शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सेतूतील लूट थांबविण्यासाठी शाळेतच मिळणार दाखले

By admin | Updated: May 11, 2017 00:16 IST

दहावी, बारावीचा निकाल लागला की विविध कागदपत्रासाठी विद्यार्थ्यांची झुंबळ उडते. यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातोच,

नाना पटोले यांची माहिती : गरिबांना ६ हजार घरे मिळणार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दहावी, बारावीचा निकाल लागला की विविध कागदपत्रासाठी विद्यार्थ्यांची झुंबळ उडते. यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातोच, मानसिक त्रास होतोच शिवाय त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होते. हे दिवस शेतीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी यंदापासून गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले मिळविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती खा. नाना पटोले यांनी स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली. दहावी,बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी नॉन क्रिमीलेअर, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखल, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासाठी तहसील कार्यालयातील सेतूमध्ये गर्दी करावी लागते. दिवसभर वाया घालवूनही अनेकदा त्यांचे काम होत नाही. सेतू चालविणाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होते. हे होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना मे च्या शेवटच्या आठवड्यातच त्यांच्या शाळांमध्येच आवश्यक दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे मागवून शाळेतच त्यांना दाखले देण्यात येणार आहे. शासनाच्या ठरावीक दरातच ते दाखले विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार असून त्यांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी आपण केलेला हा प्रयत्न असल्याचे सांगितले. नगर परिषद व सर्व नगर पंचायती अंतर्गत येणाऱ्या गरीब कुटूंबाना ६ हजार घरे देण्याचा मानस आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे सांगीतले. सोबतच शासनाच्या मुद्रा कर्ज योजना, जीएसटी अशा विविध विषयावर चर्चा केली. यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे व इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मुद्रा कर्ज योजनेतून रोजगार निर्मीती करायची होती. गरजूंना त्याचा लाभ देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना व बँकाना असल्याचे सांगण्यात आले. गोंदिया शहराची १२५ कोटीची भूमिगत गटार योजना काम न होताच परत गेली. आता अमृत अटल योजनेच्या माध्यमातून नवीन गटार योजना तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे खा. नाना पटोले यांनी सांगितले.