शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

पक्ष संघटन मजबूत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:44 IST

सामान्य जनता अपप्रचाराला बळी पडल्याने मागील निवडणुकीत आमचा पराभव झाला. यासाठी आम्हाला सुद्धा आत्मचिंतन करावे लागेल. ते आम्ही करीत आहोत.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : प्रत्येक गाव व शहरातील प्रभागात नियुक्त होतील पर्यवेक्षक

ऑनलाईन लोकमतगोंदिया : सामान्य जनता अपप्रचाराला बळी पडल्याने मागील निवडणुकीत आमचा पराभव झाला. यासाठी आम्हाला सुद्धा आत्मचिंतन करावे लागेल. ते आम्ही करीत आहोत. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्ष संघटन बळकट करावे असे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी यांनी येथे केले.राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची बैठक खा. पटेल यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या निवासस्थानी पार पडली. या वेळी ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.याप्रसंगी माजी आ. राजेंद्र जैन, अनिल बावणकर, दिलीप बन्सोड, नाना पंचबुद्धे, नरेश माहेश्वरी, विजय शिवणकर, विनोद हरिणखेडे, मधू कुकडे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, रामू चौधरी, मनोहर चंद्रिकापुरे, रेखा ठाकरे, धनेंद्र तुरकर, अशोक गुप्ता, गंगाधर परशुरामकर, विजय डेकाटे, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, पंचम बिसेन, रमेश ताराम, निता रहांगडाले, वंदना बोरकर, अभिषेक कारेमोरे, केतन तुरकर, कल्याणी भुरे, डॉ. अविनाश काशीवार, चुन्नी बेंद्रे, अशोक शहारे, कुंदन कटारे, छोटू पटले, शुभांगी रहांगडाले, सुमन बिसेन उपस्थित होते.पटेल म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनेक विकास कामे करण्यात आली. यामुळे या दोन्ही जिल्ह्यात रोेजगाराच्या संधी निर्माण झाल्या. संपूर्ण देशात गोंदिया-भंडारा नावारूपास आले. मात्र केंद्र व राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून दिशाभूल केली. गोंदिया-भंडाºयाचा विकास खुंटल्याचा आरोप केला. आता सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच शालीनतेचे परिचय दिला आहे. कार्यकर्त्यांनी गावा गावात पक्षाचे कार्य पोहचवावे. तसेच गोरगरिबांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. कार्यकर्ते व पदाधिकाºयांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सर्व पदाधिकारी सदस्यता अभियानाच्या मोहिमेत सक्रियतेने कार्य करावे. गावागावात राष्टÑवादी काँग्रेसच्या विचारधारेशी लोकांना जोडण्याचे प्रयत्न करावे. आता भाजपने सांप्रदायिकतेचे वातावरण निर्माण करून भावाभावांमध्ये भांडण लावण्याचे काम सुरू केले आहे. ते व्होट बँकेचे राजकारण करीत आहेत. पण आम्हाला भावाला भावाशी जोडून बंधुभाव वाढविण्यासाठी काम करायचे आहे. चांगले लोक व चांगले कार्य करणारे यांना राष्टÑवादी काँग्रेससह जोडा. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य आदी सर्वच क्षेत्रात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्य करावे. आहेत, असे त्यांनी सांगितले.या वेळी दोेन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल