शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

जबलपूर-चांदाफोर्ट गाडीला मुख्य स्थानकांवर थांबा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:32 IST

ईसापूर : सोमवारपासून (दि.८) नव्याने सुरू करण्यात आलेल्या जबलपूर-चांदाफोर्ट या गाडीचा अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवेगावबांध, सौंदड व ...

ईसापूर : सोमवारपासून (दि.८) नव्याने सुरू करण्यात आलेल्या जबलपूर-चांदाफोर्ट या गाडीचा अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवेगावबांध, सौंदड व अर्जुनी- मोरगाव रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल यांनी केली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षेभरापासून गोंदिया-चांदाफोर्ट ही प्रवासी गाडी बंद आहे. त्यामुळे या लोहमार्गावरील प्रवाशांना फार त्रास सहन करावा लागला असून, आर्थिक भुर्दंड सुद्धा बसत आहे. त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या जबलपूर-चांदाफोर्ट रेल्वेगाडीला या मार्गावरील अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध व सौंदड या प्रमुख रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा आणि गोंदिया-चांदाफोर्ट ही प्रवासी रेल्वेगाडी त्वरित सुरू करावी, अशी मागणी जायस्वाल यांनी केली आहे. जबलपूर-चांदाफोर्ट या रेल्वे एक्स्प्रेसचा नैनपूरसारख्या लहान स्थानकावर थांबा देण्यात आला. मात्र अर्जुनी-मोरगावसारख्या विविधतेने नटलेल्या तालुक्यात थांबा मिळू नये हे दुर्दैव आहे.

अर्जुनी-मोरगाव हे विधानसभा क्षेत्र असून, निसर्ग सौंदर्याने नटलेले नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नागझिरा व्याघ्र प्रकल्प, ऐतिहासिक प्रतापगड, निर्वासितांचे तिबेटियन स्थळ व विविध पर्यटनस्थळ असल्याने महाराष्ट्रासह विभिन्न राज्यातील भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. मात्र एकमेव लोहमार्गावरील प्रवासी व एक्स्प्रेस गाड्यांचा अर्जुनी-मोरगाव तालुक्यात थांबा नसल्याने पर्यटक व भाविकांसह या मार्गावरील प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. रेल्वे विभागाने जबलपूर-चांदाफोर्ट ही गाडी आता आठवड्यातून तान दिवस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा सोमवारपासून (दि.८) शुभारंभ झाला आहे. मात्र गोंदिया ते चांदापोर्ट या २५० कि.मी. अंतरावर या गाडीला कुठेच थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने या मार्गावरील महत्त्वपूर्ण स्थानक समजल्या जाणाऱ्या अर्जुनी-मोरगाव, वडसा, नवेगावबांध व सौंदड या रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी जायस्वाल यांनी केली आहे.