शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

गावातील पथदिवे अजूनही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST

केशोरी : वीज वितरण कंपनीने येथील पथदिव्यांची जोडणी गेल्या २०-२५ दिवसांपूर्वी खंडित केल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. पावसाचे दिवस ...

केशोरी : वीज वितरण कंपनीने येथील पथदिव्यांची जोडणी गेल्या २०-२५ दिवसांपूर्वी खंडित केल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. पावसाचे दिवस असतानाही नागरिकांना अंधाराचा सामना करण्याची वेळ आली आहे. सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी वेळोवेळी प्रयत्न करूनही येथील पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरू होऊ शकला नाही ही ग्रामपंचायतची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

राज्य शासनाने ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून गावातील सार्वजनिक पथदिव्यांचे थकीत बिल भरण्याचे आदेश दिले आहेत. परंतु पथदिव्यांचे बिल भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असताना गाव विकास कामे करणे सोडून सार्वजनिक पथदिव्यांचे वीज बिल का भरावे, असा प्रश्न उपस्थित करून सरपंच-उपसरपंच संघटनेने बिल भरणार नाही, असा निर्णय घेतला आहे. तसेच पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषदेने भरावा अशी मागणी करून शासनाकडे निवेदन सादर केले आहे. परंतु अजूनही सार्वजनिक पथदिव्यांच्या बिल भरण्याचा तिढा सुटलेला नाही.

हा प्रश्न फक्त केशोरी या गावासाठी मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्याचा प्रश्न आहे. जिल्ह्यातील राजकीय पुढाकाऱ्यांनी शासन दरबारात ज्यांचे वजन अशा पुढाऱ्यांनी ग्रामपंचायतींची अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतीची शोकांतिका शासनाकडे मांडून पथदिव्यांच्या थकीत वीज बिल भरण्यासंबंधीचा तिढा सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.