शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

वादळग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित

By admin | Updated: July 3, 2016 01:54 IST

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तालुक्यात आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

रावणवाडी : मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तालुक्यात आलेल्या चक्रीवादळ व पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याबाबत शासकीय यंत्रणेने प्रत्येक गावात प्रत्यक्ष नुकसानीचे सर्वेक्षण केले. मात्र अद्याप तालुक्यातील वादळग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत प्राप्तच झाली नसून आताही नुकसानग्रस्त आर्थिक मदत कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. वादळग्रस्तांना शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे यासाठी नुकसानग्रस्तांनी स्थानिक तलाठी कार्यालयांना नुकसानीची माहीती पुरविली. त्याच आधारे नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण करून संबंधित वरिष्ठांना कळविली. मात्र अद्याप आर्थिक मदत प्राप्त झाली नाही. नुकसान झाली त्याबाबदची मदत कधी व केव्हा मिळणार याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. याबद्दलची विचारपूस नुकसानग्रस्तांकडून सर्वत्र केली जात आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना अद्याप आर्थिक मदत केली नाही. मग नुकसानीचे सर्वेक्षण फक्त देखाव्यासाठीच करण्यात आले काय? असा सवाल नुकसानग्रस्तांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. घरावरचे छप्पर वादळाने मोडकळीस आले आहे. कोणत्याही घडीला जोरदार पाऊस पडू शकतो. अशात आपल्या कुटूंबासोबत विना छताच्या घरात वास्तव्य करावे तरी कसे, अशा प्रश्न नुकसानग्रस्तांना पडला आहे. वादळग्रस्त आर्थिक मदतीकरीता सरकारी कार्यालयात फिरताना दिसून येत आहेत. मात्र त्यांच्या परिस्थितीला कुणीही समजून घेण्यास तयारच नाहीत. शासनाच्या संबंधित विभागाने योग्यरित्या वादळग्रस्तांना शासकीय मदत त्वरीत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त करीत आहेत. (वार्ताहर)