शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचे बेमुदत काम बंद

By admin | Updated: July 8, 2014 23:32 IST

ग्रामसेवक युनियनच्या राज्यस्तरीय कामबंद आंदोलनामुळे राज्यात नागरिकांच्या दैनंदिन कामासह विकास कामांना थांबा मिळाला आहे. तर प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेता नागरिकांना

आमगाव : ग्रामसेवक युनियनच्या राज्यस्तरीय कामबंद आंदोलनामुळे राज्यात नागरिकांच्या दैनंदिन कामासह विकास कामांना थांबा मिळाला आहे. तर प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेता नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांना त्रास होत असून दुसरीकडे विकास कामे खोळंबली आहेत. तालुक्यात ग्रामसेवकांच्या राज्यस्तरीय कामबंद आंदोलनामुळे मागील पाच दिवसांपासून गाव विकासाची कामे थांबली असून नागरिकांची दैनंदिन कामे आवश्यक कागदपत्रांअभावी मागे झाली आहेत. आमगाव पंचायत समिती अंतर्गत ६४ ग्रापंचायतींचा कारभार विकासाला पुढे नेत आहे. परंतु ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या शासनाकडून पूर्ण होत नसल्याने त्यांनी राज्यस्तरीय कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुये मागील पाच दिवसांपासून नागरिकांना गाव नमुना आठ, जातीचे, रहिवासी, बिपीएलचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, विद्यार्थ्याना शिष्यवृत्तीसाठी लागणारे प्रमाणपत्र आवश्यक ठराव यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. विद्यार्थ्याना या आंदोलनामुळे सर्वाधीक फटका बसत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी लागणारे प्रमाणपत्र ग्रामपंचायत स्तरावरून मिळत नसल्याने त्यांना प्रवेशापासून वंचीत होण्याची पाळी आली आहे. त्यामुळे प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत पर्यायी व्यवस्था करणे ग्राह्य होते. परंतु याबद्दल प्रशासनाची उदासिनता समोर आली.सडक अर्जुनीतही काम बंद सुरूच सडक/अर्जुनी : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी.एन.ई.१३६ चे दि. २ जुलैपासून संपूर्ण राज्यभर काम बंद आंदोलन अजूनही सुरूच आहे. संपूर्ण तालुक्यातील ग्राम पंचायतीना कुलूप बंद करून चालान व शिक्के खंडविकास अधिकारी यांचेकडे सोपवून आंदोलन अधिक तिव्र करण्यात आलेले आहे. यासंबधी विस्तृत माहिती काढली असता तालुका संघटना अध्यक्ष कमलेश बिसेन यांना कळविले की, आमची लढाई शासनाविरूध्द असून सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा उद्देश नाही. मात्र गेल्या चार वर्षापासून ग्रामसेवक संघटनेच्या रास्त मागण्या मान्य करण्यासाठी वारंवार आंदोलन व चर्चा करूनही केवळ आश्वासन देऊन संघटनेची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे यावेळी राज्य संघटनेने टोकाची भूमिका घेऊन मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलनातून माघार न घेण्याचे ठरविले आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतन त्रुटी दूर करणे, कायम प्रवासभत्ता पगारासोबत ३००० रुपये प्रतिमाह, मनरेगाकरिता कामे स्वतंत्र यंत्रणा ग्रा.पं. स्तरावर कार्यान्वीत करणे, कंत्राटी ग्रामसेवकाचे कंत्राटी सेवकाळ ग्राह्य धरणे, २० ग्रामपंचायतीमागे विस्तार अधिकारी पद निर्माण करणे, सर्व संवर्गाकरिता बदलीचे धोरण करणे,वरील प्रमाणे मागण्याकरिता दिनांक २ जुलैपासून आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू असून विभागनिहाय ग्रामसेवक उपस्थित राहात असून नागपूर विभागाचे सर्व ग्रामसेवक ११ जुलैला आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलनासाठी जाणार असल्याची माहिती अध्यक्ष बिसेन व सचिव कुलदीप कापगते यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)