शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन : कनिष्ठ अभियंता बिसेन व अन्य अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:57 IST

मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिक संकटात आली आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र यानंतरही पाटबंधारे विभाग जलाशयाचे पाणी सोडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

ठळक मुद्देसंग्रामपूर जलाशयाचे पाणी सोडा

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिक संकटात आली आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र यानंतरही पाटबंधारे विभाग जलाशयाचे पाणी सोडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. तालुक्यातील संग्रामपूर जलाशयाचे पाणी पिकांसाठी सोडण्यात यावे. या मागणीला घेवून जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती यांच्या नेतृत्त्वात येथील पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.संग्रामपूर जलाशयाचे पाणी यापूर्वी सोडण्यात आले होते. मात्र मध्येच पाणी बंद केल्याने सर्वच शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे धानपिक संकटात आले आहे. याची माहिती पाटबंधारे विभागाला देण्यात आली. विशेष म्हणजे, यावर्षी संग्रामपूर जलाशय शंभर टक्के भरले होते. त्यामुळे खरीपासह रब्बीला देखील पाणी मिळेल अशी आशा शेतकऱ्यांत निर्माण झाली होती. मात्र पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे कालव्यातील पाणी वाहून गेले.त्यामुळे खरीपासह रब्बीचा हंगाम सुद्धा संकटात आला आल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. पिकांना पाण्याची गरज असून पावसाअभावी धानपिक वाळत असल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट अधिक गडद होत आहे. त्यामुळे पिकांची स्थिती लक्षात घेता जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र विभागाकडून पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून कनिष्ठ अभियंता बिसेन व संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली.