शहरं
Join us  
Trending Stories
1
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
2
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
3
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
4
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
5
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
6
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
7
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
9
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
10
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
11
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
12
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
13
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
14
‘काँग्रेस म्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
15
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
16
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
17
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
18
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
19
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
20
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'

८०० मीटर रस्त्यासाठी ५० वर्षांपासून संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:39 IST

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा आणि आमगाव या दोन तालुक्यांना जोडणारा धानोली बाम्हणी मार्ग रेल्वेच्या हद्दीत काही प्रमाणात येतो. त्यामुळे ८०० मीटर रस्ता बनविण्यासाठी धानोली परिसरातील आठ ते दहा गावचे लोक मागील ५० वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. पण प्रशासनाला अद्यापही पाझर फुटला नसल्याने त्यांचा संघर्ष कायम आहे.सालेकसा तालुक्यातील ...

ठळक मुद्देरस्त्याअभावी रेल्वे रुळावरुन जीवघेणा प्रवास : रेल्वेमुळे अडला दोन तालुक्यांना जोडणारा मार्ग

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा आणि आमगाव या दोन तालुक्यांना जोडणारा धानोली बाम्हणी मार्ग रेल्वेच्या हद्दीत काही प्रमाणात येतो. त्यामुळे ८०० मीटर रस्ता बनविण्यासाठी धानोली परिसरातील आठ ते दहा गावचे लोक मागील ५० वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. पण प्रशासनाला अद्यापही पाझर फुटला नसल्याने त्यांचा संघर्ष कायम आहे.सालेकसा तालुक्यातील धानोली व आमगाव तालुक्यातील बाम्हणी (बोरकन्हार) या दोन गावांच्या मधातून वाघनदी वाहते. ही नदी दोन्ही तालुक्याच्या सीमेवरुन वाहते. या नदीच्या पलिकडे धानोलीवरुन जवळपास चार किमी अंतर पार केल्यावर बाम्हणी गावात पोहोचल्यास आमगावच्या बाजारपेठेत जाणे एकदम सोयीचे ठरते. त्यामुळे धानोली आणि बाम्हणी परिसरातील गावकरी मागील ५० वर्षांपासून पक्का रस्ता तयार करुन देण्याची मागणी करीत आहेत. मात्र प्रशासनाने त्यांच्या मागणीची अद्यापही दखल घेतली नाही. परिणामी या परिसरातील गावकºयांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.रस्ता नसल्याने लोक वाघनदीवरुन रुळावरुन येण्याची घाई करतात. त्यामुळे केव्हाही येथे मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जवळपास ३०० मीटर अंतर पार करेपर्यंत दोन्ही बाजूने रेल्वे गाडी आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे दरवर्षी दोन-चार लोकांचा यात बळी जातो. हाच धोका ओळखून धानोली, बाम्हणी परिसरातील गावकºयांनी पक्का रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे.वीस वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने धानोली-बाम्हणी मार्गाचे खडीकरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु बिलासपूर झोन अंतर्गत रेल्वे अधिकारी यांनी ऐन बांधकाम सुरु होण्यापूर्वी येथे येऊन काम थांबविले. हा मार्ग रेल्वेच्या हद्दीत असून या जागेवरुन रस्ता तयार करता येणार नसल्याचे सांगत काम बंद पाडले. तेव्हापासून रस्त्याचे काम रखडले.मागील वर्षी या शिष्टमंडळाने खा. अशोक नेते यांच्यासह नागपूर रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे व्यथा मांडली. तेव्हा त्यांनी गोंदियाच्या जिल्हा जिल्हाधिकारीमार्फत प्रस्ताव पाठविण्याचा सल्ला दिला. तेव्हा शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन आपली अडचण सविस्तर मांडली. दरम्यान जिल्हाधिकारी बदलत गेले. मात्र धानोली बाम्हणी रस्त्याची समस्या कायम आहे.विद्यमान लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा५० वर्षे लोटूनही ८०० मीटरच्या रस्त्याची समस्या मार्गी लागली नाही. या क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी काही दिवसांपूर्वीच धानोली गावाला भेट दिली . तेव्हा गावकºयांनी एकत्र येत धानोली, बाम्हणी रस्त्याची समस्या आधी मार्गी लावण्याची मागणी केली. धानोली, बाम्हणी दरम्यान वाघ नदीवर युती शासनाच्या काळात एक कोल्हापुरी बंधारा तयार करण्यात आला होता. ही समस्या लक्षात घेता विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.लोकप्रतिनिधींचे केवळ आश्वासनया परिसरातील गावकºयांनी अनेकदा या भागातील खासदार, आमदार यांच्याकडे रस्त्याची समस्या मांडून ती मार्गी लावण्याची मागणी केली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले. त्यानंतर गावकºयांच्या शिष्टमंडळाने रेल्वे अधिकारी व जिल्हा प्रशासनाची भेट घेवून रस्त्याची समस्या मार्गी लावण्याची मागणी केली.सात गावांना होणार फायदाधानोली-बाम्हणी पक्का रस्ता व वाघ नदीवर पुलाची निर्मिती झाल्यास आमगाव व सालेकसा येथील लोकांना कमी कमीत वेळात आपला प्रवास करता येईल. यात सालेकसा तालुक्यातील धानोली, दरबडा, नानव्हा, बोदलबोडी, गिरोला, तिरखेडी परिसरातील जवळपास २२ हजार लोकांना लाभ होईल.