शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन : कनिष्ठ अभियंता बिसेन व अन्य अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:57 IST

मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिक संकटात आली आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र यानंतरही पाटबंधारे विभाग जलाशयाचे पाणी सोडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

ठळक मुद्देसंग्रामपूर जलाशयाचे पाणी सोडा

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिक संकटात आली आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र यानंतरही पाटबंधारे विभाग जलाशयाचे पाणी सोडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. तालुक्यातील संग्रामपूर जलाशयाचे पाणी पिकांसाठी सोडण्यात यावे. या मागणीला घेवून जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती यांच्या नेतृत्त्वात येथील पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.संग्रामपूर जलाशयाचे पाणी यापूर्वी सोडण्यात आले होते. मात्र मध्येच पाणी बंद केल्याने सर्वच शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे धानपिक संकटात आले आहे. याची माहिती पाटबंधारे विभागाला देण्यात आली. विशेष म्हणजे, यावर्षी संग्रामपूर जलाशय शंभर टक्के भरले होते. त्यामुळे खरीपासह रब्बीला देखील पाणी मिळेल अशी आशा शेतकऱ्यांत निर्माण झाली होती. मात्र पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे कालव्यातील पाणी वाहून गेले.त्यामुळे खरीपासह रब्बीचा हंगाम सुद्धा संकटात आला आल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. पिकांना पाण्याची गरज असून पावसाअभावी धानपिक वाळत असल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट अधिक गडद होत आहे. त्यामुळे पिकांची स्थिती लक्षात घेता जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र विभागाकडून पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून कनिष्ठ अभियंता बिसेन व संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली.