शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तलाठ्यांकडून दाखले देणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:08 IST

तालुक्यातील नागरिकांना विविध कामांसाठी आवश्यक प्रमाणपत्र ७० वर्षापासून मिळत होते. पण सध्या तलाठ्यांनी प्रमाणपत्र देणे बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देलाभार्थी योजनेपासून वंचित : ३८ प्रकारच्या दाखल्यांची समस्या

राजीव फुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील नागरिकांना विविध कामांसाठी आवश्यक प्रमाणपत्र ७० वर्षापासून मिळत होते. पण सध्या तलाठ्यांनी प्रमाणपत्र देणे बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आमगाव तालुक्यात तलाठी कार्यालयातून विविध दाखले देण्याचा तलाठ्यांना अधिकार नसल्याचे कारण सांगून दाखले देण्यास तलाठी संघटनेने मनाई केली आहे.दाखल्यामुळे नागरिकांची शासकीय कामे खोळंबली आहेत. शासकीय कर्मचाºयांना शासनाकडून कुठलेही निर्देश प्राप्त न झाल्याने तलाठी व नागरिक संभ्रमाच्या स्थितीत आहेत. राज्यात नागरिकांना शासकीय कार्यालयात लागणारे प्रमाणपत्र तलाठ्यांमार्फत मिळायचे. त्यामुळे शासकीय कामे लवकर व्हायची. सदर प्रकरणी काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने दिलेल्या सुचनेनुसार तलाठ्यांना ३८ प्रकारचे दाखले देण्याचे अधिकार नसल्याचे कळले. त्यामुळे राज्य पटवारी संघाद्वारे नागरिकांना लागणारे ३८ प्रकारचे प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेतला. सदर प्रमाणपत्रात वारसान प्रमाणपत्र, भूमिहिन शेतमजूर, वंशावळ, रक्त संबंधी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, संयुक्त कुटुंब प्रमाणपत्र, विभक्त प्रमाणपत्र, १९६६ चे कलम २५ (२) अंतर्गत वृक्ष असल्याचे प्रमाणपत्र, निराधार, भिखारी व धर्मदाय संस्थाच्या माध्यमातून मिळणारी मदत, विधवा, परित्यक्ता प्रमाणपत्र, पुर्नविवाह न झाल्याचे प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील प्रमुखाचे प्रमाणपत्र, शासकीय नोकरीत असल्याचे किंवा नसल्याचे प्रमाणपत्र, चल-उचल संपत्ती, ओलित किंवा पडित बागायती कृषी प्रमाणपत्र, जमिनीच्या किमतीचा पंचनामा, कृषी जमिनीचा नकाशा, जमिनीची चर्तुसिमा, विद्युत पंप असल्याचे प्रमाणपत्र, अस्वच्छ व्यवसाय, मुलबाळ असल्याच व, नसल्याचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, भूमिहिन प्रमाणपत्र असे अनेक प्रमाणपत्र दिले जात होते.सध्या सदर प्रमाणपत्र देणे बंद झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून तर लाभार्थ्यांना शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाकडून अद्याप कुठलेही निर्देश देण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचारी व लाभार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यांची भरपाई कोण करणार असा सवाल उपस्थित होत आहे.राज्य पटवारी संघाच्यावतीने दाखले देणे बंद करण्यात आले आहे. पण शासनाकडून कुठलेही आदेश निर्गमित करण्यात आले नाही. नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनात आल्याने शासनस्तरावर यावर निर्णय घेतला जाईल. वरिष्ठांच्या आदेशावरुन प्रमाणपत्र वितरणाची सोय करण्यात येईल.-एस.एल. नागपुरेनायब तहसीलदार, आमगाव