्राप्त करता आले असते, असे सांगितले. सूत्रसंचालन करून आभार प्रा. इंद्रनील काशीवार यांनी मानले.

-----------------------------

या गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार

याप्रसंगी ९० टक्केपेक्षा जास्त गुण संपादन करणारे विद्यार्थी भैरवी पुस्तोडे, शारदा बरैया, विक्रम गदवार, तृषा हातझाडे, कांचन शहारे, कशिश मेश्राम, चेतन खुणे, कुणाल चांदेवार, वैभव चकोले, हर्षल बोरकर, अंकिता गहाणे, अंजली बनसोड, विधी जांभूळकर व प्रियंका रॉय या विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.