शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १९ हजार लसींचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:27 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू असून, कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढत असताना दिसत आहे. असे असतानाही पाहिजे ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू असून, कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढत असताना दिसत आहे. असे असतानाही पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण होत नसले तरीही आतापर्यंत जिल्ह्यातील ५८ हजार ७९८ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे, तर आता जिल्ह्यात १९०५० डोसचाच साठा उरला आहे.

जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाइन कोरोना वर्कर्सला देण्यात आली. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता केंद्र शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, तसेच ४५ वर्षांवरील काही आजार असलेल्या नागरिकांना लस देण्यास मुभा दिली. त्यानुसार, देशासह जिल्ह्यातही लसीकरण सुरू आहे. या लसीकरणांतर्गत जिल्ह्याला आतापर्यंत लसीचे ७९९०० डोस मिळाले आहेत, तर आतापर्यंत ५८ हजार ७९८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्याकडे आता १९०५० डोस उरले आहेत.

१६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून, यासाठी १४ जानेवारी रोजी जिल्ह्याला १०००० डोस देण्यात आले होते. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी ८००० डोस, १५ फेब्रुवारी रोजी ८३०० डोस, तर २ मार्च रोजी १०६०० डोस देण्यात आले होते. सुरुवातीला हे सर्व डोस कोविशिल्डचेच होते. मात्र, लसीकरणाला गती देण्यासाठी १२ मार्च रोजी जिल्ह्याला ४३००० डोस देण्यात आले. यामध्ये १८००० कोविशिल्डचे, तर २५००० डोस कोव्हॅक्सिनचे आहेत. म्हणजेच, आतापर्यंत एकूण ७९९०० डोस जिल्ह्याला मिळाले असून, आता १९०५० डोस उरले आहेत. यामध्ये १२७२० डोज कोव्हॅक्सिनचे असून, ६३३० डोस कोविशिल्डचे आहेत.

-------------------------------

कोविशिल्डलाच जास्त पसंती

जिल्ह्यात आतापर्यंत ५८७९८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ५१४६६ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर ७३३२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. विशेष म्हणजे, लस घेणाऱ्या नागरिकांत ४७०५२ नागरिकांनी कोविशिल्डचा डोस घेतला असून, ११७४६ नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे. यावरून कोविशिल्डला घेण्यासाठी नागरिक जास्त पसंती देत असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

------------------------------------

नागरिकांनी पुढे येण्याची गरज

१६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यानंतरही आतापर्यंत फक्त ५८७९८ नागरिकांनी लस घेतली असल्याचे दिसत आहे. यातच पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांचा समावेश आहे. आता २ महिन्यांच्या या कालावधीत फक्त ५८७९८ नागरिकांनी लस घेणे म्हणजे लसीकरणाला हवी तशी गती दिसून येत नाही. कोरोनाची लस सर्वांसाठी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले असून, आता कोरोनाचा कहर पुन्हा वाढत असल्याने नागरिकांनी लवकरात लवकर लस घेण्याची गरज आहे.