शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वादळग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित

By admin | Updated: July 3, 2016 01:54 IST

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तालुक्यात आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

रावणवाडी : मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तालुक्यात आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याबाबत शासकीय यंत्रणेने प्रत्येक गावात प्रत्यक्ष नुकसानीचे सर्वेक्षण केले. मात्र अद्याप तालुक्यातील वादळग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत प्राप्तच झाली नसून आताही नुकसानग्रस्त आर्थिक मदत कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. वादळग्रस्तांना शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे यासाठी नुकसानग्रस्तांनी स्थानिक तलाठी कार्यालयांना नुकसानीची माहीती पुरविली. त्याच आधारे नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण करून संबंधित वरिष्ठांना कळविली. मात्र अद्याप आर्थिक मदत प्राप्त झाली नाही. नुकसान झाली त्याबाबदची मदत कधी व केव्हा मिळणार याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. याबद्दलची विचारपूस नुकसानग्रस्तांकडून सर्वत्र केली जात आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना अद्याप आर्थिक मदत केली नाही. मग नुकसानीचे सर्वेक्षण फक्त देखाव्यासाठीच करण्यात आले काय? असा सवाल नुकसानग्रस्तांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. घरावरचे छप्पर वादळाने मोडकळीस आले आहे. कोणत्याही घडीला जोरदार पाऊस पडू शकतो. अशात आपल्या कुटूंबासोबत विना छताच्या घरात वास्तव्य करावे तरी कसे, अशा प्रश्न नुकसानग्रस्तांना पडला आहे. वादळग्रस्त आर्थिक मदतीकरीता सरकारी कार्यालयात फिरताना दिसून येत आहेत. मात्र त्यांच्या परिस्थितीला कुणीही समजून घेण्यास तयारच नाहीत. शासनाच्या संबंधित विभागाने योग्यरित्या वादळग्रस्तांना शासकीय मदत त्वरीत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त करीत आहेत. (वार्ताहर)