शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

तलाठ्यांकडून दाखले देणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:08 IST

तालुक्यातील नागरिकांना विविध कामांसाठी आवश्यक प्रमाणपत्र ७० वर्षापासून मिळत होते. पण सध्या तलाठ्यांनी प्रमाणपत्र देणे बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देलाभार्थी योजनेपासून वंचित : ३८ प्रकारच्या दाखल्यांची समस्या

राजीव फुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील नागरिकांना विविध कामांसाठी आवश्यक प्रमाणपत्र ७० वर्षापासून मिळत होते. पण सध्या तलाठ्यांनी प्रमाणपत्र देणे बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आमगाव तालुक्यात तलाठी कार्यालयातून विविध दाखले देण्याचा तलाठ्यांना अधिकार नसल्याचे कारण सांगून दाखले देण्यास तलाठी संघटनेने मनाई केली आहे.दाखल्यामुळे नागरिकांची शासकीय कामे खोळंबली आहेत. शासकीय कर्मचाºयांना शासनाकडून कुठलेही निर्देश प्राप्त न झाल्याने तलाठी व नागरिक संभ्रमाच्या स्थितीत आहेत. राज्यात नागरिकांना शासकीय कार्यालयात लागणारे प्रमाणपत्र तलाठ्यांमार्फत मिळायचे. त्यामुळे शासकीय कामे लवकर व्हायची. सदर प्रकरणी काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने दिलेल्या सुचनेनुसार तलाठ्यांना ३८ प्रकारचे दाखले देण्याचे अधिकार नसल्याचे कळले. त्यामुळे राज्य पटवारी संघाद्वारे नागरिकांना लागणारे ३८ प्रकारचे प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेतला. सदर प्रमाणपत्रात वारसान प्रमाणपत्र, भूमिहिन शेतमजूर, वंशावळ, रक्त संबंधी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, संयुक्त कुटुंब प्रमाणपत्र, विभक्त प्रमाणपत्र, १९६६ चे कलम २५ (२) अंतर्गत वृक्ष असल्याचे प्रमाणपत्र, निराधार, भिखारी व धर्मदाय संस्थाच्या माध्यमातून मिळणारी मदत, विधवा, परित्यक्ता प्रमाणपत्र, पुर्नविवाह न झाल्याचे प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील प्रमुखाचे प्रमाणपत्र, शासकीय नोकरीत असल्याचे किंवा नसल्याचे प्रमाणपत्र, चल-उचल संपत्ती, ओलित किंवा पडित बागायती कृषी प्रमाणपत्र, जमिनीच्या किमतीचा पंचनामा, कृषी जमिनीचा नकाशा, जमिनीची चर्तुसिमा, विद्युत पंप असल्याचे प्रमाणपत्र, अस्वच्छ व्यवसाय, मुलबाळ असल्याच व, नसल्याचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, भूमिहिन प्रमाणपत्र असे अनेक प्रमाणपत्र दिले जात होते.सध्या सदर प्रमाणपत्र देणे बंद झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून तर लाभार्थ्यांना शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाकडून अद्याप कुठलेही निर्देश देण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचारी व लाभार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यांची भरपाई कोण करणार असा सवाल उपस्थित होत आहे.राज्य पटवारी संघाच्यावतीने दाखले देणे बंद करण्यात आले आहे. पण शासनाकडून कुठलेही आदेश निर्गमित करण्यात आले नाही. नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनात आल्याने शासनस्तरावर यावर निर्णय घेतला जाईल. वरिष्ठांच्या आदेशावरुन प्रमाणपत्र वितरणाची सोय करण्यात येईल.-एस.एल. नागपुरेनायब तहसीलदार, आमगाव