शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते आठवीचे विद्यार्थी पूर्ण पुस्तकांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 16:55 IST

सर्व शिक्षा अभियानातंर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप केले जाते. मात्र यंदा शाळा सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना गणित व इंग्रजी विषयाच्या पुस्तकांचा पुरवठा न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान शिक्षण विभागाने केले हातवर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्व शिक्षा अभियानातंर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप केले जाते. मात्र यंदा शाळा सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना गणित व इंग्रजी विषयाच्या पुस्तकांचा पुरवठा न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांना पाठपुस्तकांचे वाटप झाल्याचे सांगत हातवर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही स्थिती केवळ गोंदिया जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यभरात असल्याची माहिती आहे.कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने सक्तीचे शिक्षणाचा कायदा लागू केला. तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून नि:शुल्क पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू केले. मात्र याचे योग्य नियोजन न केल्याने दरवर्षी याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शिक्षण विभागाने युडायस या संकेतस्थळावर प्रत्येक जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या मागवून शाळा सुरू होण्यापूर्वीच पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याची शक्यता होती. जिल्हा शिक्षण विभागाने सुध्दा प्रसिध्द पत्रक काढून प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करुन पाठ्यपुस्तकांचे वाटप केल्याचा मोठा गाजावाजा केला. मात्र अद्यापही राज्यातील काही जिल्ह्यातील आठवीच्या विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजी विषयांच्या पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला नाही. तर पहिल्या वर्गाची सुध्दा पुस्तके मिळाली नसल्याची ओरड विद्यार्थी व त्यांच्या पालकांची आहे. गोंदिया जिल्ह्यातील चोपा,बिजेपार, गोरेगाव, आमगाव, सालेकसा येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही इंग्रजी व गणित विषयांची पुस्तके मिळाली नाही. त्यामुळे या विषयाचे शिक्षक जेव्हा वर्गात शिकवित असतात तेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या चेहऱ्याकडे पाहत राहावे लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान ही स्थिती केवळ जिल्ह्यात नसून राज्यातील इतरही जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे शाळा सुरू होवून आता तीन महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तके न मिळाल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे.

बाजारपेठेत पुस्तके मिळेनाइयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरुन पुस्तके घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे बाजारपेठेतील पुस्तक विक्रेत्यांनी सुध्दा या वर्गाची पुस्तके ठेवणे बंद केले आहे. विद्यार्थी बाजारपेठेत सदर विषयाची पुस्तके घेण्यासाठी गेल्यावर त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

दरवर्षी पुस्तकांमध्ये १५ ते २० टक्के कपातशालेय शिक्षण विभागातर्फे शाळांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यापूर्वी युडायस या संकेतस्थळावर पुस्तकांची मागणी मागविते. बरेचदा मागील वर्षीची विद्यार्थी संख्या गृहीत धरुन पुस्तकांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे विद्यार्थी वाढल्यास त्यांना पाठपुस्तकांपासून वंचित राहावे लागते. तर मागील दोन तीन वर्षांपासून शासन पाठपुस्तकाच्या पुरवठ्यात १५ ते २० टक्के कपात करीत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. जर काही ठिकाणी पुस्तके मिळाले नसल्याची तक्रारी असल्यास माहिती घेवून त्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जाईल.-उल्हास नरड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक गोंदिया.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र