शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

वादळग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित

By admin | Updated: July 3, 2016 01:54 IST

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तालुक्यात आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

रावणवाडी : मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तालुक्यात आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याबाबत शासकीय यंत्रणेने प्रत्येक गावात प्रत्यक्ष नुकसानीचे सर्वेक्षण केले. मात्र अद्याप तालुक्यातील वादळग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत प्राप्तच झाली नसून आताही नुकसानग्रस्त आर्थिक मदत कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. वादळग्रस्तांना शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे यासाठी नुकसानग्रस्तांनी स्थानिक तलाठी कार्यालयांना नुकसानीची माहीती पुरविली. त्याच आधारे नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण करून संबंधित वरिष्ठांना कळविली. मात्र अद्याप आर्थिक मदत प्राप्त झाली नाही. नुकसान झाली त्याबाबदची मदत कधी व केव्हा मिळणार याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. याबद्दलची विचारपूस नुकसानग्रस्तांकडून सर्वत्र केली जात आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना अद्याप आर्थिक मदत केली नाही. मग नुकसानीचे सर्वेक्षण फक्त देखाव्यासाठीच करण्यात आले काय? असा सवाल नुकसानग्रस्तांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. घरावरचे छप्पर वादळाने मोडकळीस आले आहे. कोणत्याही घडीला जोरदार पाऊस पडू शकतो. अशात आपल्या कुटूंबासोबत विना छताच्या घरात वास्तव्य करावे तरी कसे, अशा प्रश्न नुकसानग्रस्तांना पडला आहे. वादळग्रस्त आर्थिक मदतीकरीता सरकारी कार्यालयात फिरताना दिसून येत आहेत. मात्र त्यांच्या परिस्थितीला कुणीही समजून घेण्यास तयारच नाहीत. शासनाच्या संबंधित विभागाने योग्यरित्या वादळग्रस्तांना शासकीय मदत त्वरीत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त करीत आहेत. (वार्ताहर)