शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

गावातील पथदिवे अजूनही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST

केशोरी : वीज वितरण कंपनीने येथील पथदिव्यांची जोडणी गेल्या २०-२५ दिवसांपूर्वी खंडित केल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. पावसाचे दिवस ...

केशोरी : वीज वितरण कंपनीने येथील पथदिव्यांची जोडणी गेल्या २०-२५ दिवसांपूर्वी खंडित केल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. पावसाचे दिवस असतानाही नागरिकांना अंधाराचा सामना करण्याची वेळ आली आहे. सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी वेळोवेळी प्रयत्न करूनही येथील पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरू होऊ शकला नाही ही ग्रामपंचायतची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

राज्य शासनाने ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून गावातील सार्वजनिक पथदिव्यांचे थकीत बिल भरण्याचे आदेश दिले आहेत. परंतु पथदिव्यांचे बिल भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असताना गाव विकास कामे करणे सोडून सार्वजनिक पथदिव्यांचे वीज बिल का भरावे, असा प्रश्न उपस्थित करून सरपंच-उपसरपंच संघटनेने बिल भरणार नाही, असा निर्णय घेतला आहे. तसेच पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषदेने भरावा अशी मागणी करून शासनाकडे निवेदन सादर केले आहे. परंतु अजूनही सार्वजनिक पथदिव्यांच्या बिल भरण्याचा तिढा सुटलेला नाही.

हा प्रश्न फक्त केशोरी या गावासाठी मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्याचा प्रश्न आहे. जिल्ह्यातील राजकीय पुढाकाऱ्यांनी शासन दरबारात ज्यांचे वजन अशा पुढाऱ्यांनी ग्रामपंचायतींची अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतीची शोकांतिका शासनाकडे मांडून पथदिव्यांच्या थकीत वीज बिल भरण्यासंबंधीचा तिढा सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.