शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

सुदृढ आरोग्यासाठी मन बळकट हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 22:13 IST

अभ्यासक्रम व शालेय जीवनातील विविध समस्या यामुळे आज तरुण पिढीमध्ये नैराश्य येवून आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. सुदृढ आरोग्यासाठी मनाने बळकट व्हायला पाहिजे, असे समुपदेशन केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमित वालदे यांनी केले.

ठळक मुद्देअमित वालदे : विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यावर समुपदेशन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : अभ्यासक्रम व शालेय जीवनातील विविध समस्या यामुळे आज तरुण पिढीमध्ये नैराश्य येवून आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. सुदृढ आरोग्यासाठी मनाने बळकट व्हायला पाहिजे, असे समुपदेशन केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमित वालदे यांनी केले.जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत गोंदिया येथील के. टी. एस. रुग्णालयाच्यावतीने शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम सरस्वती विद्यालयात इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य, समस्या व उपाय यावर समुपदेशन करताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका वीणा नानोटी होत्या. या वेळी प्रामुख्याने के. टी. एस. रुग्णालयातील मानसिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. मीना रेवतकर उपस्थित होत्या.डॉ. वालदे पुढे म्हणाले, मित्रांचा सहवास, वाईट सवयी, मित्रांचे दडपण, रॅगिंग इत्यादीमुळे ताणतणाव वाढते. कुमारवयात लैगिंक गोष्टींचे आकर्षण वाढत जाते. त्यामुळे भावभावना वाढतात. अशावेळी आपली वागणूक चांगली ठेवा. याच वयात लैगिंक भावनांमुळे आपले पाऊल चुकीच्या दिशेकडे वळते. परिणामी फार गंभीर समस्या निर्माण होतात. मोबाईलचा चांगल्या कामासाठी उपयोग करा. आज मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम घडत आहे. विद्यार्थी जीवनात मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनता वाढली आहे. मोबाईल, धुम्रपान, मद्यप्राशन, टी.वी., व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या अतिवापरामुळे ताणतणाव वाढला आहे. यावर नियंत्रण ठेवावे, असे त्यांनी सांगितले.तर डॉ. रेवतकर यांनी, आज मुलांना आई-वडिलांची घातलेली बंधने जाचक वाटतात. या वयात विद्यार्थ्यांच्या मनाचा पुरेसा विकास झालेला नसतो. आपल्यावर परकीय संस्कृतीचा परिणाम झाला आहे. व्यक्तिगत व्यक्तिमत्व काय, हे ओळखता यायला हवे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाला ५५० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. संचालन छाया घाटे यांनी केले. कार्यक्रमासाठी माधुरी पिलारे, शिवचरण रार्घोते, संजयकुमार बंगळे, के.के. लोथे, प्रा. तारका रुखमोडे, सुरेश बर्गे आदिंनी सहकार्य केले.